शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
2
पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; १० ठार, ३२ हून अधिक जखमी
3
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय, युट्यूब देणार २१७ कोटी रुपये; फेसबुक आणि ट्विटरने किती दिलेले?
5
चीनची चौथी सर्वात मोठी कार कंपनी भारतात येणार? Tiggo SUV चा डिझाइन पेटंट दाखल 
6
दागिने घालून जिममध्ये जायची सून, अद्दल घडवण्यासाठी सासूने रचला कट; लोकेशन पाठवलं अन्...
7
Social Viral: मज्जा नि लाईफ! विमान ५ तास लेट; प्रवाशांनी एअरपोर्टवर फेर धरला थेट! 
8
Illegal U Turn : पावती फाडण्यासाठी पोहोचले पोलीस, पण रिकाम्या हातानं परतावं लागलं; कारमध्ये डोकावून बघितलं तर...! नेमकं काय घडलं?
9
टाटा, बाय बाय...! आशिया कपमध्ये हरले, बिल या खेळाडूवर फाडले; दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिकेसाठी संघातून बाहेर काढले...
10
देवी बनून 'बाहुबली' साम्राज्य उभारण्याचं स्वप्न; कोट्यवधी लोकांची अब्जावधी डॉलर्सची फसवणूक
11
गेमचेंजर! भारतात सापडला 'व्हाइट गोल्ड'चा खजिना; चीनवरील निर्भरता संपणार, नवी क्रांती घडणार
12
"मी आजपर्यंत एकाही कंत्राटदाराकडून कधी..."; भ्रष्टाचार, इथेनॉलच्या आरोपांवर गडकरींनी सोडलं मौन
13
'शालार्थ आयडी' नंतर आणखी एक शिक्षण घोटाळा ! क्षमता नसताना शाळेत १८ शिक्षकांची नियुक्ती कशाला ?
14
MP Accident: देवदर्शनावरून येताना टूरिस्ट बसनं उडवलं, तिघांचा मृत्यू; सणासुदीच्या दिवशी कुटुंबावर शोककळा
15
TCS Layoffs: 'स्वतःहून राजीनामा द्या किंवा टर्मिनेट व्हा'; टीसीएसमध्ये ३० हजार कर्मचाऱ्यांची कपात? TATA समूहाच्या आयटी कंपनीत भीतीचं वातावारण
16
सूत जुळलं! १२वीच्या विद्यार्थिनीचं शिक्षकावर प्रेम जडलं, लग्न केलं अन् आता पतीसाठी मागतेय सुरक्षा
17
दीपिकाला अनफॉलो केलं? चर्चांवर अखेर फराह खानने सोडलं मौन, म्हणाली, "आम्ही दोघींनी..."
18
टाटाच्या शेअरनं घेतलाय रॉकेट स्पीड, आता होणार स्प्लीट; १०००% हून अधिक परतावा देत लोकांना केलंय मालामाल!
19
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही! कंपन्या फसवणूक करत असल्याच्या ३००० हून अधिक तक्रारी दाखल
20
Video: भारताविरोधातील पराभव सहन झाला नाही; पाकिस्तानी खेळाडूने रडत रडत बनवला व्हिडिओ अन्...

पावसाळ्यातही ६४ गावांना पंधरा दिवसाआड पाणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 14:52 IST

जिल्ह्यातील खारपाणपट्ट्यातील खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना १५ दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

- संतोष येलकर

अकोला: जिल्ह्यातील खारपाणपट्ट्यातील खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना १५ दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पंधरा दिवस पुरेल एवढे पाणी साठवून ठेवणे अशक्य असल्याने, पावसाळ्यातही तहान भागविण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे.यावर्षीचा पावसाळा सुरू होऊन दीड महिन्याचा कालावधी उलटून गेला; मात्र जिल्ह्यात अद्यापही सार्वत्रिक दमदार पाऊस बरसला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील धरणांमधील जलसाठ्यांत वाढ झाली नसून, नदी-नाले कोरडे पडले आहेत. विहिरींच्या पाणी पातळीत वाढ झाली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील विविध भागात पावसाळ्यातही पाणीटंचाईची समस्या कायम आहे. महान येथील काटेपूर्णा धरणातून अकोला शहरासह खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो; परंतु काटेपूर्णा धरणात अत्यल्प जलसाठा उपलब्ध असल्याच्या पृष्ठभूमीवर आवश्यकतेनुसार या धरणातून खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना पाणी सोडण्यात येत आहे. या योजनेंतर्गत गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी गत आठवड्यात महान येथील काटेपूर्णा धरणातून १ दशलक्ष घनमीटर पाणी खांबोराजवळील उन्नई बंधाऱ्यात सोडण्यात आले. उपलब्ध जलसाठ्यातून खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना सध्या १५ दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे; मात्र १५ दिवसांतून एकदा मिळणारे पाणी पिण्यासाठी साठवून ठेवणे अशक्य असल्याने, पावसाळ्यातही तहान भागविण्यासाठी पिण्याच्या पाण्याकरिता ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे. विहीर, बोअर आणि नदी-नाल्यातील झिºयातील पाण्यावर ग्रामस्थांना तहान भागवावी लागत आहे. तर काहींना पाणी विकत घेऊन तहान भागवावी लागत असल्याची स्थिती आहे.उन्नई बंधाºयात महिनाभर पुरेल एवढा जलसाठा!खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी काटेपूर्णा धरणातून खांबोराजवळील उन्नई बंधाºयात पाणी सोडले जाते. गत आठवड्यात या बंधाºयात १ दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्यात आले असून, त्यामधून गावांना सध्या १५ दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यानुसार ६४ गावांना महिनाभर पुरेल एवढा जलसाठा उन्नई बंधाºयात उपलब्ध आहे.

खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना सध्या पंधरा दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यानुसार योजनेंतर्गत गावांना महिनाभर पाणीपुरवठा होऊ शकेल एवढा जलसाठा उन्नई बंधाºयात उपलब्ध आहे.- अनिल चव्हाणशाखा अभियंता, जि.प. ग्रामीण पाणीपुरवठा, उपविभाग, अकोला.

 

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईAkolaअकोला