शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
3
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
4
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
5
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
6
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
7
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
8
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
9
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
10
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
11
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
12
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
13
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
14
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
15
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
16
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
17
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
18
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
19
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
20
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू

थकबाकीदार ६५६६ शेतकऱ्यांना मिळू शकतो ‘वन टाइम सेटलमेंट’चा लाभ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 12:47 IST

अकोला जिल्ह्यातील थकबाकीदार ६ हजार ५६६ शेतकºयांना ‘वन टाइम सेटलमेंट’ योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.

- संतोष येलकर अकोला : कर्जमाफी योजनेंतर्गत मुद्दल व व्याजासह दीड लाखांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या शेतकºयांसाठी एकवेळ समझोता (वन टाइम सेटलमेंट) योजनेत दीड लाखांवरील रक्कम भरण्यास ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय शासनामार्फत १९ डिसेंबर रोजी घेण्यात आला. त्यानुसार जिल्ह्यातील थकबाकीदार ६ हजार ५६६ शेतकºयांना ‘वन टाइम सेटलमेंट’ योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.सतत दुष्काळ आणि नापिकीमुळे कर्जबाजारी झालेल्या राज्यातील शेतकºयांना दिलासा देण्यासाठी गत २८ जून २०१७ रोजीच्या शासन निर्णयानुसार छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर करण्यात आली. या योजनेंतर्गत राज्यातील थकबाकीदार शेतकºयांना दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी घोषित करण्यात आली. त्यामध्ये मुद्दल व व्याजासह दीड लाख रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या शेतकºयांसाठी एकवेळ समझोता (वन टाइम सेटलमेंट) योजना राबविण्यात येत आहे. या योजनेत पात्र शेतकºयांना दीड लाखांवरील त्यांच्या हिश्श्याची संपूर्ण रक्कम बँकेत जमा करण्याची मुदत ३१ डिसेंबर रोजी संपुष्टात येत आहे. त्यानुषंगाने ‘वन टाइम सेटलमेंट’ योजनेत पात्र शेतकºयांसाठी त्यांच्या हिश्श्याची संपूर्ण रक्कम भरण्यास ३१ मार्च २०१९ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने १९ डिसेंबर रोजी घेतला आहे. त्यानुसार दीड लाखांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या जिल्ह्यातील ६ हजार ५६६ शेतकºयांना ‘वन टाइम सेटलमेंट’ योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.१.२९ लाख शेतकºयांना ५५२ कोटींची कर्जमाफी!कर्जमाफी योजनेत जिल्ह्यातील १ लाख ३८ हजार शेतकºयांनी कर्जमाफीसाठी आॅनलाइन अर्ज केले होते. त्यापैकी गत दीड वर्षांच्या कालावधीत २१ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यात १ लाख २९ हजार ३५६ शेतकºयांना ५५२ कोटी ४२ लाख ७१ हजार रुपयांची कर्जमाफी देण्यात आली आहे. उर्वरित नऊ हजार शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळणे अद्याप बाकी आहे.

जिल्ह्यात दीड लाखापेक्षा जास्त थकबाकी असलेले असे आहेत शेतकरी!जिल्ह्यात दीड लाख रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असलेले ६ हजार ५६६ शेतकरी आहेत. त्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत २ हजार ९६६ शेतकरी आणि जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांचे ३ हजार ६०० शेतकºयांचा समावेश आहे. या थकबाकीदार शेतकºयांना ‘वन टाइम सेटलमेंट’ योजनेचा लाभ मिळू शकतो. 

कर्जमाफी योजनेत दीड लाखांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या शेतकºयांसाठी ‘वन टाइम सेटलमेंट’ योजनेस शासनाकडून ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या योजनेचा जिल्ह्यातील ६ हजार ५६६ शेतकºयांना लाभ मिळू शकतो.- जी. जी. मावळे,जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था)

 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरी