शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
2
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
3
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
4
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
5
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
6
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
7
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
8
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
9
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
10
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
11
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
12
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
13
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
14
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
15
फेल, फेल, सपशेल...! होंडाने Activa ईव्ही जानेवारीत आणली, आता उत्पादन बंद केले; गिऱ्हाईकच मिळेना...
16
दीपिकाच्या ८ तासांची शिफ्ट अटीवर रेणुका शहाणेची प्रतिक्रिया; म्हणाली, "अमान्य असेल तर..."
17
Uddhav Thackeray : "भाजपा कपट कारस्थान करणारा पक्ष, भाषिक प्रांतावादाचं विष...", उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
18
‘प्रत्येक विधानसभेत ५०,००० मतं कापण्याचा कट’, अखिलेश यादवांचे भाजपा, निवडणूक आयोगावर गंभीर आरोप  
19
हेडचे टी-२० स्टाईल शतक, पहिल्या ॲशेस कसोटीत ऑस्ट्रेलियाचा सनसनाटी विजय
20
मुक्ता बर्वे ४६ व्या वर्षीही अविवाहित; म्हणाली, "आधी स्थळं यायची अन् आताही येतात पण..."
Daily Top 2Weekly Top 5

पहिली ते आठवीतील १ लाख ३८ विद्यार्थ्यांना मिळणार पाठ्यपुस्तके!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 10:36 IST

Education Sector News : इयत्ता पहिली ते आठवीतील १ लाख ३८ विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जाणार आहेत.

- नितीन गव्हाळे

अकोला: समग्र शिक्षा योजनेंतर्गत जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके देण्यात येतात. परंतु गत दोन वर्षांपासून शिक्षण विभागाने पाठ्यपुस्तकांच्या पुनर्वापरावर भर दिला आहे. यंदा ५ हजारावर पालकांनी शाळांमध्ये वापरलेली पाठ्यपुस्तके परत केली. तसेच गतवर्षीच्या तुलनेत यंदा पाठ्यपुस्तकांची मागणीसुद्धा कमी झाली असून, यावेळेस इयत्ता पहिली ते आठवीतील १ लाख ३८ विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जाणार आहेत. कोरोना प्रादुर्भावामुळे गतवर्षीच्या मार्च महिन्यापासून शाळा-महाविद्यालये बंद आहेत. कोरोनामुळे अनेक कुटुंबांनी गावी स्थलांतर गेले. शेकडो मजूर, कामगार परप्रांत, परजिल्ह्यात परतले. त्यामुळे शेकडो मुलांना शाळा सोडावी लागली. शाळांमधील पटसंख्या घसरली. शाळा बंद असल्यामुळे ऑनलाइन शिक्षणावर भर देण्यात येत असल्याने, समग्र शिक्षा योजनेंतर्गत यंदा विद्यार्थी संख्या पाहता आणि पाठ्यपुस्तकांच्या पुनर्वापरावर भर दिल्यामुळे यावर्षी पाठ्यपुस्तकांची मागणी २३ हजारांनी कमी झाली आहे. शिक्षण विभागाने केलेल्या आवाहनानुसार ५ हजार ३६ पालकांनी त्यांच्या पाल्यांनी वापरलेली पाठ्यपुस्तके शाळांमध्ये आणून दिली. या पाठ्यपुस्तकांचा फेरवापर पुढील वर्गात जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी होणार आहे. गतवर्षी समग्र शिक्षा योजनेंतर्गत १ लाख ६० हजार ८७१ शालेय विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले होते. यंदाच्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थी संख्येत झालेली घट आणि पाठ्यपुस्तकांच्या पुनर्वापरामुळे इयत्ता पहिली ते आठवीतील १ लाख ३८ हजार २२६ विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके दिली जाणार आहे. पाठ्यपुस्तक महामंडळाकडून येत्या आठ दिवसांमध्ये पुस्तके पाठविण्यात येणार आहेत. त्यानंतर ही पुस्तके पंचायत समितीमार्फत शाळांमध्ये पाठविण्यात येणार आहेत.

अशी दिली जाणार पुस्तके

इ. १ ली- १३,९०७

इ.२ री- १४,३९०

इ. ३ री- १४,९५६

इ. ४ थी- १५,६५३

इ. ५ वी- १९,०८९

इ. ६ वी- १९,३४४

इ. ७ वी- २०,४३६

इ. ८ वी- २०,४५१

एकूण शाळा- १,४८८

एकूण विद्यार्थी- १,५७,१९८

 

२८ जून रोजी विद्यार्थ्यांविना शाळा सुरू होणार आहे. कोरोनामुळे ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. मजूर, कामगार व नोकरदारांनी स्थलांतर केल्यामुळे शाळांमधील पटसंख्येवर परिणाम झाला आहे. तसेच पाठ्यपुस्तके पुनर्वापरचा उपक्रम सुरू केल्यामुळे यंदा १ लाख ३८ विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके देण्यात येतील.

-डाॅ. वैशाली ठग, शिक्षणाधिकारी प्राथमिक

पाठ्यपुस्तकांच्या पुनर्वापराच्या उपक्रमामुळे पाच हजारावर पालकांनी पुस्तके शाळांकडे परत केली. पुढील वर्गात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना ही पुस्तके दिली जातील. त्यामुळे यंदा आपण पुस्तकांची मागणी कमी नोंदविली. १० जुलैपर्यंत शाळांना पाठ्यपुस्तकांचे वितरण पूर्ण होईल.

-नंदकिशोर लहाने, सहायक कार्यक्रम अधिकारी

समग्र शिक्षा अभियान

टॅग्स :AkolaअकोलाEducation Sectorशिक्षण क्षेत्रStudentविद्यार्थी