शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

'आम्ही अकोलेकरां'चे दोन दिवसांत १६५० वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 14:45 IST

आम्ही अकोलेकर... या बॅनरखाली दोन दिवसांपासून सुरू करण्यात आलेल्या अभियानास अकोलेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत १,६५० वृक्षांचे रोपण केले.

अकोला: वाढते तापमान आणि हुलकावणी देत असलेल्या पावसाचे ऋृतुचक्र नियमित ठेवायचे असेल तर वृक्षारोपणाशिवाय पर्याय नाही. ही बाब अकोलेकरांना पटवून सांगण्यासोबत मनपा स्थायी समिती सभापती विनोद मापारी यांनी वृक्षारोपण अभियान सुरू केले आहे. आम्ही अकोलेकर... या बॅनरखाली दोन दिवसांपासून सुरू करण्यात आलेल्या अभियानास अकोलेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत १,६५० वृक्षांचे रोपण केले.केवळ वृक्षारोपणच नव्हे तर वृक्ष संवर्धनाची जबाबदारी प्रत्येकाने पार पाडावी, असे आवाहन करण्यात आल्याने अकोल्यातील निसर्ग संवर्धन करण्याकरिता अनेक सामाजिक संघटना पुढे आल्यात. मापारी यांचा मित्र परिवार, गायत्री परिवार, रोटरी क्लब आॅफ अकोला, अ‍ॅग्रोसिटी, मनपा प्रभाग क्र.२० मधील महिला मंडळ, स्वस्तिक गृह निर्माण सोसायटी, आस्था योग फाउंडेशन, निसर्ग वैभव संस्था, अकोला ग्रीन क्लब आर्मी, हॉकी अकोला असोसिएशन, पहाट बहूद्देशीय संस्था,आयएमए अकोला, शुभम करोती फाउंडेशन, जय बाभळेश्वर ग्रुप डाबकी रोड, मोरेश्वर फाउंडेशन या सामाजिक संघटनांनी वेळापत्रक तयार करून दोन दिवसात १,६५० वृक्षांचे रोपण केले. विशेष म्हणजे ही मोहीम सुरू असताना कार्यकर्त्यांच्या जेवणाची सुविधा एका मंगल कार्यालयात दररोज करण्यात येत आहे. दोन दिवसांत १,६५० वृक्षांचे रोपण महानगरातील आयटीआय कॉलेज परिसरात, गोरक्षण मार्गावरील नेहरू पार्क समोरील मेडिकल कर्मचारी वसाहतीत, गोरक्षण मार्गावरी कॉलनी परिसरात, बिसेन यांच्या खुल्या प्लॉटमध्ये, माधव नगर, हनुमान मंदिर, निवारा कॉलनी, संतोष नगरातील शिव हनुमान मंदिर परिसरात, संत नगर, खडकी येथे, टीटीएन कॉलेज जवळ, केशव नगर परिसरातील बाळ काळणे यांच्या घरासमोर, दुर्गादेवी मंदिराजवळ, जुने खेतान नगर परिसरात, गणपती मंदिर, कौलखेड स्मशानभूमी परिसरात करण्यात आले. 

 

टॅग्स :Akolaअकोलाenvironmentपर्यावरण