शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
2
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
3
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
4
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
5
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
6
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
7
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
8
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
9
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
10
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
11
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
12
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
13
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
14
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
15
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
16
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
17
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
18
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
19
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
20
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 

अकोला जिल्ह्यात २.९७ लाख शेतकऱ्यांचा सात-बारा होऊ शकतो कोरा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 12:40 IST

जिल्ह्यातील २ लाख ९७ हजार ६६८ शेतकºयांचा सात-बारा कोरा होण्याची शक्यता आहे.

- संतोष येलकर लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : सरसकट कर्जमाफी करून शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करण्याचा निर्णय राज्यात सत्तारूढ झालेल्या नवीन सरकारकडून लवकरच होण्याची शक्यता आहे. त्यानुसार संपूर्ण कर्जमाफीचा निर्णय झाल्यास, जिल्ह्यात २ लाख ९७ हजार ६६८ शेतकºयांचा सात-बारा कोरा होण्याची शक्यता आहे. त्यानुषंगाने शेतकºयांना संपूर्ण कर्जमाफी देण्याचा निर्णय सरकारकडून केव्हा जाहीर होतो, याकडे आता शेतकºयांचे लक्ष लागले आहे.२८ नोव्हेंबर रोजी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तारूढ झाले असून, सरकारच्या किमान समान कार्यक्रमाची घोषणाही करण्यात आली आहे. त्यामध्ये शेतकºयांना तातडीने कर्जमाफी देण्याचे जाहीर करण्यात आले. त्यानुसार राज्यातील शेतकºयांना संपूर्ण कर्जमाफी देण्याचा निर्णय सरकारकडून लवकरच घेण्यात येणार असल्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील अकोला, अकोट, बाळापूर, बार्शीटाकळी, पातूर, तेल्हारा व मूर्तिजापूर या सातही तालुक्यांत २ लाख ९७ हजार ६६८ शेतकरी आहेत. किमान समान कार्यक्रमानुसार शेतकºयांना संपूर्ण कर्जमाफी देण्याचा निर्णय सरकारने जाहीर केल्यास जिल्ह्यातील पीक कर्ज घेतलेल्या शेतकºयांना कर्जमाफी मिळणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील २ लाख ९७ हजार ६६८ शेतकºयांचा सात-बारा कोरा होण्याची शक्यता आहे. त्यानुषंगाने शेतकºयांना संपूर्ण कर्जमाफी देण्याचा निर्णय नवीन सरकारकडून केव्हा जाहीर होतो, याकडे आता शेतकºयांचे लक्ष लागले आहे.

अडीच वर्षांपूर्वीच्या कर्जमाफीत केवळ १.३२ लाख शेतकºयांना लाभ!अडीच वर्षांपूर्वी २८ जून २०१७ रोजीच्या शासन निर्णयानुसार ३० जून २०१६ पर्यंत राज्यातील थकबाकीदार शेतकºयांना दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी जाहीर करण्यात आली होती. या कर्जमाफी योजनेत शेतकºयांकडून आॅनलाइन अर्ज भरून घेण्यात आले होते.त्यामध्ये जिल्ह्यात १ लाख ९९ हजार शेतकºयांनी आॅनलाइन अर्ज केले होते. त्यापैकी १ लाख ४५ हजार शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले होते. कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकºयांपैकी गत अडीच वर्षांत केवळ १ लाख ३२ हजार शेतकºयांना या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळाला आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीAkolaअकोला