शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

रेशनचा लाभ घेणाऱ्या २५ शिधापत्रिकाधारकांविरूद्ध गुन्हा दाखल

By नितिन गव्हाळे | Updated: June 16, 2023 17:44 IST

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांचे पत्रानुसार अन्न धान्याचा लाभ घेणाऱ्या शिधापत्रिकाधारकांची तपासणी करण्यात येत आहे.

अकोला : शासकीय, निमशासकीय कर्मचारी तसेच पेन्शन घेत असलेले कर्मचारी ज्यांचे वार्षिक शासनाने सदर योजनेकरिता ठरवून दिलेल्या उत्पन्न मर्यादेवर आहेत. परंतु काही व्यक्तींनी पात्र नसतानाही लाभ सोडण्याबाबतचे अर्ज जमा न करता शासनाची दिशाभूल करून रेशनचा लाभ घेणाऱ्या २५ शिधापत्रिकाधारकांविरूद्ध बार्शीटाकळी पोलिसांनी १४ जून रोजी गुन्हा दाखल केला आहे.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांचे पत्रानुसार अन्न धान्याचा लाभ घेणाऱ्या शिधापत्रिकाधारकांची तपासणी करण्यात येत आहे. जे लाभार्थी शासकीय व निमशासकीय नोकरीत आहेत किंवा पेन्शन घेत असतानाही ते लाभार्थी प्राधान्य कुटुंब योजना आणि अंत्योदय अन्न योजनेमध्ये अन्नधान्याचा लाभ घेत आहेत. अशा लाभार्थींनी स्वतःहून २५ फेब्रुवारीपर्यंत फाॅर्म भरुन कार्यालयात सादर करणे आवश्यक होते. परंतु शासकीय कर्मचाऱ्यांनी शासनाची दिशाभूल करुन अन्नधान्याचा लाभ घेतल्यामुळे त्यांच्यावर फौजदारी स्वरुपाचा गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार शासकीय कर्मचारी यांच्या विरोधात शासनाची फसवणूक करुन शासकीय योजनेचा गैरप्रकारे लाभ घेतल्यामुळे त्यांच्याविरुद्ध फौजदारी स्वरुपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तपासणीत आढळून आले गैरप्रकार

शासनाच्या असे निदर्शनास आलेले आहे की, स्वतः हून अन्नधान्याचा लाभ घेत आहेत. अशा लाभार्थींचा ग्रामपातळीवरील दक्षता समितीचे शासकीय सदस्य तलाठी, पोलिस पाटील यांच्यामार्फत शोध घेण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी दिले होते. त्या आदेशानुसार बार्शीटाकळी तालुक्यामधील ग्राम दक्षता समितीकडून कार्यालयास प्राप्त झालेले अहवालामध्ये शासकीय योजनेचा गैरप्रकारे लाभ घेणारे लाभार्थी आढळून आले.

या २५ जणांविरुद्ध फसवणूक केल्याचा आरोप

बार्शीटाकळी तालुक्यातील चिंचोली येथील सुरेश जगन्नाथ गिते, शालिनी चक्रनारायण, अंबरसिंग डाबेराव, ज्ञानदेव इंद्रसिंग राठोड, खेर्डा येथील गजानन महादेव तायडे, दीपक गोपाळ वानखडे, रामदास केवळी करवते रा. टिटवा, पंचफुला विजय पोहुरकर रा. मिर्झापूर, गोदावरी विजय खंडारे रा. सारकिन्ही, बाळू जगदेव आंबेकर रा. सारकिन्ही, रेडवा येथील जनाताई उत्तम राठोड, ज्योती रवींद्र राठोड, सुनीता संतोष पवार, करूणा फुलसिंग पवार, राजंदा येथील त्रिगुणा भिमदास अरखराव, निर्मला विठ्ठल जांभुळकर, सिंदखेड येथील राजकुमार हनुमंते, महादेव तायडे, विजय पारसकर, बाळू अंबादास वानखडे, महान येथील गजानन पुंडलिक वाघमारे, हाफिजा बी अब्दुल बशीर, धाबा येथील विलास बासू राठोड, भीमराव गणू राठोड, देवानंद जानकीराव हिवराळे आदींनी फसवणूक केल्याचा आरोप आहे.

टॅग्स :Akolaअकोला