शहरं
Join us  
Trending Stories
1
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
2
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
3
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
4
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
5
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
6
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
7
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
8
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
9
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
10
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
11
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
12
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
13
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
14
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
15
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
16
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
17
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
18
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
19
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
20
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट

६९ गावातील पाणीपुरवठा योजना; स्थगिती उठवण्यासाठी शिवसेनेचा अकोला ते नागपूर पायी मोर्चा

By आशीष गावंडे | Updated: April 10, 2023 18:36 IST

बाळापूर विधानसभा संघातील खारपाणपट्ट्यात गोड पाण्याचे स्त्रोत नसल्यामुळे मागील अनेक वर्षांपासून नागरिकांना नाइलाजाने खारेपाणी प्यावे लागत आहे.

अकोला : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाळापुर मतदार संघातील ६९ गावांना होणाऱ्या पाणीपुरवठा योजनेला स्थगिती दिल्यामुळे शिवसेनेचे (ठाकरे गट)जिल्हाप्रमुख तथा आमदार नितीन देशमुख यांच्या नेतृत्वात सोमवारी सकाळी अकोला ते नागपूर पायदळ मोर्चाला सुरुवात करण्यात आली. शहराचे आराध्य दैवत श्री राजेश्वर मंदिरातून या मोर्चाला प्रारंभ करण्यात आला.

बाळापूर विधानसभा संघातील खारपाणपट्ट्यात गोड पाण्याचे स्त्रोत नसल्यामुळे मागील अनेक वर्षांपासून नागरिकांना नाइलाजाने खारेपाणी प्यावे लागत आहे. क्षारयुक्त खाऱ्या पाण्यामुळे ६९ गावांमधील नागरिकांना किडनीचे विकार जडले आहेत. तर अनेकांचा मृत्यू झाला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तेल्हारा तालुक्यातील वान धरणातून ६९ खेडी पाणीपुरवठा योजनेसाठी २२० कोटी रुपये मंजूर केले होते. आजरोजी पाणीपुरवठा योजनेचे ६० टक्के काम पूर्ण झाले असताना जिल्ह्यातील भाजप लोकप्रतिनिधींच्या सूचनेवरून उपमुख्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाणीपुरवठा योजनेला स्थगिती दिली. 

ही स्थगिती उठविण्यासाठी आमदार नितीन देशमुख यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान विधानभवन परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर एक दिवसीय आमरण उपोषण छेडले होते. अर्थसंकल्पीय अधिवेशन संपण्याआधी पाणीपुरवठा योजनेची स्थगिती उठविणार असल्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री फडणीस यांनी दिले होते; परंतु अधिवेशन संपल्यानंतरही स्थगिती न हटविल्यामुळे अखेर आमदार देशमुख यांनी आंदोलनाचे हत्यार उपसल्याचे समोर आले आहे. ६९ गावांमधील नागरिक व शिवसैनिकांसह त्यांनी सोमवारी सकाळी आराध्य दैवत श्री राजेश्वराचे दर्शन घेऊन अकोला ते नागपूर पायदळ मोर्चाला प्रारंभ केला.

यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाप्रमुख गोपाल दातकर, उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे, मुकेश मुरूमकार, विकास पागृत, मंगेश काळे, योगेश्वर वानखडे, अतुल पवनीकर, संजय शेळके, तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर म्हैसने, रवी मुर्तडकर, गजानन मानतकर, अप्पू तिडके, ज्ञानेश्वर गावंडे, नितीन ताथोड, ब्रह्मा पांडे, अजय गावंडे, शहर प्रमुख राजेश मिश्रा (अकोला पश्चिम), शहर प्रमुख राहुल कराळे (अकोला पूर्व), विनायकराव गुल्हाने, आनंद बनचरे, निरंजन बंड, विवेक खारोडे, उमेश राऊत, ऍड. मनोज खंडारे, अमोल पालेकर, तरुण बगेरे, उपशहर प्रमुख अभिषेक खरसाडे, राजदीप टोहरे, सोनू भरकर, विजय परमार,  संजय अग्रवाल, गजानन चव्हाण, योगेश गीते, सागर भारूका, युवासेना जिल्हाप्रमुख अभय खुमकर, युवासेना शहर प्रमुख नितीन मिश्रा, किरण येलवनकर यांच्यासह असंख्य नागरिक मोर्चात सहभागी होते. 

टँकर मध्ये जमा केले खारेपाणी खारपाणपट्ट्यातील ६९ गावांमध्ये पिण्यासाठी गोड पाणी उपलब्ध नाही. त्यामुळे उपमुख्यमंत्र्यांना देखील खाऱ्या पाण्याची चव समजण्यासाठी ६९ गावांतील नागरिकांनी जमा केलेले पाणी टँकरमध्ये भरण्यात आले आहे. 

पाणीपुरवठा योजनेला दिलेली स्थगिती उठविण्यासाठी आम्ही अकोला ते नागपूर २४० किमीच्या प्रवासाला प्रारंभ केला आहे. उपमुख्यमंत्र्यांनी खाऱ्या पाण्याची चव घेऊन स्थगिती हटवावी, अन्यथा त्यांची खाऱ्या पाण्याने आंघोळ घालणार. - आमदार तथा जिल्हाप्रमुख नितीन देशमुख (ठाकरे गट)

टॅग्स :AkolaअकोलाShiv Senaशिवसेना