शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Election 2026: "राज ठाकरेंची भाषणं भारी, पण कामाच्या नावानं पाटी कोरी" असं कुणी म्हटलं? 
2
भाईंदरमध्ये आचार संहितेचा भंग, आठ दिवसानंतर गुन्हा दाखल, लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट!
3
Pakistan Accident: पाकिस्तानमध्ये भीषण अपघात; खेळाडूंना घेऊन जाणाऱ्या बसची व्हॅनला धडक, १५ जणांचा मृत्यू
4
'लोकपाल'साठी आता ५ कोटी रुपयांच्या बीएमडब्ल्यू कार खरेदी केल्या जाणार नाहीत; निविदा केल्या रद्द
5
Nagpur: सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांना महापालिकेचा दणका; एकाच दिवसात ४४ जणांवर कारवाई!
6
Google: नव्या वर्षात गुगल पिक्सेल १० खरेदी करा आणखी स्वस्तात; फ्लिपकार्टची जबरदस्त ऑफर्स!
7
"उत्तर भारतीयांना मारहाण करणाऱ्यांना अटक करा, नाहीतर..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचा इशारा
8
Nagpur: पूर्व नागपुरात ‘तूतू-मैमै’, खोपडे पिता-पुत्र आमदार वंजारींवर बरसले
9
इराणमध्ये लोक रस्त्यावर उतरले, सुरक्षा जवानांसोबत झटापट; काही जण दगावले, नेमकं काय घडले?
10
दुर्गापूजा, जन्माष्टमी, सरस्वती पूजन... सगळ्या सुट्या रद्द ! बांग्लादेशमध्ये हिंदूंवर आघात
11
Switzerland Blast: स्वित्झर्लंडमधील बारमधील स्फोट, दहशतवादी हल्ला की आणखी काही? पोलिसांनी केला मोठा खुलासा; आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू
12
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील सिद्धीविनायकाचे घेतले दर्शन, पाहा फोटो
13
रोहित–विराटच्या निवृत्तीनंतर वनडे क्रिकेटच संपणार? अश्विन म्हणाला, FIFA फॉर्म्युलाच ठरेल 'तारणहार'
14
विरोधकांचे अर्ज ठरवून बाद करायचे आणि महायुतीचे बिनविरोध विजयी करायचे हे षडयंत्र, मनसेचा आरोप
15
Viral Video: स्टेडियमला पोहोचण्यासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंवर आली टॅक्सीला धक्का मारण्याची वेळ
16
Jammu and Kashmir Champions League: भारतीय क्रिकेटपटूच्या हेल्मेटवर पॅलेस्टिनी ध्वज, पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं, कोण आहे तो?
17
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पेट्रोल टाकून केला हल्ला
18
तेजस्वी घोसाळकरांविरोधात मैत्रीणच रिंगणात! उद्धव ठाकरेंनी 'या' महिलेला दिली उमेदवारी 
19
Ahilyanagar: मनसेच्या दोन उमेदवारांचे अपहरण? पक्षाची कोतवाली पोलीस ठाण्यात धाव!
20
सावधान! फास्ट फूड बेतलं जीवावर; बर्गर, नूडल्स खाणाऱ्या विद्यार्थिनीचा मेंदूत २० गाठी झाल्याने मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

दहावी पुनर्रचित अभ्यासक्रम, मूल्यमापनाच्या तासिकांचे नियोजन तयार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 13:44 IST

शालेय स्तरावर अभ्यासक्रम, मूल्यमापन आणि तासिकांचे नियोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देनियोजनामध्ये विद्यार्थ्यास तीन भाषा विषय असणे अनिवार्य केले आहेत. दहावीचे अंतिम मूल्यमापन १००/५० गुणांच्या लेखी परीक्षेनुसार होणार आहे.

अकोला : २०१८-१९ या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांसाठी पुनर्रचित अभ्यासक्रमानुसार नवीन पाठ्यपुस्तकांची निर्मिती करण्यात आल्यावर पुनर्रचित अभ्यासक्रम, विषययोजना, मूल्यमापन आणि तासिकांचे नियोजन करण्याचे निर्देश राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार शालेय स्तरावर अभ्यासक्रम, मूल्यमापन आणि तासिकांचे नियोजन करण्यात आले आहे.शैक्षणिक वर्ष २०१८-१९ साठी नव्याने पाठ्यपुस्तके प्रकाशित करण्यात आल्यावर, दहावीच्या पुनर्रचित अभ्यासक्रम, मूल्यमापनाच्या तासिकांचे नियोजनामध्ये विद्यार्थ्यास तीन भाषा विषय असणे अनिवार्य केले आहेत. त्याप्रमाणे प्रथम भाषा, द्वितीय भाषा व तृतीय भाषेचा समावेश आहे. १०० गुणांच्या भाषा विषयामध्ये १०० गुण लेखी परीक्षा, तर ५० गुणांच्या भाषा विषयासाठी ५० गुण लेखी परीक्षा, तर दोन्ही सत्र परीक्षेत स्वतंत्रपणे ५० गुणांचे अंतर्गत मूल्यमापन अशी विभागणी करण्यात आली. दहावीचे अंतिम मूल्यमापन १००/५० गुणांच्या लेखी परीक्षेनुसार होणार आहे. दहावीसाठी मराठी माध्यमांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना इंग्रजी (तृतीय) ऐवजी इंग्रजी (प्रथम) भाषा अभ्यासण्याची पर्यायी सोय उपलब्ध केली आहे. प्रथम भाषा इंग्रजी की मराठी, हे निवडण्याचे स्वातंत्र्य विद्यार्थ्यांना दिले आहे. या भाषांसह इतर भाषांसाठी कृतिपत्रिका तयार करून मूल्यमापन करावे. गणित भाग १ व २ (बीजगणित व भूमिती) हा विषय १०० गुणांचा असून, या १०० गुणांमध्ये ८० गुण लेखी परीक्षा व २० गुण अंतर्गत मूल्यमापनासाठी दिले आहेत. विज्ञान व तंत्रज्ञान विषयाची दोन स्वतंत्र पाठ्यपुस्तके असून, लेखी परीक्षेसाठी पेपर १ व २ साठी प्रत्येकी ४० गुणाच्या स्वतंत्र्य प्रश्नपत्रिका असतील. उर्वरित २० गुण प्रात्यक्षिकाचे राहतील. सामाजिक शास्त्रे विषयामध्ये इतिहास, राज्यशास्त्र मिळून एक आणि भूगोल विषय मिळून एक अशी दोन पुस्तके आहेत. इतिहासाला ४०, राज्यशास्त्र २० गुण व भूगोल ४०, असे एकूण १०० गुणांची परीक्षा राहील. तसेच एनएसक्युएफचे व्यवसाय विषयाला ३० गुण लेखी परीक्षा आणि ७० गुण प्रात्यक्षिक परीक्षेप्रमाणे आहेत. या सर्व विषयांनुसार शालेय स्तरावर अभ्यासक्रम, मूल्यमापन आणि तासिकांचे नियोजन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)दहावीचा पुनर्रचित अभ्यासक्रम हा कृतींवर आधारित आहे. शाळांना दिलेल्या सूचनांनुसार जिल्ह्यातील माध्यमिक शाळांनी दहावीचा अभ्यासक्रम, मूल्यमापन आणि तासिकांचे नियोजन केले आहे.- प्रकाश मुकुंद, शिक्षणाधिकारीमाध्यमिक, जि.प. अकोला

 

टॅग्स :AkolaअकोलाEducationशिक्षणexamपरीक्षा