शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

काटेपूर्णा धरणात ५५ टक्के जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 2:41 PM

अकोला : काटेपूर्णा धरणातील जलसाठा ५५ टक्क्यांवर पोहोचला असून, पाण्याचे नियोजन केल्यास दोन वर्षांची सोय झाली आहे. यावर्षी सिंचनासाठी पाणी देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

ठळक मुद्देजलग्रहण क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने आजमितीस या धरणाचा जलसाठा (४६.५९ दशलक्ष घनमीटर) ५५ टक्क्यांवर पोहोचला आहे. दोन वर्ष पिण्याच्या पाण्याची सोय झाल्याचे समाधान अकोलेकरांच्या चेहऱ्यावर असून, एकदाचे पाणी संकट टळल्याने सुटकेचा नि:श्वास टाक ला आहे.

अकोला : काटेपूर्णा धरणातील जलसाठा ५५ टक्क्यांवर पोहोचला असून, पाण्याचे नियोजन केल्यास दोन वर्षांची सोय झाली आहे. यावर्षी सिंचनासाठी पाणी देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.मागच्या वर्षी पाऊस कमी झाल्याने काटेपूर्णा धरणात अल्प जलसाठा असल्याने यावर्षीच्या उन्हाळ््यात अकोलकरांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागला. अकोला शहर वगळता या धरणातून पाणी पुरवठा बंद केल्याने या धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेली गावे, औद्योगिक वसाहतीला तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागला. यावर्षीही सुरुवातीला पाऊस लांबल्याने अकोलेकरांची चिंता वाढली होती. पण, जुलै आणि आॅगस्टमध्ये या धरणाच्या जलग्रहण क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने आजमितीस या धरणाचा जलसाठा (४६.५९ दशलक्ष घनमीटर) ५५ टक्क्यांवर पोहोचला आहे. मागच्यावर्षी २१ टक्के असलेला जलसाठा दुपटीने वाढल्याने आता दोन वर्ष पिण्याच्या पाण्याची सोय झाल्याचे समाधान अकोलेकरांच्या चेहऱ्यावर असून, एकदाचे पाणी संकट टळल्याने सुटकेचा नि:श्वास टाक ला आहे. पातूर तालुक्यातील मोर्णा धरणात १४.०४ दलघमी म्हणजेच ५७.३८ टक्के, तर निर्गुणा धरणात १८.८० दलघमी म्हणजेच ६५.१६ टक्के जलसाठा संचयित झाला आहे. मूर्तिजापूर तालुक्यातील उमा धरण यावर्षीच्या उन्हाळ््यात शून्य टक्क्यावर आले होते.या धरणात आजमितीस ९.२४ दलघमी म्हणजेच ७९.११ टक्के साठा उपलब्ध झाला आहे. घुगंशी बॅरेज मात्र शून्य टक्क्यावर आहे. अकोला, बुलडाणा व अमरावती जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या ५६.१५ दलघमी म्हणजेच ६८.५२ टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे.सिंचनाची होणार सोय!गत तीन-चार वर्षांपासून सिंचनासाठी शेतकºयांना पाणी मिळणे कठीण झाले होते. मागच्या वर्षीच्या रब्बी व यावर्षीच्या उन्हाळी पिकांना शेतकºयांना पाणी मिळाले नाही, पण यावर्षी धरणात ५० टक्केच्यावर पाणी पोहोचल्याने सिंचनासाठीच्या पाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.अकोलेकरांना मिळणार दरडोई १४० लीटर पाणीसतत पाणीटंचाईचा सामना करणाºया अकोलकरांना यावर्षी दरडोई १४० लीटर पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पावसाळ््याचे आणखी पावणे दोन महिने शिल्लक आहेत. त्यामुळे यावर्षी धरणाचा जलसाठा शंभर टक्केपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. सध्या दरडोई १०० लीटर पाणी पुरवठा केला जातो. आता १४० लीटर दरडोई पाणी मिळणार असल्याचे वृत्त आहे.

 

 

टॅग्स :AkolaअकोलाKatepurna Damकाटेपूर्णा धरण