शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
3
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
4
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
5
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
6
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
7
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
8
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
9
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
10
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
11
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
12
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
13
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
14
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
15
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
16
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
17
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
18
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
19
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
20
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस

ब्रदीनाथ, केदारनाथहून परतणाऱ्या महाराष्ट्रातील २ महिला भाविकांचा अपघातात मृत्यू, ३ जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2024 17:02 IST

तितक्यात वेगाने येत असलेल्या पाण्याच्या टँकरवरील चालकाचे नियंत्रण सुटले.

तेल्हारा (जि. अकोला)  - बद्रीनाथ केदारनाथ यात्रे करिता तेल्हारा येथील भाविक भक्त गेले होते परतीच्या प्रवासादरम्यान श्रीनगर येथे मुक्कामी असलेल्या हॉटेलच्या बाहेर बसलेल्या पाच महिलांना पाण्याच्या टँकरने जोरदार धडक दिली. यात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला तर तीन महिला जखमी झाल्यात. सदर घटना १३ ऑगस्ट रोजी रात्री ८ च्या सुमारास घडली 

तेल्हारा शहरातील व इतर ठिकाणचे असे १२० भाविक बद्रीनाथ केदारनाथ यात्रेकरिता गेले होते. सर्व भक्त दर्शन घेऊन परतीच्या प्रवासाकरिता निघाले असता, उत्तराखंड मधील श्रीनगर येथे रात्रीचा मुक्कामाकरिता हॉटेलमध्ये उतरले. यातील पाच महिला हॉटेलच्या समोर असलेल्या  नालीवर असलेल्या ओट्यावर बसलेल्या होत्या. तितक्यात वेगाने येत असलेल्या पाण्याच्या टँकरवरील चालकाचे नियंत्रण सुटले. प्रथम त्याने रस्त्यावर असलेल्या गाईला धडक दिली. त्यानंतर टँकर ओट्यावर चढला यात पाचही महिला टँकरच्या खाली आल्या यात. दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला तर तीन महिला जखमी झाल्यात.

मृत्यू झालेल्यामध्ये तेल्हारा येथील गौरी नरेंद्र भैय्या (४५), ललिता हरीश टावरी(४४) यांचा समावेश आहे तर जखमी झालेल्यांमध्ये सारिका राजेश राठी, संतोषी धनराज राठी, मधुबाला राजेंद्र कुमार यांचा समावेश आहे. जखमींची गाव समजू शकले नाहीत. अपघात इतका भयंकर होता की जेसीबी मदत घेऊन जखमी व मृतकाना बाहेर काढण्यात आले, अशी माहिती आहे. मृत्यू झालेल्या भाविकांवर हरिद्वार येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

टॅग्स :Accidentअपघात