शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

अकोला  जिल्ह्यातील ४१८ गावांत पाणीटंचाई निवारणाची ४०७ कामे पूर्ण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 14:41 IST

अकोला : जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी कृती आराखड्यात ५३४ गावांसाठी १ हजार ८४ उपाययोजनांची कामे प्रस्तावित असली तरी, एप्रिल अखेरपर्यंत जिल्ह्यातील ४१८ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणाची ४०७ कामे पूर्ण करण्यात आली.

ठळक मुद्दे जिल्ह्यातील ५३४ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणासाठी १ हजार ८४ उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या. या उपाययोजनांच्या कामांसाठी २६ कोटी ८५ लाख ३८ हजार रुपयांचा अपेक्षित खर्च प्रस्तावित करण्यात आला. एप्रिल अखेरपर्यंत ६०४ गावांसाठी ५४० उपाययोजनांच्या कामांना जिल्हाधिकाºयांमार्फत प्रशासकीय मान्यता देण्यात आली.

अकोला : जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी कृती आराखड्यात ५३४ गावांसाठी १ हजार ८४ उपाययोजनांची कामे प्रस्तावित असली तरी, एप्रिल अखेरपर्यंत जिल्ह्यातील ४१८ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणाची ४०७ कामे पूर्ण करण्यात आली असून, उर्वरित ६७७ कामे अद्याप प्रलंबित आहेत. पावसाळा तोंडावर आल्याच्या पृष्ठभूमीवर प्रलंबित पाणीटंचाई निवारणाची कामे केव्हा पूर्ण होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.तापत्या उन्हासोबतच अकोला जिल्ह्यातील विविध भागात पाणीटंचाईचे चटके जाणवू लागले असून, टंचाईग्रस्त गावांमधील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत विविध उपाययोजनांचा कृती आराखडा मंजूर करण्यात आला. त्यामध्ये जिल्ह्यातील ५३४ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणासाठी १ हजार ८४ उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या असून, या उपाययोजनांच्या कामांसाठी २६ कोटी ८५ लाख ३८ हजार रुपयांचा अपेक्षित खर्च प्रस्तावित करण्यात आला. कृती आराखड्यात प्रस्तावित उपाययोजनांच्या कामांसाठी संबंधित यंत्रणांच्या प्रस्तावानुसार एप्रिल अखेरपर्यंत ६०४ गावांसाठी ५४० उपाययोजनांच्या कामांना जिल्हाधिकाºयांमार्फत प्रशासकीय मान्यता देण्यात आली. त्यापैकी ४१८ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणाची ४०७ कामे पूर्ण करण्यात आली असून, उर्वरित ६७७ कामे अद्याप प्रलंबित आहेत. पावसाळा सुरू होण्यास वीस दिवसांचा कालावधी उरला असून, पाऊस सुरू झाल्यास पाणीटंचाई निवारणाची कामे करता येणार नाहीत. त्यानुषंगाने जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणाची प्रलंबित कामे पावसाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण होणार की नाही आणि टंचाईग्रस्त गावातील ग्रामस्थांना पिण्याचे पाणी उपलब्ध होणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.उपाययोजनांची केलेली  अशी आहेत कामे !जिल्ह्यातील ४१८ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांची ४०७ कामे पूर्ण करण्यात आली. त्यामध्ये विंधन विहिरी, कूपनलिका, नळ योजनांची विशेष दुरुस्ती, तात्पुरत्या पुरक नळ योजना, टँकरद्वारे पाणी पुरवठा व खासगी विहिरींचे अधिग्रहण इत्यादी उपाययोजनांच्या कामांचा समावेश आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाWaterपाणी