शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
6
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
7
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना कोरा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
8
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
9
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
10
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
11
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
12
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
13
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
14
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
15
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
16
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
17
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
18
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
19
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
20
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी

अकोला  जिल्ह्यातील ४१८ गावांत पाणीटंचाई निवारणाची ४०७ कामे पूर्ण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 14:41 IST

अकोला : जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी कृती आराखड्यात ५३४ गावांसाठी १ हजार ८४ उपाययोजनांची कामे प्रस्तावित असली तरी, एप्रिल अखेरपर्यंत जिल्ह्यातील ४१८ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणाची ४०७ कामे पूर्ण करण्यात आली.

ठळक मुद्दे जिल्ह्यातील ५३४ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणासाठी १ हजार ८४ उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या. या उपाययोजनांच्या कामांसाठी २६ कोटी ८५ लाख ३८ हजार रुपयांचा अपेक्षित खर्च प्रस्तावित करण्यात आला. एप्रिल अखेरपर्यंत ६०४ गावांसाठी ५४० उपाययोजनांच्या कामांना जिल्हाधिकाºयांमार्फत प्रशासकीय मान्यता देण्यात आली.

अकोला : जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी कृती आराखड्यात ५३४ गावांसाठी १ हजार ८४ उपाययोजनांची कामे प्रस्तावित असली तरी, एप्रिल अखेरपर्यंत जिल्ह्यातील ४१८ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणाची ४०७ कामे पूर्ण करण्यात आली असून, उर्वरित ६७७ कामे अद्याप प्रलंबित आहेत. पावसाळा तोंडावर आल्याच्या पृष्ठभूमीवर प्रलंबित पाणीटंचाई निवारणाची कामे केव्हा पूर्ण होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.तापत्या उन्हासोबतच अकोला जिल्ह्यातील विविध भागात पाणीटंचाईचे चटके जाणवू लागले असून, टंचाईग्रस्त गावांमधील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत विविध उपाययोजनांचा कृती आराखडा मंजूर करण्यात आला. त्यामध्ये जिल्ह्यातील ५३४ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणासाठी १ हजार ८४ उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या असून, या उपाययोजनांच्या कामांसाठी २६ कोटी ८५ लाख ३८ हजार रुपयांचा अपेक्षित खर्च प्रस्तावित करण्यात आला. कृती आराखड्यात प्रस्तावित उपाययोजनांच्या कामांसाठी संबंधित यंत्रणांच्या प्रस्तावानुसार एप्रिल अखेरपर्यंत ६०४ गावांसाठी ५४० उपाययोजनांच्या कामांना जिल्हाधिकाºयांमार्फत प्रशासकीय मान्यता देण्यात आली. त्यापैकी ४१८ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणाची ४०७ कामे पूर्ण करण्यात आली असून, उर्वरित ६७७ कामे अद्याप प्रलंबित आहेत. पावसाळा सुरू होण्यास वीस दिवसांचा कालावधी उरला असून, पाऊस सुरू झाल्यास पाणीटंचाई निवारणाची कामे करता येणार नाहीत. त्यानुषंगाने जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणाची प्रलंबित कामे पावसाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण होणार की नाही आणि टंचाईग्रस्त गावातील ग्रामस्थांना पिण्याचे पाणी उपलब्ध होणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.उपाययोजनांची केलेली  अशी आहेत कामे !जिल्ह्यातील ४१८ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांची ४०७ कामे पूर्ण करण्यात आली. त्यामध्ये विंधन विहिरी, कूपनलिका, नळ योजनांची विशेष दुरुस्ती, तात्पुरत्या पुरक नळ योजना, टँकरद्वारे पाणी पुरवठा व खासगी विहिरींचे अधिग्रहण इत्यादी उपाययोजनांच्या कामांचा समावेश आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाWaterपाणी