शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
2
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
3
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
4
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
5
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
6
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
7
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
8
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
9
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
10
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
11
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
12
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
13
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
14
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
15
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये मविआ-मनसेतील ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
16
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
17
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
18
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
19
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
20
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाई निवारणाच्या २०४ उपाययोजना पूर्ण, ३.५० कोटींचा खर्च, ग्रामस्थांना दिलासा

By संतोष येलकर | Updated: June 11, 2024 16:39 IST

जिल्ह्यातील १८६ गावांत उपाययोजनांची कामे

संतोष येलकर, अकोला: यंदाच्या उन्हाळ्यात मे अखेरपर्यंत जिल्ह्यात पाणीटंचाई निवारणाच्या २०४ उपाययोजनांची कामे पूर्ण करण्यात आली असून, त्यासाठी ३ कोटी ५० लाख ६ हजार रुपयांचा खर्च करण्यात आला. टंचाईग्रस्त १८६ गावांमध्ये उपाययोजनांची कामे पूर्ण करण्यात आल्याने, ग्रामस्थांना पाणीटंचाईच्या समस्येपासून दिलासा मिळाला.

यंदाच्या उन्हाळ्यात मे अखेरपर्यंतच्या कालावधीसाठी जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणाचा कृती आराखडा मंजूर करण्यात आला होता. त्यामध्ये जिल्ह्यातील २५८ गावांसाठी पाणीटंचाई निवारणाच्या विविध ५७० उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या होत्या. त्यापैकी ३१ मे अखेरपर्यंत १८६ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणाच्या २०४ उपाययोजनांची कामे पूर्ण करण्यात आली असून, जिल्ह्यातील सहा गावांमध्ये पाणीटंचाई निवारणाच्या आठ उपाययोजनांची कामे सद्य:स्थितीत सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, उपाययोजनांची कामे पूर्ण करण्यात आलेल्या संबंधित टंचाईग्रस्त गावांमधील पाणीटंचाईची समस्या कमी झाली असून, पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करणाऱ्या ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे.

पूर्ण केलेल्या उपाययोजना कामांची अशी आहे संख्या!

  • उपाययोजना - गावे - कामे

नवीन विंधन विहिरी - ८१ - ९४कूपनलिका - ८८ - ९३खासगी विहिरींचे अधिग्रहण - १७ - १७

  • आठ विंधन विहिरींची कामे सुरू!

जिल्ह्यातील सहा गावांत पाणीटंचाई निवारणासाठी आठ विंधन विहिरींची कामे सद्य:स्थितीत सुरू असून, लवकरच ही कामे पूर्ण करण्यात येणार आहेत.

  • प्रशासकीय मान्यतेनंतर करण्यात आली कामे!

पाणीटंचाई निवारणाच्या कृती आराखड्यात समाविष्ट उपाययोजनांच्या कामांचे प्रस्ताव संबंधित यंत्रणांकडून प्रशासकीय मान्यतेसाठी सादर करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर जिल्ह्यात संबंधित पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांची कामे करण्यात आली.

  • पूरक आराखड्यातील उपाययोजना पूर्ण होणार?

जिल्ह्यातील ग्रामीण भागात जून अखेरपर्यंतच्या कालावधीसाठी पाणीटंचाई निवारणाच्या पूरक कृती आराखड्याला जिल्हाधिकाऱ्यांमार्फत ५ जून रोजी मंजुरी देण्यात आली. त्यामध्ये जिल्ह्यातील २० गावांमध्ये पाणीटंचाई निवारणाच्या २० उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत; लवकरच जोरदार पाऊस सुरू होण्याची शक्यता असल्याच्या पार्श्वभूमीवर पूरक आराखड्यातील प्रस्तावित उपाययोजनांची कामे पूर्ण होणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

टॅग्स :WaterपाणीAkolaअकोला