शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
5
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
6
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
7
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
8
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
9
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
10
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
11
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
12
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
14
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
15
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
16
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
17
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
18
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
19
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
20
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  

२७२ गावांना अवकाळीचा ताडाखा; २१ कोटींच्या पीक नुकसानीचा अंतिम अहवाल शासनाकडे!

By रवी दामोदर | Updated: March 23, 2024 16:43 IST

९ हजार १५२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांना बसला होता फटका, शेतकऱ्यांना मदतीची आस.

रवी दामोदर, अकोला : रब्बी हंगामातील पिके ऐन सोंगणीला आली असताना गत महिन्यात दि.२६ फेब्रुवारी रोजी झालेल्या अवकाळी पावसाने धुमाकूळ घालीत शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला. जिल्ह्यातील नुकसानीचा अंतिम अहवाल शुक्रवारी (दि. २२) शासनाकडे पाठविण्यात आला असून, त्यानुसार, जिल्ह्यात २७२ गावांना अवकाळीचा तडाखा बसला आहे. अंतिम सर्वेक्षण अहवालानुसार जिल्ह्यातील ९ हजार १५२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून, २१ कोटी १० लाख ३१ हजार ४८२ रुपये मदतीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने शासनाला सादर केला आहे.

यंदा खरीप हंगामात उत्पादनात प्रचंड घट झाल्याने शेतकऱ्यांची मदार रब्बी हंगामावर होती. पैशांची जुळवाजुळव करून शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात पेरणी केली. पीक ऐन काढणीच्या अवस्थेत असताना दि. २६ फेब्रुवारीला मध्यरात्री जिल्ह्यात वादळ वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामध्ये अकोला, बार्शीटाकळी, तेल्हारा व मूर्तिजापूर तालुक्यात किरकोळ प्रमाणात गारपीटही झाली. अवकाळी पावसामुळे कांदा, गहू, हरभरा, ज्वारी, संत्रा, आदींसह भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. नुकसानग्रस्त भागात जिल्हा प्रशासनाच्यावतीने कृषी, ग्रामविकास व महसूल विभागाकडून पंचनामे करून सर्व्हे करण्यात आला आहे. त्यानुसार, जिल्ह्यात तब्बल ९ हजार १५२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांना फटका बसल्याचे चित्र आहे.

पीक नुकसान व आवश्यक निधी -

क्षेत्राचा प्रकार - गावे - शेतकरी - बाधित क्षेत्र - अपेक्षित निधी

जिरायत पिके - ६७ - ३५८४ - २७५५ - ३७४६९६३२

बागायत पिके - १८३ - ८१०३ - ६३०३ - १७०१९४५०

फळ पिकं - २२ - १२० - ९३.६५ - ३३७१४००

एकूण   - २७२ - ११८०७ - ९१५२.१२ - २११०३१४८२

गहू, हरभऱ्याचे सर्वाधिक नुकसान -

फेब्रुवारीच्या अंतिम आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे गहू व हरभरा पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. जिरायती व बागायती क्षेत्र मिळून तब्ब्ल ४ हजार ५०७ हेक्टर क्षेत्रावरील गव्हाला फटका बसला आहे, तर ३ हजार २४२ हेक्टर क्षेत्रावरील हरभरा पिकाचे नुकसान झाले आहे. नुकसानीचा अंतिम अहवाल शासनाकडे सादर करण्यात आला असून, शेतकऱ्यांना मदतीचा आस आहे.

टॅग्स :AkolaअकोलाRainपाऊसFarmerशेतकरी