शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
2
व्हाट्सअ‍ॅपच घोटाळेबाजांपासून सावध करणार, युजर्ससाठी दोन सेफ्टी टूल लाँच...; कशी वापरायची...
3
भारत अन् चीनचे जमायला लागले, तिकडे पाकिस्तान अस्वस्थ झाला, नवीन रडारड केली सुरू
4
"पुढच्या जन्मात मी तुलाच माझी पत्नी बनवेन"; काकीच्या प्रेमात वेडा झाला २६ वर्षीय तरुण अन्...
5
Mamata Banerjee : "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज
6
आता भारतातूनच खरेदी करा Apple, Microsoft चे शेअर्स! परदेशी गुंतवणुकीचा सोपा मार्ग, काय आहेत नियम व अटी?
7
“उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला, आता आहेत तरी कुठे?” उद्धव ठाकरेंचा सवाल
8
तुम्ही जे पाहता ते 'स्क्रिप्टेड'! खुद्द क्रिकेटच्या देवानं शेअर केलं पंत संदर्भातील 'सीक्रेट'
9
प्रियकराच्या मदतीनं पतीला तडफडून मारले, आईचा कट लेकीनं केला उघड; पप्पाला कसं संपवलं, पोलिसांना सांगितले
10
"मोठी किंमत चुकवावी लागेल माहितीये, पण..."; पंतप्रधान मोदींचे डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बवर थेट उत्तर
11
विवेक सांगळेने लालबागमध्ये घेतलं नवीन घर, शेजारीच वडिलांची मिल; भावुक होत म्हणाला...
12
पतीला यमसदनी पाठवणाऱ्या सोनम रघुवंशीला बॉयफ्रेंडसोबत तुरुंगातून पडायचंय बाहेर; पण कोर्टानं सुनावला वेगळाच निर्णय!
13
उधमपूरमध्ये CRPF चे वाहन खोल दरीत कोसळले; दोन जवानांचा दुर्दैवी मृत्यू, १२ जखमी
14
Video: भाषिक वादावरून उद्धव ठाकरे दिल्लीत कडाडले; राज ठाकरेंसोबतच्या युतीवरही स्पष्टच बोलले
15
ट्रम्प टॅरिफमुळे 'या' क्षेत्राला होणार ₹२४,००० कोटींचं नुकसान; या कंपन्यांचे शेअर्स क्रॅश, तुमच्याकडे आहेत का?
16
'सुहागरात' झाली, नवऱ्याला खोलीत कोंडून बायको बाल्कनीत आली अन्...; स्टोरी ऐकून पोलिसही चक्रावले
17
चाळीशी ओलांडल्यावर 'या' गोष्टी सोडा, शंभर वर्षं जगाल; सांगताहेत तरुण सागर महाराज!
18
नवरा गंगास्नानासाठी गेला, बायकोने १५ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारून बॉयफ्रेंडसह पळ काढला
19
ठरलेलं लग्न मोडलेला तरुण 'सैयारा' चित्रपट बघायला गेला, घरी परतला अन्...; संपूर्ण गावाला बसला मोठा धक्का!
20
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत वर्षाला फक्त १.५ लाख गुंतवून मिळवा ७० लाख रुपये, संपूर्ण रक्कम टॅक्स फ्री

पावसाळ्यातही ६४ गावांना पंधरा दिवसाआड पाणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 14:52 IST

जिल्ह्यातील खारपाणपट्ट्यातील खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना १५ दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

- संतोष येलकर

अकोला: जिल्ह्यातील खारपाणपट्ट्यातील खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना १५ दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पंधरा दिवस पुरेल एवढे पाणी साठवून ठेवणे अशक्य असल्याने, पावसाळ्यातही तहान भागविण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे.यावर्षीचा पावसाळा सुरू होऊन दीड महिन्याचा कालावधी उलटून गेला; मात्र जिल्ह्यात अद्यापही सार्वत्रिक दमदार पाऊस बरसला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील धरणांमधील जलसाठ्यांत वाढ झाली नसून, नदी-नाले कोरडे पडले आहेत. विहिरींच्या पाणी पातळीत वाढ झाली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील विविध भागात पावसाळ्यातही पाणीटंचाईची समस्या कायम आहे. महान येथील काटेपूर्णा धरणातून अकोला शहरासह खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो; परंतु काटेपूर्णा धरणात अत्यल्प जलसाठा उपलब्ध असल्याच्या पृष्ठभूमीवर आवश्यकतेनुसार या धरणातून खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना पाणी सोडण्यात येत आहे. या योजनेंतर्गत गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी गत आठवड्यात महान येथील काटेपूर्णा धरणातून १ दशलक्ष घनमीटर पाणी खांबोराजवळील उन्नई बंधाऱ्यात सोडण्यात आले. उपलब्ध जलसाठ्यातून खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना सध्या १५ दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे; मात्र १५ दिवसांतून एकदा मिळणारे पाणी पिण्यासाठी साठवून ठेवणे अशक्य असल्याने, पावसाळ्यातही तहान भागविण्यासाठी पिण्याच्या पाण्याकरिता ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे. विहीर, बोअर आणि नदी-नाल्यातील झिºयातील पाण्यावर ग्रामस्थांना तहान भागवावी लागत आहे. तर काहींना पाणी विकत घेऊन तहान भागवावी लागत असल्याची स्थिती आहे.उन्नई बंधाºयात महिनाभर पुरेल एवढा जलसाठा!खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी काटेपूर्णा धरणातून खांबोराजवळील उन्नई बंधाºयात पाणी सोडले जाते. गत आठवड्यात या बंधाºयात १ दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्यात आले असून, त्यामधून गावांना सध्या १५ दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यानुसार ६४ गावांना महिनाभर पुरेल एवढा जलसाठा उन्नई बंधाºयात उपलब्ध आहे.

खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना सध्या पंधरा दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यानुसार योजनेंतर्गत गावांना महिनाभर पाणीपुरवठा होऊ शकेल एवढा जलसाठा उन्नई बंधाºयात उपलब्ध आहे.- अनिल चव्हाणशाखा अभियंता, जि.प. ग्रामीण पाणीपुरवठा, उपविभाग, अकोला.

 

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईAkolaअकोला