शहरं
Join us  
Trending Stories
1
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
4
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
5
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
6
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
7
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
8
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
9
काँग्रेसचं पुनरागमन, भाजपाचा चंचुप्रवेश आणि डाव्यांना धक्का, केरळमधील राजकीय हवा बदलतेय?
10
'या' छोट्या देशाचा चीन-भारतासारख्या बलाढ्या देशांना धोबीपछाड! फंड उभारण्यात आशियात १ नंबरला
11
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
12
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
13
तारीख ठरली, वेळ बदलली? 'या' दिवशी सुरु होणार 'बिग बॉस मराठी ६'; पाहा प्रोमो
14
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
15
खोकला, घशात खवखव; मुंबईकरांचे आरोग्य बिघडले; वातावरणातील बदलामुळे रुग्ण संख्येत मोठी वाढ
16
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
17
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
18
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
19
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
20
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
Daily Top 2Weekly Top 5

हर हर महादेवाच्या गजराने दुमदुमले अकोला, भाविकांची मोठी गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2022 13:55 IST

Akola : अकोला शहराचे आराध्य दैवत राजराजेश्‍वर मंदिरात दरवर्षी मोठ्या प्रमाणात श्रावण उत्सव साजरा केला जातो.

अकोला : ढोल ताशांचा गजर, खांद्यावर पुर्णेचे जल भरलेल्या कावड, अनवाणी पायाने तब्बल १८ किमीचे अंतर कापल्यावरही चेहऱ्याावर प्रसन्नता अन् उत्साह व मुखातून हर हर महादेवाचा जयघोष अन् गुलाल आणि फुलांची उधळण अशा मनोहरी वातावरणात अकोल्याच्या कावड महोत्सवात भक्ती आणि श्रद्धा यांचा अपूर्व संगम सोमवारी पाहावयास मिळाला.

अकोला शहराचे आराध्य दैवत राजराजेश्‍वर मंदिरात दरवर्षी मोठ्या प्रमाणात श्रावण उत्सव साजरा केला जातो. श्रावणातील दर सोमवारी शिवभक्त श्रद्धापूर्वक जलाभिषेक करतात. श्रावणातील शेवटच्या सोमवारी १८ कि.मी. अंतरावर असलेल्या गांधीग्राम (वाघोली) येथून पूर्णा नदीचे पाणी कावडीने आणून राजेश्‍वराला जलाभिषेक केला जातो. ७८ वर्षांच्या परंपरेनुसार सोमवारी अकोला शहरात कावड -पालखी उत्सव साजरा करण्यात आला. ‘हर्र ऽ ऽ ऽ बोला महादेव’च्या गजरात ग्रामदैवत श्री राज राजराजेश्वराला हजारो शिवभक्त कावडधारी मंडळांसह युवकांनी जलाभिषेक केला. पालखी-कावड उत्सव पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली. कावड यात्रा मार्गाला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.

शेकडो पालख्या व कावडधारी लहान-मोठे मंडळे या उत्सवात सहभागी झाले होते. गांधीग्राम येथून पायी शिवभक्त खांद्यावर शिवशंकराची पालखी व कावड घेऊन आले. वल्लभनगर, उगवा फाटा, शिलोडा, आकोट फैल, रेल्वे पुलावरून शिवाजी पार्क, राजकमल चौक, गवळीपुरा, आकोट स्टँड, माळीपुरा चौक, उदय टॉकीज, जुना कापड बाजार, सराफा बाजार, दाणा बाजार, गांधी चौक, गांधी मार्ग, सिटी कोतवाली चौक, लोहा पूल, जय हिंद चौक मार्गे या सर्व पालख्या व कावडी राजेश्‍वर मंदिरात पोहोचत आहेत. 

शिवभक्तांनी राजेश्‍वराला जलाभिषेक केल्यानंतर एक-एक करीत सर्वच मंडळांनी पूर्णेच्या पवित्र जलाने राजेश्‍वराला अभिषेक केला. रात्री उशिरापर्यंत अभिषेक सुरू होता. कावड व पालखी घेऊन आलेल्या शिवभक्तांनी श्रद्धापूर्वक राजेश्‍वराचे दर्शन घेतले व जलाभिषेक केला. कावड घेऊन येणार्‍या शिवभक्तांचे ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आले. अनेक सामाजिक व धार्मिक संस्थांनी शिवभक्तांना चहा, फराळ व भोजनाचे वाटप केले. राजकीय नेत्यांनीही शिवभक्तांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले.

अशी आहे परंपरा1944 साली स्वातंत्र्याची चळवळ सुरू असताना अकोल्यात मोठा दुष्काळ पडला होता. त्याचवेळी अकोल्यातील काही तरूणांनी ग्रामदैवताला जलाभिषेकाचा संकल्प केला. त्याच वर्षी मोठा पाऊसही पडला अशी आख्यायिका आहे. तेव्हापासून ही यात्रा सुरू आहे. हजारावर भरणे कळशांची कावड मंडळं या यात्रेतील प्रमुख आकर्षण असते.

टॅग्स :Akolaअकोला