शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
3
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
4
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
5
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
6
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
7
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
8
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
9
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
10
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
11
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
12
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
13
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
14
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
15
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
16
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
17
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
18
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
19
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
20
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?

पाणीटंचाई निवारणाच्या २०४ उपाययोजना पूर्ण, ३.५० कोटींचा खर्च, ग्रामस्थांना दिलासा

By संतोष येलकर | Updated: June 11, 2024 16:39 IST

जिल्ह्यातील १८६ गावांत उपाययोजनांची कामे

संतोष येलकर, अकोला: यंदाच्या उन्हाळ्यात मे अखेरपर्यंत जिल्ह्यात पाणीटंचाई निवारणाच्या २०४ उपाययोजनांची कामे पूर्ण करण्यात आली असून, त्यासाठी ३ कोटी ५० लाख ६ हजार रुपयांचा खर्च करण्यात आला. टंचाईग्रस्त १८६ गावांमध्ये उपाययोजनांची कामे पूर्ण करण्यात आल्याने, ग्रामस्थांना पाणीटंचाईच्या समस्येपासून दिलासा मिळाला.

यंदाच्या उन्हाळ्यात मे अखेरपर्यंतच्या कालावधीसाठी जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणाचा कृती आराखडा मंजूर करण्यात आला होता. त्यामध्ये जिल्ह्यातील २५८ गावांसाठी पाणीटंचाई निवारणाच्या विविध ५७० उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या होत्या. त्यापैकी ३१ मे अखेरपर्यंत १८६ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणाच्या २०४ उपाययोजनांची कामे पूर्ण करण्यात आली असून, जिल्ह्यातील सहा गावांमध्ये पाणीटंचाई निवारणाच्या आठ उपाययोजनांची कामे सद्य:स्थितीत सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, उपाययोजनांची कामे पूर्ण करण्यात आलेल्या संबंधित टंचाईग्रस्त गावांमधील पाणीटंचाईची समस्या कमी झाली असून, पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करणाऱ्या ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे.

पूर्ण केलेल्या उपाययोजना कामांची अशी आहे संख्या!

  • उपाययोजना - गावे - कामे

नवीन विंधन विहिरी - ८१ - ९४कूपनलिका - ८८ - ९३खासगी विहिरींचे अधिग्रहण - १७ - १७

  • आठ विंधन विहिरींची कामे सुरू!

जिल्ह्यातील सहा गावांत पाणीटंचाई निवारणासाठी आठ विंधन विहिरींची कामे सद्य:स्थितीत सुरू असून, लवकरच ही कामे पूर्ण करण्यात येणार आहेत.

  • प्रशासकीय मान्यतेनंतर करण्यात आली कामे!

पाणीटंचाई निवारणाच्या कृती आराखड्यात समाविष्ट उपाययोजनांच्या कामांचे प्रस्ताव संबंधित यंत्रणांकडून प्रशासकीय मान्यतेसाठी सादर करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर जिल्ह्यात संबंधित पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांची कामे करण्यात आली.

  • पूरक आराखड्यातील उपाययोजना पूर्ण होणार?

जिल्ह्यातील ग्रामीण भागात जून अखेरपर्यंतच्या कालावधीसाठी पाणीटंचाई निवारणाच्या पूरक कृती आराखड्याला जिल्हाधिकाऱ्यांमार्फत ५ जून रोजी मंजुरी देण्यात आली. त्यामध्ये जिल्ह्यातील २० गावांमध्ये पाणीटंचाई निवारणाच्या २० उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत; लवकरच जोरदार पाऊस सुरू होण्याची शक्यता असल्याच्या पार्श्वभूमीवर पूरक आराखड्यातील प्रस्तावित उपाययोजनांची कामे पूर्ण होणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

टॅग्स :WaterपाणीAkolaअकोला