शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
2
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
3
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
4
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
5
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
6
"मला घाबरवलं..."; पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सल्लागाराच्या घरी बॉम्बस्फोट
7
मराठी अभिनेत्रीचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल चकित! एका वर्षात घटवलं 'इतकं' वजन; म्हणाली...
8
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
9
"अरुणाचल प्रदेश आमचा होता, आहे आणि राहणार", चीनच्या 'त्या' नापाक कृत्यावर भारताने ठणकावले!
10
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार
11
युक्रेन सोडा, आता 'या' देशावर कब्जा करण्याचा पुतिन यांचा प्लॅन; सॅटेलाईट इमेजनं सीक्रेट उघडलं
12
मुंबईच्या नालेसफाईची पोलखोल, मनसेने कार्यकर्ते साकिनाक्यातील नाल्यात उतरुन व्हॉलीबॉल खेळले!
13
'बिग बॉस' हिंदी नंतर रिजेक्शचाच सामना करावा लागला, निक्की तांबोळी म्हणाली, "त्यानंतर मी..."
14
Guru Gochar 2025: गुरु गोचरमुळे आठ वर्षात बदलणार जगाचा चेहरा मोहरा, व्हायरसचीही भीती!
15
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
16
७६६ कोटी रुपयांची कमाई तरीही रेमंडचे शेअर्स ६६% आपटले; काय आहे कारण?
17
सॅल्यूट! अ‍ॅसिड हल्ल्याने गेली दृष्टी, मानली नाही हार; बारावीत मिळवले ९५%, IAS होण्याचं स्वप्न
18
"तुम्हा सर्वांना सलाम..."; तेजस्वी यादव यांचा शहीद जवान रामबाबू सिंह यांच्या भावाला Video कॉल
19
पाकिस्ताननंतर भारताचा चीनविरोधात 'डिजिटल स्ट्राईक'; ग्लोबल टाईम्सचे X अकाउंट केलं BLOCK !
20
अबब! तब्बल ४ लाखांची पोपटाची पर्स घेऊन 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये पोहोचली उर्वशी रौतेला, सर्वजण पाहतच राहिले

राज्यात रब्बीच्या ३७ टक्के पेरण्या!

By admin | Updated: November 18, 2014 23:57 IST

जीवनदान परतीच्या पावसामुळे शेतक-यांना फायदा.

ब्रह्मनंद जाधव / मेहकरराज्यात प्रदीर्घ दडीनंतर परतीचा पाऊस फिरकल्याने रब्बी हंगामातील पिकांना जीवनदान मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. राज्यात सरासरी २३ लाख ९ हजार ९१0 हेक्टर क्षेत्रावर म्हणजे ३७ टक्के रब्बी हंगामाची पेरणी पूर्ण झाली असून, त्यामध्ये गहू व हरभरा पिकाचा पेरा अत्यल्प असल्याचे दिसून येत आहे.खरीप हंगामात पावसाने दगा दिल्यामुळे शेतकर्‍यांना आर्थिक फटका बसला. तर विदर्भात सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांचा शेतीला लागलेला खर्चही भरून निघला नाही. खरीप हंगामातील झळ रब्बीत भरून काढण्यासाठी ओलिताची सोय असलेल्या शेतकर्‍यांची रब्बी पिकाची कामे जोमात सुरू आहेत; परंतु, कोरडवाहू क्षेत्रावरील शेतकरी अद्यापही जोरदार पावसाच्या प्रतीक्षेतच आहेत. राज्यात रब्बी हंगामाचे सरासरी ६२ लाख ४३ हजार हेक्टर क्षेत्र असून, त्यातील सरासरी २३ लाख ९ हजार ९१0 हेक्टर क्षेत्रावर म्हणजे ३७ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. त्यामध्ये मक्याच्या सरासरी ९९ हजार ६00 हेक्टर क्षेत्रापैकी ६५ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. शाळूचे सरासरी क्षेत्र ३0 लाख ९0 हजार असून, ४५ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. हरभरा १३ लाख ६ हजार ८00 हेक्टर क्षेत्र असून, ३५ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. गव्हाचे सरसरी क्षेत्र ११ लाख ७८ हजार ६00 असून, १0 टक्के पेरणी पूर्ण झालेली आहे. तर भाजीपाला, भुईमूग, सूर्यफूल, करडी, जवस, वाटाणा व इतर पिकांचे सरासरी ६ लाख ६७ हजार ६00 हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी केवळ २ लाख ७९ हजार ४३0 हेक्टर क्षेत्रावर भाजीपाल्यासह इतर पेरणी झाली आहे. यंदा पावसाने ओढ दिल्यामुळे लांबलेला खरीप हंगाम व परतीच्या पावसाअभावी रब्बीच्या पेरणीवर विपरीत परिणाम झाला आहे. रब्बी हंगामाच्या सुरुवातीला अनेक शेतकर्‍यांनी पेरणी करण्याचे धाडसच केले नव्हते; परंतु गत तीन ते चार दिवसांपासून राज्यात तुरळक ठिकाणी परतीचा पाऊस फिरकल्याणे शेतकर्‍यांमध्ये आता रब्बी हंगामाची आशा निर्माण झाली आहे. तर बहुतांश ठिकाणी या परतीच्या पावसामुळे शेतकर्‍यांनी रब्बी हंगामाच्या पेरणीला जोमात सुरुवात केल्याचे दिसून येत आहे.