शहरं
Join us  
Trending Stories
1
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
2
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
3
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
4
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
5
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
6
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
7
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
8
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
9
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
10
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
11
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
12
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
13
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
14
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
15
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
16
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
17
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
18
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
19
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
20
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा

अकोला जिल्ह्यातील ५३४ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणाची अडकली कामे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2018 1:13 PM

अकोला: जिल्ह्यातील विविध भागात निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या परिस्थितीत पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांची पायपीट सुरू असताना, अडकलेली पाणीटंचाई निवारणाची कामे केव्हा सुरू होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील ५३४ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणासाठी १ हजार ८४ उपाययोजनांच्या कामांसाठी २६ कोटींचा आराखडा मंजूर.महिनाभराचा कालावधी उलटून जात असताना संबंधित यंत्रणांनी पाणीटंचाई निवारणार्थ प्रस्ताव सादर केले नाही.प्रस्तवांअभावी अडकलेली जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणाची कामे केव्हा सुरू होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

- संतोष येलकरअकोला: जिल्ह्यातील ५३४ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणासाठी १ हजार ८४ उपाययोजनांच्या कामांकरिता २६ कोटी ८५ लाख रुपयांच्या कृती आराखड्यास जिल्हाधिकाºयांनी गत महिन्यात मंजुरी दिली; मात्र संबंधित यंत्रणांकडून कामांचे प्रस्ताव अद्याप जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आले नाही. त्यामुळे कृती आराखड्यात समाविष्ट कामे अद्याप सुरू करण्यात आली नाही. त्यानुषंगाने जिल्ह्यातील विविध भागात निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या परिस्थितीत पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांची पायपीट सुरू असताना, अडकलेली पाणीटंचाई निवारणाची कामे केव्हा सुरू होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.यावर्षीच्या गत पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने जिल्ह्यातील नदी-नाले कोरडे पडले असून, धरणांमध्ये अत्यल्प जलसाठा उपलब्ध असल्याच्या स्थितीत जिल्ह्यातील विविध भागात हिवाळ्यातच पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे. जिल्ह्यातल्या खारपाणपट्ट्यातील खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत टंचाईग्रस्त ६० गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांची पायपीट सुरू झाली आहे. त्यामुळे पाणीटंचाईग्रस्त गावातील ग्रामस्थांना जिल्हा प्रशासनामार्फत सुरू करण्यात आलेल्या टँकरसह हातपंपांच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. जिल्ह्यातील इतर गावांतही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ग्रामस्थांसमोर निर्माण झाला असून, अनेक गावांमध्ये पाणी विकत घेऊन तहान भागविण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. या पृष्ठभूमीवर आॅक्टोबर ते जून या कालावधीसाठी जिल्ह्यातील ५३४ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणासाठी १ हजार ८४ उपाययोजनांच्या कामांसाठी २६ कोटी ८५ लाख ३८ हजार रुपये खर्च अपेक्षित असलेल्या पाणीटंचाई निवारण कृती आराखड्यास जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी गत ११ डिसेंबर रोजी मंजुरी दिली आहे. महिनाभराचा कालावधी उलटून जात असताना पाणीटंचाई निवारण कृती आराखड्यात समाविष्ट कामांसाठी जिल्ह्यातील पंचायत समिती, तहसील कार्यालय व जिल्हा परिषद इत्यादी यंत्रणांमार्फत कामांचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रशासकीय मान्यतेसाठी सादर करण्यात आले नाही. त्यामुळे पाणीटंचाई निवारण कृती आराखडा मंजूर असला तरी, जिल्ह्यात प्रत्यक्ष पाणीटंचाई निवारणाची कामे अद्याप सुरू करण्यात आली नसल्याने, प्रस्तवांअभावी अडकलेली जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणाची कामे केव्हा सुरू होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

 

टॅग्स :Akola cityअकोला शहरwater transportजलवाहतूकzpजिल्हा परिषद