शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

पहिली ते आठवीतील १ लाख ३८ विद्यार्थ्यांना मिळणार पाठ्यपुस्तके!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 10:36 IST

Education Sector News : इयत्ता पहिली ते आठवीतील १ लाख ३८ विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जाणार आहेत.

- नितीन गव्हाळे

अकोला: समग्र शिक्षा योजनेंतर्गत जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके देण्यात येतात. परंतु गत दोन वर्षांपासून शिक्षण विभागाने पाठ्यपुस्तकांच्या पुनर्वापरावर भर दिला आहे. यंदा ५ हजारावर पालकांनी शाळांमध्ये वापरलेली पाठ्यपुस्तके परत केली. तसेच गतवर्षीच्या तुलनेत यंदा पाठ्यपुस्तकांची मागणीसुद्धा कमी झाली असून, यावेळेस इयत्ता पहिली ते आठवीतील १ लाख ३८ विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जाणार आहेत. कोरोना प्रादुर्भावामुळे गतवर्षीच्या मार्च महिन्यापासून शाळा-महाविद्यालये बंद आहेत. कोरोनामुळे अनेक कुटुंबांनी गावी स्थलांतर गेले. शेकडो मजूर, कामगार परप्रांत, परजिल्ह्यात परतले. त्यामुळे शेकडो मुलांना शाळा सोडावी लागली. शाळांमधील पटसंख्या घसरली. शाळा बंद असल्यामुळे ऑनलाइन शिक्षणावर भर देण्यात येत असल्याने, समग्र शिक्षा योजनेंतर्गत यंदा विद्यार्थी संख्या पाहता आणि पाठ्यपुस्तकांच्या पुनर्वापरावर भर दिल्यामुळे यावर्षी पाठ्यपुस्तकांची मागणी २३ हजारांनी कमी झाली आहे. शिक्षण विभागाने केलेल्या आवाहनानुसार ५ हजार ३६ पालकांनी त्यांच्या पाल्यांनी वापरलेली पाठ्यपुस्तके शाळांमध्ये आणून दिली. या पाठ्यपुस्तकांचा फेरवापर पुढील वर्गात जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी होणार आहे. गतवर्षी समग्र शिक्षा योजनेंतर्गत १ लाख ६० हजार ८७१ शालेय विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले होते. यंदाच्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थी संख्येत झालेली घट आणि पाठ्यपुस्तकांच्या पुनर्वापरामुळे इयत्ता पहिली ते आठवीतील १ लाख ३८ हजार २२६ विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके दिली जाणार आहे. पाठ्यपुस्तक महामंडळाकडून येत्या आठ दिवसांमध्ये पुस्तके पाठविण्यात येणार आहेत. त्यानंतर ही पुस्तके पंचायत समितीमार्फत शाळांमध्ये पाठविण्यात येणार आहेत.

अशी दिली जाणार पुस्तके

इ. १ ली- १३,९०७

इ.२ री- १४,३९०

इ. ३ री- १४,९५६

इ. ४ थी- १५,६५३

इ. ५ वी- १९,०८९

इ. ६ वी- १९,३४४

इ. ७ वी- २०,४३६

इ. ८ वी- २०,४५१

एकूण शाळा- १,४८८

एकूण विद्यार्थी- १,५७,१९८

 

२८ जून रोजी विद्यार्थ्यांविना शाळा सुरू होणार आहे. कोरोनामुळे ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. मजूर, कामगार व नोकरदारांनी स्थलांतर केल्यामुळे शाळांमधील पटसंख्येवर परिणाम झाला आहे. तसेच पाठ्यपुस्तके पुनर्वापरचा उपक्रम सुरू केल्यामुळे यंदा १ लाख ३८ विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके देण्यात येतील.

-डाॅ. वैशाली ठग, शिक्षणाधिकारी प्राथमिक

पाठ्यपुस्तकांच्या पुनर्वापराच्या उपक्रमामुळे पाच हजारावर पालकांनी पुस्तके शाळांकडे परत केली. पुढील वर्गात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना ही पुस्तके दिली जातील. त्यामुळे यंदा आपण पुस्तकांची मागणी कमी नोंदविली. १० जुलैपर्यंत शाळांना पाठ्यपुस्तकांचे वितरण पूर्ण होईल.

-नंदकिशोर लहाने, सहायक कार्यक्रम अधिकारी

समग्र शिक्षा अभियान

टॅग्स :AkolaअकोलाEducation Sectorशिक्षण क्षेत्रStudentविद्यार्थी