शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

२७२ गावांना अवकाळीचा ताडाखा; २१ कोटींच्या पीक नुकसानीचा अंतिम अहवाल शासनाकडे!

By रवी दामोदर | Updated: March 23, 2024 16:43 IST

९ हजार १५२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांना बसला होता फटका, शेतकऱ्यांना मदतीची आस.

रवी दामोदर, अकोला : रब्बी हंगामातील पिके ऐन सोंगणीला आली असताना गत महिन्यात दि.२६ फेब्रुवारी रोजी झालेल्या अवकाळी पावसाने धुमाकूळ घालीत शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला. जिल्ह्यातील नुकसानीचा अंतिम अहवाल शुक्रवारी (दि. २२) शासनाकडे पाठविण्यात आला असून, त्यानुसार, जिल्ह्यात २७२ गावांना अवकाळीचा तडाखा बसला आहे. अंतिम सर्वेक्षण अहवालानुसार जिल्ह्यातील ९ हजार १५२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून, २१ कोटी १० लाख ३१ हजार ४८२ रुपये मदतीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने शासनाला सादर केला आहे.

यंदा खरीप हंगामात उत्पादनात प्रचंड घट झाल्याने शेतकऱ्यांची मदार रब्बी हंगामावर होती. पैशांची जुळवाजुळव करून शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात पेरणी केली. पीक ऐन काढणीच्या अवस्थेत असताना दि. २६ फेब्रुवारीला मध्यरात्री जिल्ह्यात वादळ वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामध्ये अकोला, बार्शीटाकळी, तेल्हारा व मूर्तिजापूर तालुक्यात किरकोळ प्रमाणात गारपीटही झाली. अवकाळी पावसामुळे कांदा, गहू, हरभरा, ज्वारी, संत्रा, आदींसह भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. नुकसानग्रस्त भागात जिल्हा प्रशासनाच्यावतीने कृषी, ग्रामविकास व महसूल विभागाकडून पंचनामे करून सर्व्हे करण्यात आला आहे. त्यानुसार, जिल्ह्यात तब्बल ९ हजार १५२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांना फटका बसल्याचे चित्र आहे.

पीक नुकसान व आवश्यक निधी -

क्षेत्राचा प्रकार - गावे - शेतकरी - बाधित क्षेत्र - अपेक्षित निधी

जिरायत पिके - ६७ - ३५८४ - २७५५ - ३७४६९६३२

बागायत पिके - १८३ - ८१०३ - ६३०३ - १७०१९४५०

फळ पिकं - २२ - १२० - ९३.६५ - ३३७१४००

एकूण   - २७२ - ११८०७ - ९१५२.१२ - २११०३१४८२

गहू, हरभऱ्याचे सर्वाधिक नुकसान -

फेब्रुवारीच्या अंतिम आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे गहू व हरभरा पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. जिरायती व बागायती क्षेत्र मिळून तब्ब्ल ४ हजार ५०७ हेक्टर क्षेत्रावरील गव्हाला फटका बसला आहे, तर ३ हजार २४२ हेक्टर क्षेत्रावरील हरभरा पिकाचे नुकसान झाले आहे. नुकसानीचा अंतिम अहवाल शासनाकडे सादर करण्यात आला असून, शेतकऱ्यांना मदतीचा आस आहे.

टॅग्स :AkolaअकोलाRainपाऊसFarmerशेतकरी