अकोला : अवैध नळ जोडणीद्वारे महापालिकेच्या पाण्याची चोरी करणार्या शहरातील ४५ नागरिकांविरुद्ध विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अवैध नळ जोडणीधारकांची तपासणी करणार्या पाच पथकांच्यावतीने गुन्हा दाखल करण्यात आल्याने शहरात खळबळ उडाली आहे.मनपातील जलप्रदाय विभागात केवळ २८ हजार नळ जोडणीधारकांची नोंद आहे. तर सुमारे ४० हजारपेक्षा जास्त अवैध नळ जोडण्या असल्याची माहिती आहे. याचा परिणाम पाणीपी वसुलीसह शहराच्या पाणीपुरवठ्यावर होत असल्याचे लक्षात येताच, आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी झोननिहाय पथकांची निर्मिती केली. पथकांच्या माध्यमातून अवैध नळ जोडणी धारकांचा शोध घेवून त्यांच्याविरूध्द दंडात्मक कारवाई सुरु आहे. परंतु हे प्रमाण अत्यल्प असल्याने व नागरिकांकडून सहकार्य मिळत नसल्याने उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांनी अवैध नळ जोडणीधारकांविरुद्ध थेट पोलिस तक्रार करण्याचे निर्देश दिले. त्यानुषंगाने पाच शोध पथकांनी सिव्हिल लाईन पोलिस ठाण्यात ५, सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात दहा, रामदासपेठ पोलिस ठाण्यात ५, खदान पोलिस स्टेशन येथे दहा, आकोट फैल पोलिसात ५ व जुने शहर पोलिसात दहा जणांविरुद्ध तक्रार केली असता, गुन्हे दाखल करण्यात आले.
४५ अवैध नळ जोडणीधारकांविरुद्ध गुन्हे दाखल मनपाची कारवाई; नागरिकांमध्ये खळबळ
By admin | Updated: June 20, 2014 00:28 IST