शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
3
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
4
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
5
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
6
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
7
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
8
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
9
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
11
सर्वपित्री अमावास्या २०२५: पूर्वज स्मरणासह ‘ही’ कामे अवश्य कराच; पुण्य-वरदान-कृपा लाभेल!
12
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
13
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
14
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
15
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
16
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
17
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
18
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले
19
Navratri 2025: नवरात्रीला घटस्थापना कशी करावी? जाणून घ्या साहित्य, मुहूर्त आणि शास्त्रोक्त विधी!
20
निलेश साबळेनेच मला बाईचं कॅरेक्टर करायला सांगितलं होतं, भाऊ कदमचा खुलासा

वर्षभरात ४५१ नवजात बालकांचा मृत्यू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 01:25 IST

अकोला : संपूर्ण जिल्हय़ासह लगतच्या जिल्हय़ांमधील गर्भवती  स्त्रियांसाठी आधार ठरलेल्या येथील जिल्हा स्त्री रुग्णालयातील  विशेष नवजात शिशू दक्षता कक्ष (एसएनसीयू)मध्ये एप्रिल  २0१६ ते मार्च २0१७ या एका वर्षाच्या कालावधीत दाखल  झालेल्या ४१५२ नवजात बालकांपैकी ४५१ बालके  दगावल्याची माहिती समोर आली आहे.

ठळक मुद्देजिल्हा स्त्री रुग्णालय‘एसएनसीयू’मधील बालक मृत्यूदराने  वेधले मानवाधिकार आयोगाचे लक्ष

अतुल जयस्वाल । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : संपूर्ण जिल्हय़ासह लगतच्या जिल्हय़ांमधील गर्भवती  स्त्रियांसाठी आधार ठरलेल्या येथील जिल्हा स्त्री रुग्णालयातील  विशेष नवजात शिशू दक्षता कक्ष (एसएनसीयू)मध्ये एप्रिल  २0१६ ते मार्च २0१७ या एका वर्षाच्या कालावधीत दाखल  झालेल्या ४१५२ नवजात बालकांपैकी ४५१ बालके  दगावल्याची माहिती समोर आली आहे. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात  बालकांचा मृत्यू झाल्याच्या प्रकाराची राष्ट्रीय मानवाधिकार  आयोगाने दखल घेऊन राज्य सरकारला नोटीस बजावली आहे.‘लेडी हार्डिंग’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या जिल्हा स्त्री  रुग्णालयात केवळ जिल्हाच नव्हे, तर लगतच्या वाशिम,  बुलडाणा, हिंगोली व अमरावती जिल्हय़ातूनही अनेक गर्भवती  महिला प्रसूतीसाठी येतात. दिवसेंदिवस येथे प्रसूतीसाठी येणार्‍या  महिलांचे प्रमाण वाढतच असले, तरी त्यादृष्टीने येथील सोयी- सुविधांचा म्हणावा तसा विकास झाला नाही. या रुग्णालयात  विशेष काळजी घेण्याची गरज असलेल्या बालकांसाठी वर्ष  २0१३ मध्ये विशेष नवजात शिशू दक्षता कक्ष (एसएनसीयू)ची  स्थापना करण्यात आली. तब्बल ४८ एन्क्युबेटर असलेले ये थील ‘एसएनसीयू’ हे राज्यातील एकूण ३६ एसएनसीयूमध्ये  सर्वात मोठे आहे. येथील एसएनसीयूमध्ये दर महिन्याला मोठय़ा  संख्येने आजारी बालकांना दाखल करून घेतले जाते. एप्रिल  २0१६ ते मार्च २0१७ या एका वर्षाच्या कालावधीत या  रुग्णालयात एकूण १५९८४ बालकांनी जन्म घेतल्याची नोंद  आहे. यापैकी ४१५२ बालकांना ‘एसएनसीयू’मध्ये ठेवावे लागले. या  बालकांपैकी ४५१ बालकांना वाचविण्यात डॉक्टरांना अपयश  आले. येथे येणारी नवजात बालके कमी दिवसांची, कमी  वजनाची किंवा संसर्ग झालेली असतात, त्यामुळे या  एसएनसीयूची स्थापना झाल्यापासूनचा मृत्यूदर वाढताच आहे. येथील एसएनसीयूसाठी ४0 परिसेविकांची गरज असताना येथे  फक्त २४ परिसेविका आहेत.

‘एसएनसीयू’चा मृत्यूदर १0.८६ टक्केजिल्हा स्त्री रुग्णालयात अतिजोखमीच्या माता प्रसूतीसाठी येता त. या मातांच्या बालकांना ‘एसएनसीयू’मध्ये ठेवण्याची गरज  असते. तसेच इतर ठिकाणांहून येथे दाखल करण्यात येणारी  बालकेही अत्यंत गंभीर अवस्थेत असतात. त्यामुळे  एसएनसीयूचा मृत्यूदर हा नेहमीच जास्त राहतो. स्त्री रुग्णालया तील एसएनसीयूचा मृत्यूदर १८ टक्क्यांवरून १0.८६ टक्क्यां पर्यंत खाली आणण्यात रुग्णालय प्रशासनाला यश आल्याचा  दावा वैद्यकीय अधीक्षिका डॉ. आरती कुलवाल यांनी केला  आहे.

मानवाधिकार आयोगाने बजावली राज्य शासनाला नोटीसअकोल्याच्या जिल्हा स्त्री रुग्णालयातील ‘एसएनसीयू’मध्ये  वर्षभरात एवढय़ा मोठय़ा प्रमाणात नवजात शिशूंचा मृत्यू  झाल्याच्या वृत्ताची दखल घेत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने  राज्याच्या मुख्य सचिवांना नोटीस जारी करून सहा  आठवड्यांच्या आत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.  ‘अकोला जिल्हा स्त्री रुग्णालयात झालेल्या अनेक नवजात  बालकांच्या मृत्यूबाबतच्या बातम्यांची आपण स्वत:हून दखल  घेतलेली आहे. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात बालकांचा मृत्यू होणे हे  राज्य सरकार, रुग्णालय व्यवस्थापन आणि संबंधित विभागाच्या  निष्काळजीपणाचे निदर्शक आहे. हे नवजात बालके  आणि  त्यांच्या कुटुंबांच्या मानवाधिकाराचे गंभीर उल्लंघन  केल्यासारखेच आहे. या प्रकरणाची राज्य सरकारने ठरावीक  मुदतीत चौकशी करणे आवश्यक आहे’, असे आयोगाने म्हटले  आहे.  

‘एसएनसीयू’चा मृत्यूदर कमी करण्यासाठी आम्ही आटोकाट  प्रयत्न करीत असून, गत चार वर्षांत हा दर कमी करण्यात आम्ही  यश मिळविले आहे. आमच्या ‘एसएनसीयू’मधील बालकांचा  मृत्यूदर सामान्य आहे. याबाबत राज्य सरकारला नोटीस  बजावण्यात आल्याची माहिती मिळाली आहे; परंतु आतापर्यंत  ही नोटीस आम्हाला प्राप्त झाली नाही. - डॉ. आरती कुलवाल, वैद्यकीय अधीक्षिका, जिल्हा स्त्री रुग्णालय, अकोला.

टॅग्स :hospitalहॉस्पिटल