शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आणखी हवे २४ कोटी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2020 11:19 IST

आणखी २४ कोटी ६३ लाख रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे.

अकोला: जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत वाटप करण्यासाठी पहिल्या टप्प्यात प्राप्त झालेला २६ कोटी ७८ लाख ७३ हजार रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत वितरित करण्यात आला असून, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी आणखी २४ कोटी ६३ लाख रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. त्यानुषंगाने शासनाकडून मदतनिधी प्राप्त होण्याची प्रतीक्षा केली जात आहे.

यावर्षीच्या पावसाळ्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात ६८ हजार ५७१ शेतकऱ्यांचे ५१ हजार ६६२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाईची मदत देण्यासाठी ५१ कोटी रुपयांच्या मदतनिधीची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनाकडे करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना मदत वाटप करण्यासाठी पहिल्या टप्प्यात शासनामार्फत २६ कोटी ७८ लाख ७३ हजार रुपयांचा निधी १० नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला. उपलब्ध मदतनिधी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्यातील तहसील कार्यालयांना वितरित करण्यात आला. तहसील कार्यालयांकडून शेतकऱ्यांच्या याद्या आणि मदतीची रक्कम बॅंकांमध्ये जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, २१ नोव्हेंबरपर्यंत ३३ हजार ४३८ शेतकऱ्यांच्या याद्यांसह २४ कोटी ५ लाख ७९ हजार रुपये मदतीची रक्कम बॅंकांमध्ये जमा करण्यात आली. पहिल्या टप्प्यात शासनाकडून प्राप्त मदतीची रक्कम शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया लवकरच पूर्ण होणार आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाईची मदत देण्यासाठी आणखी २४ कोटी ६३ लाख रुपयांच्या मदत निधीची आवश्यक असून, शासनाकडून मदतनिधी केव्हा प्राप्त होणार, यासंदर्भात प्रतीक्षा केली जात आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरी