शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना २०० रुपये अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 16:53 IST

अकोला: राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती,खासगी बाजार समितीमध्ये कांदा विक्री केलेल्या शेतकºयांना प्रति क्विंटल २०० रुपये अनुदान वितरीत करण्याचा निर्णय सहकार,पणन व वस्त्रोद्योग विभागाने घेतला आहे.

अकोला: राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती,खासगी बाजार समितीमध्ये कांदा विक्री केलेल्या शेतकºयांना प्रति क्विंटल २०० रुपये अनुदान वितरीत करण्याचा निर्णय सहकार,पणन व वस्त्रोद्योग विभागाने घेतला आहे. त्याकरीता ११४ कोटी ८० लक्ष रुपये निधीवर १६ फेब्रुवारी रोजी शिक्कामोर्तब करण्यात आले.राज्यात सर्वाधिक कांदा उत्पादन नाशिक जिल्हा त्यानंतर पश्चिम विदर्भात घेतल्या जाते. लाल कांद्याला सर्वाधिक पसंती असली तरी मागील काही वर्षांपासून पश्चिम विदर्भात पांढºया कांद्याच्या उत्पादन क्षेत्रात वाढ झाल्याचे चित्र आहे. गतवर्षी कांद्याचे उत्पादन समाधानकारक असले तरी निसर्गाच्या अवकृपेमुळे कांदा उत्पादक शेतकºयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. एकरी २५ ते ३० क्विंटल व त्यापेक्षा जास्त उत्पादन घेणाºया कांदा उत्पादक शेतकºयांना हमीभाव तर सोडाच अक्षरश: दोन रुपये, तीन रुपये प्रति किलो दराने कांदा विकण्याची वेळ आली आहे. हमीभाव नसल्यामुळे शेतकºयांच्या पेरणीचा खर्चही निघाला नसल्याची परिस्थिती आहे. ही बाब ध्यानात घेता शासनाने १ नोव्हेंबर २०१८ ते १५ डिसेंबर २०१८ या कालावधीत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा विक्री केलेल्या शेतकºयांना प्रति क्विंटल २०० रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला. यासाठी ११४ कोटी ८० लक्ष रुपये आकस्मितता निधी वितरीत करण्यात आला आहे. २०० क्विंटल पर्यंत कांदा उत्पादन घेणारे शेतकरी या अनुदानासाठी पात्र ठरणार आहेत.रक्कम जमा करण्यासाठी अल्टीमेटमशेतकºयांना कर्जमाफी घोषित केल्यानंतर संबंधित प्रशासकीय यंत्रणेकडून कर्जमाफीची रक्कम शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्यास विलंब झाल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आली. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकºयांना मंजूर झालेले अनुदान कोणत्याही परिस्थितीत २८ फेब्रुवारी पर्यंत त्यांच्या खात्यात जमा करण्याचे स्पष्ट निर्देश शासनाने दिले आहेत. निधी वितरीत केल्यानंतर तसा अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देश आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरीonionकांदाGovernmentसरकार