शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! नेपाळ्यांचा भारतीय सीमेत घुसून हल्ला; वनविभागाच्या पाच चौक्या जाळल्या
2
उद्याची सकाळ दरवाढीच्या झटक्यांची; टोलनंतर आता अमूलचे दूध २ रुपयांनी महागले
3
लोकसभेचे मतदान संपताच टोल दरात मोठी वाढ; आज मध्यरात्रीपासून लागू करण्याचे आदेश
4
जगन मोहन रेड्डींची खुर्ची धोक्यात; आंध्र प्रदेशच्या एक्झिट पोलनुसार भाजपा सत्तेत येण्याची दाट शक्यता
5
महत्वाचा अलर्ट! आयकर विभागाची L&T वर कारवाई; उद्या शेअर बाजारावर परिणाम होण्याची शक्यता 
6
"होय, मला भारताचा कोच व्हायला आवडेल, यापेक्षा मोठा...", गौतम गंभीरनं सोडलं मौन
7
ओडिशा विधानसभेत BJP आणि BJD यांच्यात टाय; दोन्ही पक्षांना 62-80 जागा मिळण्याची शक्यता
8
'देश वाचवण्यासाठी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
9
एक्झिट पोल जाहीर होताच भाजपात गेलेल्या आप आमदाराने राजीनामा मागे घेतला
10
"संघाच्या शाखेत जाऊनही मी डाव्या विचारसरणीचा कारण...", आशुतोष गोखलेने मांडले राजकीय विचार
11
"एक्झिट पोलमध्ये अटलजी, पण पंतप्रधान बनले मनमोहन सिंग", काँग्रेस नेत्याचा मोठा दावा
12
सिक्कीमध्ये सत्ताधारी SKM चा दणदणीत विजय; भाजपचे सर्व उमेदवार पराभूत
13
अदा शर्मा सुशांतसिंह राजपूतच्या फ्लॅटमध्ये झाली शिफ्ट, म्हणाली, "या घरात मला..."
14
एनडीए ३९७ पार! एक्झिट पोलनंतर लगेचच e-मतदानाचा निकाल आला; पहा महाराष्ट्रात काय परिस्थिती?
15
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
16
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
17
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
18
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
19
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
20
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांना खोचक टोला

काटेपूर्णा धरणात आता १.८० टक्केच जलसाठा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2018 2:07 PM

अकोला : अकोला शहराची लाइफलाइन काटेपूर्णा धरणात केवळ १.८० टक्केच जिवंत जलसाठा शिल्लक आहे. हा जलसाठा काही दिवसांपुरता उरल्याने अकोलेकरांचे डोळे नभाकडे लागले आहेत.

ठळक मुद्देकाटेपूर्णा धरणात तर रविवार, ३ जून रोजी १.८० टक्केच जलसाठा शिल्लक होता. त्यामुळेच सर्वत्र पावसाची प्रतीक्षा आहे; अन्यथा अकोला शहरावरील पाणीटंचाईचे संकट वाढणार आहे. जुलै, आॅगस्टच्या पावसाच्या जोरावर धरणे भरायला सप्टेंबर उजाडावा लागणार आहे.

अकोला : अकोला शहराची लाइफलाइन काटेपूर्णा धरणात केवळ १.८० टक्केच जिवंत जलसाठा शिल्लक आहे. हा जलसाठा काही दिवसांपुरता उरल्याने अकोलेकरांचे डोळे नभाकडे लागले आहेत.वाण धरण सोडले, तर जिल्ह्यातील धरणातील जलसाठा संपण्याच्या मार्गावर आहे. काटेपूर्णा धरणात तर रविवार, ३ जून रोजी १.८० टक्केच जलसाठा शिल्लक होता. यात अर्धा गाळ आहे. त्यामुळेच सर्वत्र पावसाची प्रतीक्षा आहे; अन्यथा अकोला शहरावरील पाणीटंचाईचे संकट वाढणार आहे. महापालिकेत समाविष्ट केलेल्या गावात दहा दिवसांनंतर ग्रामपंचायतने बांधलेल्या छोट्या पाण्याच्या टाकीतून केवळ दीड ते दोन मीटर पाणी सोडले जात आहे. गुडधी गाव हे त्याचे एक उदाहरण आहे. या गावाला १० ते १५ दिवसांतून एकदा पाणी पुरवठा केला जात असून, १५ ते २० मिनिटच पाणी मिळत असल्याने या गावातील नागरिकांना पाणी विकत घ्यावे लागत आहे.जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील निर्गुणा व मूर्तिजापूर तालुक्यातील उमा या मध्यम स्वरू पाच्या धरणामध्ये शून्य साठा असून, पातूर तालुक्यातीलच मोर्णा धरणात केवळ ६.३७ टक्के जलसाठा शिल्लक असून, मूर्तिजापूर तालुक्यातील घुंगशी बॅरेजमध्ये ११.२९ टक्केच जलसाठा उपलब्ध आहे. तेल्हारा तालुक्यातील वाण धरणात सध्या ६२.९७ टक्के बऱ्यापैकी जलसाठा शिल्लक आहे. दरम्यान, जूनच्या शेवटच्या पंधरवड्यात पावसाला सुरुवात झाली. तरी जुलै, आॅगस्टच्या पावसाच्या जोरावर धरणे भरायला सप्टेंबर उजाडावा लागणार आहे. त्यामुळे मृत जलसाठा उपसावा लागणार असल्याचे वृत्त आहे. त्यासाठीची तयारी महापालिका प्रशासनाने केली असल्याचे सांगण्यात येत आहे.

१.८० टक्के पाणी उरले असले, तरी काटेपूर्णा धरणात ११.३२ दलघमी मृतजलसाठा आहे. त्यात ६.३२ दलघमीवर गाळ आहे. जिवंत जलसाठा संपला, तरी उर्वरित मृत साठा वापरात येईल. तोपर्यंत पाऊस येण्याची शक्यता आहे. पण, पाण्याचे आता काटेकोर नियोजन व वापर करणे गरजेचे आहे.जयंत शिंदे,कार्यकारी अभियंता,पाटबंधारे विभाग,अकोला. 

 

टॅग्स :AkolaअकोलाKatepurna Damकाटेपूर्णा धरण