शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आणखी हवे २४ कोटी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2020 11:19 IST

आणखी २४ कोटी ६३ लाख रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे.

अकोला: जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत वाटप करण्यासाठी पहिल्या टप्प्यात प्राप्त झालेला २६ कोटी ७८ लाख ७३ हजार रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत वितरित करण्यात आला असून, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी आणखी २४ कोटी ६३ लाख रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. त्यानुषंगाने शासनाकडून मदतनिधी प्राप्त होण्याची प्रतीक्षा केली जात आहे.

यावर्षीच्या पावसाळ्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात ६८ हजार ५७१ शेतकऱ्यांचे ५१ हजार ६६२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाईची मदत देण्यासाठी ५१ कोटी रुपयांच्या मदतनिधीची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनाकडे करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना मदत वाटप करण्यासाठी पहिल्या टप्प्यात शासनामार्फत २६ कोटी ७८ लाख ७३ हजार रुपयांचा निधी १० नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला. उपलब्ध मदतनिधी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्यातील तहसील कार्यालयांना वितरित करण्यात आला. तहसील कार्यालयांकडून शेतकऱ्यांच्या याद्या आणि मदतीची रक्कम बॅंकांमध्ये जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, २१ नोव्हेंबरपर्यंत ३३ हजार ४३८ शेतकऱ्यांच्या याद्यांसह २४ कोटी ५ लाख ७९ हजार रुपये मदतीची रक्कम बॅंकांमध्ये जमा करण्यात आली. पहिल्या टप्प्यात शासनाकडून प्राप्त मदतीची रक्कम शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया लवकरच पूर्ण होणार आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाईची मदत देण्यासाठी आणखी २४ कोटी ६३ लाख रुपयांच्या मदत निधीची आवश्यक असून, शासनाकडून मदतनिधी केव्हा प्राप्त होणार, यासंदर्भात प्रतीक्षा केली जात आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरी