शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
2
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
3
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
4
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
5
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
6
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
7
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
8
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
9
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
10
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
11
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
12
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
13
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
14
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
15
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
16
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
17
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
18
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
19
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
20
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
Daily Top 2Weekly Top 5

१२० रास्तभाव दुकानांमध्ये पोहोचले नाही धान्य!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 14:36 IST

९४० रास्तभाव दुकानांमध्ये धान्याचा पुरवठा करण्यात आला असून, उर्वरित १२० रास्तभाव दुकानांमध्ये अद्याप धान्य पोहोचले नाही.

- संतोष येलकर

अकोला: सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत शिधापत्रिकाधारक लाभार्थींना दरमहा रास्त भावाने धान्य वितरित करण्यासाठी दरमहा २५ तारखेपर्यंत रास्तभाव दुकानांमध्ये धान्याचा पुरवठा होणे आवश्यक असताना, जिल्ह्यातील १ हजार ६० रास्तभाव दुकानांपैकी ३ जूनपर्यंत ९४० रास्तभाव दुकानांमध्ये धान्याचा पुरवठा करण्यात आला असून, उर्वरित १२० रास्तभाव दुकानांमध्ये अद्याप धान्य पोहोचले नाही. त्यामुळे रास्तभाव दुकानांमार्फत शिधापत्रिकाधारक लाभार्थींना धान्याचे वितरण रखडले असून, धान्याचा लाभ केव्हा मिळणार, याबाबत शिधापत्रिकाधारक लाभार्थींकडून प्रतीक्षा केली जात आहे.सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंर्गत प्राधान्य गटातील शिधापत्रिकाधारक लाभार्थी, अंत्योदय योजनेंतर्गत शिधापत्रिकाधारक लाभार्थी आणि एपीएल केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना दरमहा गहू, तांदूळ, साखर, तूर डाळ, हरभरा डाळ इत्यादी धान्याचे वितरण करण्यात येते. त्यानुषंगाने जून महिन्यात जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांना धान्य वितरित करण्यासाठी गहू व तांदुळाचा ८१ हजार २६० क्विंटल धान्यसाठा मंजूर करण्यात आला. जिल्ह्यातील १ हजार ६० रास्तभाव दुकानदारांनी धान्य पुरवठ्यासाठी धान्याच्या रकमेचा चालानद्वारे भरणाही केला. प्रत्येक महिन्यात २५ तारखेपर्यंत जिल्ह्यातील रास्तभाव दुकानांमध्ये धान्याचा पुरवठा करण्यात येतो; मात्र ३ जूनपर्यंत जिल्ह्यातील १ हजार ६० रास्तभाव दुकानांपैकी ९४० दुकानांमध्ये धान्याचा पुरवठा करण्यात आला असून, उर्वरित जिल्ह्यातील १२० रास्तभाव दुकानांमध्ये अद्याप धान्य पोहोचले नाही. त्यामुळे संबंधित रास्तभाव दुकानांद्वारे शिधापत्रिकाधारक लाभार्थींना रास्त भावाच्या धान्याचे वितरण सुरू करण्यात आले नाही. त्यानुषंगाने रास्त भावाच्या धान्याचा लाभ केव्हा मिळणार, याबाबत शिधापत्रिकाधारक लाभार्थींकडून प्रतीक्षा केली जात आहे.जिल्ह्यात असे आहेत शिधापत्रिकाधारक लाभार्थी!प्राधान्य गट : १०,५६,७१४अंत्योदय योजना : ४५,०५६एपीएल शेतकरी : २,५२,९३०असा मंजूर आहे धान्यसाठा!जिल्ह्यातील श्धिापत्रिकाधारक लाभार्थींसाठी जून महिन्यात ८१ हजार २६० क्विंटल धान्याचा साठा मंजूर करण्यात आला आहे. त्यामध्ये प्राधान्य गटातील शिधापत्रिकाधारकांसाठी गहू ३१ हजार ७१० क्विंटल व २१ हजार १३० क्विंटल तांदूळ, अंत्योदय योजनेंतर्गत शिधापत्रिकाधारकांसाठी गहू ६ हजार ७५० क्विंटल व तांदूळ ९ हजार २० क्विंटल आणि एपीएल शेतकरी शिधापत्रिकाधारकांसाठी गहू १० हजार १२० क्विंटल व तांदूळ २ हजार ५३० क्विंटल धान्य साठ्याचा समावेश आहे.धान्य पुरवठा केलेली अशी आहेत दुकाने!जिल्ह्यातील एकूण १ हजार ६० रास्तभाव दुकानांपैकी ३ जून पर्यंत ९४० रास्तभाव दुकानांना धान्याचा पुरवठा करण्यात आला. त्यामध्ये अकोला शहरातील ७६, अकोला ग्रामीण १३२, अकोट तालुक्यातील १४१, तेल्हारा तालुक्यातील ९९, बाळापूर तालुक्यातील ११४, पातूर तालुक्यातील ९४, मूर्तिजापूर तालुक्यातील १६३ व बार्शीटाकळी तालुक्यातील १२७ रास्तभाव दुकानांचा समावेश आहे. उर्वरित १२० रास्तभाव दुकानांना अद्याप धान्याचा पुरवठा करण्यात आला नाही.दरमहा २५ तारखेपर्यंत रास्तभाव दुकानांमध्ये धान्याचा पुरवठा होणे आवश्यक आहे; मात्र जिल्ह्यातील बहुतांश रास्तभाव दुकानांमध्ये ३ जूनपर्यंत धान्य पोहोचले नाही. धान्याचे वितरण सुरू झाले नसल्याने, शिधापत्रिकाधारक लाभार्थींमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.-शत्रुघ्न मुंडेजिल्हाध्यक्ष, रास्तभाव दुकानदार संघटनाजिल्ह्यातील रास्तभाव दुकानांमध्ये करण्यात आलेल्या धान्य पुरवठ्याचा आढावा मंगळवारी घेण्यात येणार आहे. ज्या दुकानांमध्ये धान्य पोहोचले नाही, अशा रास्तभाव दुकानांना तातडीने धान्याचा पुरवठा करण्यात येईल तसेच रास्तभाव दुकानांद्वारे तातडीने शिधापत्रिकाधारक लाभार्थींना धान्याचे वितरण करण्यात येणार आहे.-गजानन सुरंजेउपजिल्हाधिकारी तथा प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola District Collector officeअकोला जिल्हाधिकारी कार्यालय