शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

अकोला जिल्ह्यातील ४६२ शाळा सुरू; सहा हजारांवर विद्यार्थ्यांची उपस्थिती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2020 10:56 IST

जिल्ह्यातील ५३८ शाळांपैकी सोमवारी ४६२ उच्च माध्यमिक शाळा सुरू करण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देकेवळ १० टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती.१० हजार ५१ पालकांचे संमतिपत्र

अकोला: शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात सोमवारपासून नियमांचे पालन करीत, इयत्ता नववी, दहावी, अकरावी व बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले. पहिल्याच दिवशी केवळ १० टक्केच विद्यार्थ्यांची उपस्थिती शाळांमध्ये दिसून आली. जिल्ह्यातील ५३८ शाळांपैकी सोमवारी ४६२ उच्च माध्यमिक शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. सोमवारी शाळांमध्ये ६ हजार ९५६ विद्यार्थ्यांनी हजेरी लावली तर ४,२०० पैकी ३ हजार ५२९ शिक्षकांची उपस्थिती होती. कोरोनाच्या पृष्ठभूमीवर शाळा सुरू करण्याविषयी संभ्रमाची स्थिती होती; परंतु शासनाने परवानगी दिल्यानंतर शिक्षण विभागाने शाळांमध्ये स्वच्छता, निर्जंतुकीकरण करणे, विद्यार्थी व शिक्षक थर्मल स्कॅनिंग करण्यासोबतच इतर सुविधा उपलब्ध करण्यास बजावले होते. त्यानुसार सोमवारी विद्यार्थी व शिक्षकांची तपासणी करून शाळेत प्रवेश देण्यात आला. शाळांमध्ये सध्या महत्त्वाचे इंग्रजी, गणित व विज्ञान विषयाच्या तासिका घेण्यात येणार आहेत. उर्वरित विषयाच्या तासिका ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार असल्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद, शिक्षण विस्तार अधिकारी अरविंद जाधव यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्याबाबत शिक्षण विभागाने पालकांकडून शाळेमार्फत संममिपत्र मागविले होते; परंतु १ लाख ६ हजार १९९ विद्यार्थ्यांपैकी केवळ १० हजार ५१ पालकांनीच संमतिपत्र भरून दिल्याची माहिती आहे. कोरोनाची प्रादुर्भाव संपला नाही. दररोज कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत असताना, पालक मुलांच्या आरोग्याबाबत चिंतीत आहेत. त्यामुळे मुलांना शाळेत पाठवायचे की नाही, याबाबत पालक संभ्रमात आहेत. त्यामुळेच सोमवारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची अल्प उपस्थिती दिसून आली.

शाळा ४६२

उपस्थित शिक्षक ३,५२९

उपस्थित विद्यार्थी ६,९५६

 

 

टॅग्स :AkolaअकोलाSchoolशाळा