शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
2
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
3
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
4
Ishant Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
5
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
6
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
7
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
8
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
9
हा घ्या पुरावा! पाकिस्तान पुसतोय 'ऑपरेशन सिंदूर'च्या खुणा; एअर बेसवरील बिल्डिंग लाल ताडपत्रीने झाकली
10
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
11
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
12
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
13
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
14
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
15
Wang Kun: दारू नाही, पार्टी नाही, आहारही साधा...; तरीही प्रसिद्ध बॉडीबिल्डरचा वयाच्या ३० व्या वर्षी मृत्यू!
16
प्रज्ञा सातव यांच्या भाजपा प्रवेशावरून काँग्रेसची टीका; नेते म्हणाले, “हे स्वार्थी लोक...”
17
कार घेण्याचं स्वप्न आता होणार पूर्ण! पाहा कोणत्या बँकेत मिळतंय सर्वात स्वस्त 'कार लोन'
18
Vijay Hazare Trophy : IPL मधील 'अनसोल्ड' खेळाडूच्या कॅप्टन्सीत खेळणार KL राहुल! करुण नायरलाही 'प्रमोशन'
19
Video - लेकीच्या जन्मानंतर बाबांचा आनंद गगनात मावेना; ‘धुरंधर’ स्टाईलमध्ये केला भन्नाट डान्स
20
पळपुट्या विजय माल्याच्या वाढदिवसानिमित्त ललित मोदीने दिली जंगी पार्टी, सोशल मीडियावर झाले ट्रोल
Daily Top 2Weekly Top 5

१0४ शेतकर्‍यांना फवारणीतून विषबाधा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 02:15 IST

अकोला : पिकांवर कीटकनाशकांची फवारणी करताना  विषबाधा होण्याचे प्रमाण अलिकडच्या काळात वाढले असून,  जिल्हय़ात चालू खरीप हंगामात आतापर्यंत १0४ शेतकरी, शे तमजुरांना विषबाधा झाली आहे.  जून महिन्यापासून हा प्रकार  सुरू झाला असून, सप्टेंबर अखेरपर्यंत येथील शासकीय  वैद्यकीय महाविद्यालय आणि सवरेपचार रुग्णालयात फवारणी तून विषबाधा झालेल्या एकूण १३0 शेतकर्‍यांपैकी १0४ जण  जिल्हय़ातील होते. गत चार महिन्यात सवरेपचारमध्ये दाखल  एकूण विषबाधितांपैकी आठ जणांचा मृत्यू झाला असून, त्या पैकी पाच शेतकरी अकोला जिल्हय़ातील असल्याची ध क्कादायक माहिती समोर आली आहे.

ठळक मुद्देजूनपासून सुरू झाला प्रकार पाच दगावले, ‘सवरेपचार’मध्ये उपचार

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : पिकांवर कीटकनाशकांची फवारणी करताना  विषबाधा होण्याचे प्रमाण अलिकडच्या काळात वाढले असून,  जिल्हय़ात चालू खरीप हंगामात आतापर्यंत १0४ शेतकरी, शे तमजुरांना विषबाधा झाली आहे.  जून महिन्यापासून हा प्रकार  सुरू झाला असून, सप्टेंबर अखेरपर्यंत येथील शासकीय  वैद्यकीय महाविद्यालय आणि सवरेपचार रुग्णालयात फवारणी तून विषबाधा झालेल्या एकूण १३0 शेतकर्‍यांपैकी १0४ जण  जिल्हय़ातील होते. गत चार महिन्यात सवरेपचारमध्ये दाखल  एकूण विषबाधितांपैकी आठ जणांचा मृत्यू झाला असून, त्या पैकी पाच शेतकरी अकोला जिल्हय़ातील असल्याची ध क्कादायक माहिती समोर आली आहे.पिकांवरील किडींचे नियंत्रण करण्यासाठी शेतकर्‍यांकडून  रासायनिक औषधांची फवारणी केली जाते. खरीप हंगामातील  कपाशी, सोयाबीन, मूग, उडीद, ज्वारी या पिकांवर किडीचा  मोठय़ा प्रमाणात प्रादुर्भाव होतो.  सध्या पश्‍चिम विदर्भात दमट,  उष्ण व प्रखर ऊन अशा प्रकारचे वातावरण आहे. बहुतांश शे तकर्‍यांनी कपाशीची लागवड ओळीने केली आहे. काही भागात  कपाशीच्या सर्वसाधारण वाढीपेक्षा १ ते १.५ फूट जास्तीची वाढ  (४.५ ते ६ फूट) झाली आहे. त्यामुळे ही कपाशी दाटली असून,  पिकात सहज शिरता येत नाही. कपाशीच्या शेतात खेळती हवा  येत नसल्याने  पिकामधील सूक्ष्म वातावरण रसशोषक व  बोंडअळ्यांना पोषक  ठरत आहे. या किडींचा नायनाट  करण्यासाठी शेतकरी कीटकनाशकांच्या फवारणीला प्राधान्य दे तात. कीड तत्काळ नष्ट व्हावी, यासाठी जहाल रासायनिक  औषधांची फवारणी करण्याकडे शेतकर्‍यांचा कल असतो.  फवारणी करताना विषबाधा होण्याचे प्रकार जून महिन्यापासूनच  सुरू झाले आहेत. जून महिन्यात सवरेपचार रुग्णालयात फक्त  दोन विषबाधित रुग्ण दाखल झाले होते. जुलै महिन्यात पाच  रुग्ण, ऑगस्टमध्ये २६ तर सप्टेंबर महिन्यात ९७ असे एकूण  १३0 विषबाधित रुग्ण ‘सवरेपचार’मध्ये दाखल झाले होते.  यामध्ये १0४ रुग्ण हे अकोला जिल्हय़ातील, १७  बुलडाणा  जिल्हय़ातील, तर प्रत्येकी ४ रुग्ण अमरावती व वाशिम  जिल्हय़ातील होते. यवतमाळमधील एका रुग्णासही या कालावधीत ‘सवरे पचार’मध्ये दाखल करण्यात आले होते. या १३0 रुग्णांपैकी ८  रुग्ण दगावले; मात्र १२२ रुग्णांना वाचविण्यात यश आल्याची  माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.  राजेश कार्यकर्ते यांनी दिली.

सर्वाधिक विषबाधा सप्टेंबरमध्ये!फवारणीतून विषबाधा होण्याचा प्रकार जून महिन्यापासून सुरू   झाला असला, तरी सर्वाधिक विषबाधा सप्टेंबर महिन्यात  झाल्याचे ‘जीएमसी’कडील आकडेवारीवरून निदर्शनास येते.  सप्टेंबर महिन्यात विषबाधा झालेले ९७ रुग्ण ‘सवरेपचार’मध्ये  दाखल झाले होते. सप्टेंबर महिन्यात आठ रुग्णांचा मृत्यू झाला  असून, यामध्ये पाच अकोला जिल्हय़ातील, दोन वाशिम, तर  एक अमरावती जिल्हय़ातील रुग्णाचा समावेश आहे.