शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

युतीच्या सत्ताकाळात राज्यात १६ हजार शेतकरी आत्महत्या - शरद पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2019 19:10 IST

राज्यात १६ हजार शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मानोरा येथे बुधवारी केली.

मानोरा: भाजप-सेना युती सरकारच्या सत्ताकाळात राज्यात १६ हजार शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मानोरा येथे बुधवारी केली. आपल्या पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित जाहीरसभेत ते बोलत होते.मानोरा येथे आयोजित सभेत शरद पवार यांनी राज्य सरकारच्या धोरणावर टिका केली. ते म्हणाले की, शेतकरी विविध संकटानी घेरला असताना राज्यशासन मात्र मागील पाच वर्षात केलेल्या कायार्चा खोटा लेखाजोखा जनतेसमोर मांडत फिरत आहे. या सरकारच्या काळात शेतकरी आत्महत्यांमध्ये आघाडीवर असून, गेल्या पाच वर्षात १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. ही बाब केंद्र सरकारने ऊघड केलेल्या आकडेवारीवरूनच स्पष्ट झाली आहे. शेतकºयांना सरसकट कर्जमाफी दिल्याचा गवगवा राज्य सरकार करीत आहे , पण प्रत्यक्षात एकूण कर्जदार शेतकºयांपैकी केवळ ३१ टक्के शेतकºयांनाच कर्जमाफी मिळाली. शेतकरी कर्जात बुडत असताना देशाच्या सरकारने ऊद्योगासाठी ८० हजार कोटीची तरतूद करण्याचे ठरविले आहे. सरकारने नोटबंदीच्या माघ्यमातून काळापैसा बाहेर काढण्याचे आश्वासन दिले; परंतु देशातील चलनात असलेल्या ९१ लाख कोटीच्या चलनाशिवाय काहीच बाहेत आले नाही, असेही पवार म्हणाले. त्या शिवाय या सरकाच्या काळात ऊद्येगधंदे बंद पडले बेरोजगारी वाढली, महिला अत्याचारातही वाढ झाली. याबाबतही त्यांनी आपल्या भाषणात उल्लेख केला.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारwashimवाशिमManoraमानोरा