शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

मुख्यमंत्री पेयजलमधून अमरावती विभागातील १९ योजनांना डच्चू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 13:59 IST

अकोला : ग्रामीण भागात स्वच्छ व पुरेसे पाणी देण्यासाठी सुरू केलेल्या मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमात निवड झालेल्या अमरावती विभागातील १९ पाणी पुरवठा योजना वगळण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

ठळक मुद्देवगळलेल्या योजनांमध्ये अमरावती विभागातील १९ योजना आहेत, तर नव्याने एकाही योजनेचा समावेश झालेला नाही. त्या योजना व्यवहार्य नसल्याच्या तसेच इतर कार्यक्रमातून त्या होत असल्याच्या सबबीखाली वगळण्यात आल्या, असे शासनाचे म्हणणे आहे.  

- सदानंद सिरसाटअकोला : ग्रामीण भागात स्वच्छ व पुरेसे पाणी देण्यासाठी सुरू केलेल्या मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमात निवड झालेल्या अमरावती विभागातील १९ पाणी पुरवठा योजना वगळण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामध्ये अकोला जिल्ह्यातील पाच योजनांचा समावेश आहे.जिल्हा परिषदांकडून प्राप्त प्रस्तावांनुसार योजनांना मंजुरी देणे, वगळणे, नव्या योजना समाविष्ट करण्यासाठी राज्याच्या पाणी पुरवठा मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीला अधिकार देण्यात आले. त्या समितीने आधी मंजुरी देत निधीची तरतूद केलेल्या तब्बल ११९ योजना मुख्यमंत्री पेयजल कार्यक्रमातून वगळण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी २६२ कोटी ६३ लाख ४४ हजार रुपये एवढा निधी खर्च अपेक्षित होता. त्या योजना वगळून नव्याने २५ योजनांचा मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनांचा समावेश करण्यात आला. विशेष म्हणजे, वगळलेल्या योजनांमध्ये अमरावती विभागातील १९ योजना आहेत, तर नव्याने एकाही योजनेचा समावेश झालेला नाही. त्या योजना व्यवहार्य नसल्याच्या तसेच इतर कार्यक्रमातून त्या होत असल्याच्या सबबीखाली वगळण्यात आल्या, असे शासनाचे म्हणणे आहे. 

अकोला जिल्ह्यातील वगळलेल्या योजनामुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमातून आधी मंजुरी मिळाली. त्यासाठी निधीची तरतूदही करण्यात आली. त्यापैकी पाच योजना वगळण्यात आल्या. त्यामध्ये शिवर (६ गावे) निधी २३ कोटी १३ लाख ४२ हजार, वाशिंबा-३६.१५ लाख, कोळंबी-३९.३१ लाख, तपलाबाद- १ कोटी ९९ लाख, कानशिवणी- १ कोटी ९९ लाख ४७ हजार रुपयांच्या निधीसह योजनांचा समावेश आहे.

 अमरावती विभागातील वगळलेल्या योजनाअमरावती जिल्हा : भंडारज ता. अंजनगाव सुर्जी, आखतवाडी, सुकळी, बोराळा, कवठा कडू, ढोमणबर्डावाशिम : चांडस, मुंगळा, उंबर्डा बाजार, आसेगाव, शिवणी दलेलपूर, कळंबा.बुलडाणा : रोकडिया नगर नळ पाणी पुरवठा योजना, जलंब.

 नव्यांपैकी २० योजना पश्चिम महाराष्ट्रातमुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेत मंजूर असलेल्या ११९ पैकी विदर्भातील ३७ योजना वगळण्यात आल्या. त्यामध्ये अमरावती विभागातील १९ तर नागपूर विभागातील १८ योजना आहेत. त्याचवेळी नव्याने मंजुरी दिलेल्या २५ योजनांमध्ये विदर्भातील एकाही योजनेचा समावेश नाही. त्यामध्ये मराठवाड्यातील केवळ पाच योजना आहेत. त्यामध्ये जालना-२, औरंगाबाद, परभणी, बीड जिल्ह्यातील प्रत्येकी एक योजना आहे, तर २० पाणी पुरवठा योजना पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर व सांगली या दोनच जिल्ह्यातील आहेत.

टॅग्स :AkolaअकोलाAmravatiअमरावतीWaterपाणी