अजय डांगे / अकोलाइतर शासकीय कर्मचार्यांप्रमाणे ड्युटीचे तास निश्चित नसणे; शिवाय रिक्त पदांमुळे रजा न मिळणे, सुविधांचाअभाव, अशा प्रतिकूल परिस्थितीमुळे गुन्हे निकाली निघण्याचे प्रमाण घटले असल्याचे २00९ ते २0१३ या कालावधीतील आकडेवारीवर नजर टाकल्यास दिसून येते. सन २0१३च्या सुरुवातीला राज्यात एकूण ३ लाख ४८ हजार ८९९ गुन्हे तपासावर प्रलंबित होते. यापैकी २ लाख १५ हजार ९५१ गुन्हे निकाली काढण्यात आले. हे प्रमाण ६१.९ टक्के ऐवढे होते. सन २0१३ या वर्ष अखेरीस एकूण १ लाख ३२ हजार ९१३ गुन्हे तपासावर प्रलंबित होते. संपूर्ण राज्यातच दिवसेंदिवस गुन्हे घडण्याचे प्रमाण वाढतच आहे. वाढती बेरोजगारी, व्यसनाधिनता, सभोवतालची परिस्थिती, अशिक्षितता, असुरक्षिततेची भावना, गुन्हेगारी जगतावर अबाधित राहावे आदी कारणामुंळे गुन्हेगारीमुळे वाढ होत असल्याचे मत सामाजिक क्षेत्रातील जाणकारांकडून व्यक्त होत आहे. सन २0१३ या वर्षात राज्यात १७ हजार ३११ गंभीर गुन्ह्यांचे तपास प्रलंबित होते. यामध्ये खून १ हजार ३८२, बलात्कार-१ हजार १९७, अपहरण-१ हजार ९२६, दरोडा-६६४, दंगल- ४ हजार ३६६ हुंडाबळी-१00, छेडखानी- ३ हजार १४७, लौंगिक शोषण-१ हजार १३६ आणि विवाहितेचा पती किंवा नातेवाईकांकडून झालेल्या छळाचे ३ हजार ३६३ गुन्हे प्रलंबित होते.पोलिसांकडून महिला अत्याराचे गुन्हे निकाली काढण्याचे प्रमाण वाढले आहे. सन २0१३मध्ये विवाहितेचा पती किंवा नातेवाईकांकडून होणार्या छळाचे ६९.४ टक्के गुन्हे निकाली काढण्यात आले. विनयभंग-६७.७ आणि हुंडाबळीची गुन्हे निकाली निघाल्याचे प्रमाण ७७ टक्के एवढे आहे. रेल्वे परिक्षेत्रतही मुंबई अव्वलरेल्वे परिक्षेत्रांमध्ये सन २0१३मध्ये १ हजार ६८१ गुन्हे तपासावर प्रलंबित होते. रेल्वे परिक्षेत्र गुन्हेमुंबई ६८६पुणे ३६५नागपूर ६३0मुंबईत सर्वात जास्त गुन्हे प्रलंबितमहानगरांचा (आयुक्तालय) विचार केल्यास राज्यात मुंबईत सर्वात जास्त गुन्हे तपासावर प्रलंबित आहेत. महानगरगुन्हेनागपूर ४४५८पुणे ४५८३ठाणे ६७३२मुंबई ५१0२0नाशिक १४६२औरंगाबाद १७४१सोलापूर ८८0नवी मुंबई १७५८अमरावती ९८0
राज्यात १ लाख ३२ हजार ९१३ गुन्हे प्रलंबित
By admin | Updated: December 14, 2014 23:59 IST