शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

१७७ गावांत पाणीटंचाई निवारणाची १९८ कामे पूर्ण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2019 14:06 IST

१७७ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणासाठी १९८ उपाययोजनांची कामे पूर्ण करण्यात आली असून, उर्वरित ३७१ उपाययोजनांची कामे अद्याप प्रलंबित आहेत.

अकोला: जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारण कृती आराखड्यात प्रस्तावित उपाययोजनांच्या कामांपैकी ४ मे पर्यंत १७७ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणासाठी १९८ उपाययोजनांची कामे पूर्ण करण्यात आली असून, उर्वरित ३७१ उपाययोजनांची कामे अद्याप प्रलंबित आहेत.जिल्ह्यातील अकोला, अकोट, बाळापूर, बार्शीटाकळी, पातूर, तेल्हारा व मूर्तिजापूर या सातही तालुक्यातील विविध भागात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली असून, पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे. या पृष्ठभूमीवर यावर्षी जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणाच्या कृती आराखड्यात जिल्ह्यातील ४४६ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणासाठी विविध ५६९ उपाययोजनांची कामे प्रस्तावित करण्यात आली. पाणीटंचाई निवारण कृती आराखड्यातील प्रस्तावित उपाययोजनांच्या कामांपैकी ४ मेपर्यंत प्रत्यक्षात जिल्ह्यातील १७७ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणाची कामे पूर्ण करण्यात आली असून, उर्वरित २६९ गावांमधील पाणीटंचाई निवारणासाठी ३७१ उपाययोजनांची कामे अद्याप प्रलंबित आहेत. त्यानुषंगाने कृती आराखड्यात प्रस्तावित उपाययोजनांच्या कामांपैकी प्रलंबित पाणीटंचाई निवारणाची कामे केव्हा पूर्ण होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.उपाययोजनांची अशी पूर्ण करण्यात आली कामे!उपाययोजना                            गावे                 कामेनवीन विंधन विहिरी                 ३४                    ३८कूपनलिका                               ६९                    ७४तात्पुरती पूरक नळ योजना       ०१                   ०१खासगी विहिरींचे अधिग्रहण      ७१                   ८३टँकरद्वारे पाणीपुरवठा             ०२                    ०२........................................................................एकूण                                      १७७                    १९८‘या’ गावांत सुरू आहे टँकरद्वारे पाणीपुरवठा!जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील पाणीटंचाईग्रस्त पुनोती बु. आणि देवदरी (वरखेड) या दोन गावांमध्ये ४ मेपासून दोन टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषदwater scarcityपाणी टंचाई