शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

मुख्यमंत्री पेयजलमधून अमरावती विभागातील १९ योजनांना डच्चू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 13:59 IST

अकोला : ग्रामीण भागात स्वच्छ व पुरेसे पाणी देण्यासाठी सुरू केलेल्या मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमात निवड झालेल्या अमरावती विभागातील १९ पाणी पुरवठा योजना वगळण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

ठळक मुद्देवगळलेल्या योजनांमध्ये अमरावती विभागातील १९ योजना आहेत, तर नव्याने एकाही योजनेचा समावेश झालेला नाही. त्या योजना व्यवहार्य नसल्याच्या तसेच इतर कार्यक्रमातून त्या होत असल्याच्या सबबीखाली वगळण्यात आल्या, असे शासनाचे म्हणणे आहे.  

- सदानंद सिरसाटअकोला : ग्रामीण भागात स्वच्छ व पुरेसे पाणी देण्यासाठी सुरू केलेल्या मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमात निवड झालेल्या अमरावती विभागातील १९ पाणी पुरवठा योजना वगळण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामध्ये अकोला जिल्ह्यातील पाच योजनांचा समावेश आहे.जिल्हा परिषदांकडून प्राप्त प्रस्तावांनुसार योजनांना मंजुरी देणे, वगळणे, नव्या योजना समाविष्ट करण्यासाठी राज्याच्या पाणी पुरवठा मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीला अधिकार देण्यात आले. त्या समितीने आधी मंजुरी देत निधीची तरतूद केलेल्या तब्बल ११९ योजना मुख्यमंत्री पेयजल कार्यक्रमातून वगळण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी २६२ कोटी ६३ लाख ४४ हजार रुपये एवढा निधी खर्च अपेक्षित होता. त्या योजना वगळून नव्याने २५ योजनांचा मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनांचा समावेश करण्यात आला. विशेष म्हणजे, वगळलेल्या योजनांमध्ये अमरावती विभागातील १९ योजना आहेत, तर नव्याने एकाही योजनेचा समावेश झालेला नाही. त्या योजना व्यवहार्य नसल्याच्या तसेच इतर कार्यक्रमातून त्या होत असल्याच्या सबबीखाली वगळण्यात आल्या, असे शासनाचे म्हणणे आहे. 

अकोला जिल्ह्यातील वगळलेल्या योजनामुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमातून आधी मंजुरी मिळाली. त्यासाठी निधीची तरतूदही करण्यात आली. त्यापैकी पाच योजना वगळण्यात आल्या. त्यामध्ये शिवर (६ गावे) निधी २३ कोटी १३ लाख ४२ हजार, वाशिंबा-३६.१५ लाख, कोळंबी-३९.३१ लाख, तपलाबाद- १ कोटी ९९ लाख, कानशिवणी- १ कोटी ९९ लाख ४७ हजार रुपयांच्या निधीसह योजनांचा समावेश आहे.

 अमरावती विभागातील वगळलेल्या योजनाअमरावती जिल्हा : भंडारज ता. अंजनगाव सुर्जी, आखतवाडी, सुकळी, बोराळा, कवठा कडू, ढोमणबर्डावाशिम : चांडस, मुंगळा, उंबर्डा बाजार, आसेगाव, शिवणी दलेलपूर, कळंबा.बुलडाणा : रोकडिया नगर नळ पाणी पुरवठा योजना, जलंब.

 नव्यांपैकी २० योजना पश्चिम महाराष्ट्रातमुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेत मंजूर असलेल्या ११९ पैकी विदर्भातील ३७ योजना वगळण्यात आल्या. त्यामध्ये अमरावती विभागातील १९ तर नागपूर विभागातील १८ योजना आहेत. त्याचवेळी नव्याने मंजुरी दिलेल्या २५ योजनांमध्ये विदर्भातील एकाही योजनेचा समावेश नाही. त्यामध्ये मराठवाड्यातील केवळ पाच योजना आहेत. त्यामध्ये जालना-२, औरंगाबाद, परभणी, बीड जिल्ह्यातील प्रत्येकी एक योजना आहे, तर २० पाणी पुरवठा योजना पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर व सांगली या दोनच जिल्ह्यातील आहेत.

टॅग्स :AkolaअकोलाAmravatiअमरावतीWaterपाणी