शहरं
Join us  
Trending Stories
1
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
2
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
3
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
4
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
5
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
6
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
7
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
8
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात
9
अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...
10
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
11
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
12
Mumbai Indians Probable Playing XI, IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्ससाठी आज 'करो या मरो'; हार्दिक करणार संघात २ महत्त्वाचे बदल, 'या' खेळाडूंना डच्चू?
13
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
14
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
15
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
16
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
17
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
18
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
19
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
20
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा

वांबोरी चारीचे पाणी शेवटपर्यंत पोहोचेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 5:14 PM

वांबोरी पाईप चारीचे पाणी अद्यापही पाथर्डी तालुक्यातील अखेरच्या टप्यातील गावांपर्यंत पोहोचलेले नाही.

अहमदनगर : वांबोरी पाईप चारीचे पाणी अद्यापही पाथर्डी तालुक्यातील अखेरच्या टप्यातील गावांपर्यंत पोहोचलेले नाही. काही तलावांत दिवसातून दोन तास पाणी पडते व नंतर पुन्हा गुडूप होते, अशी शेतकऱ्यांची तक्रार आहे. प्रशासनाच्या आशीर्वादाने पाणी चोरी होत असल्यानेच अखेरपर्यंत पाणी पोहोचत नाही, असा आरोप आहे.वांबोरी चारीचे पाणी पाथर्डी तालुक्यात पोहोचत नसल्याने आंदोलन करण्याचा इशारा शेतकºयांनी दिला होता. यासंदर्भात मुळा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रावसाहेब मोरे व पाथर्डीचे तहसीलदार यांनी या गावांत भेटी देऊन पाणी पोहोचविण्याबाबत सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्या आश्वासनानुसार पाणी पोहोचलेले नाही, अशी गावांची तक्रार आहे. पांगरमलपर्यंत पाणी आले. तेथून पुढे दोन चाºया जातात. त्यापैकी मिरी व शंकरवाडी या परिसरातील चारीचे पाणी या गावांतील तलावांपर्यंत पोहोचलेले नाही. मढीच्या दिशेने आलेल्या चारीचे पाणी केवळ लोहसरपर्यंत आलेले आहे. त्यापुढे जोहारवाडी, भोसे, करंजी, घाटशिरस, तिसगाव, शिरापूर या भागात पाणी आलेले नाही. काही तलावांत दिवसातून फक्त एक ते दोन तास पाणी पडते.चारीवर मोठ्या प्रमाणावर पाणी चोरी सुरु आहे. जलसंपदा विभागाने कंत्राटी कामगार देखरेखीसाठी नियुक्त केले असून ते पाणीचोरीकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आहे. काही ठिकाणी पाणीचोरांकडून आर्थिक मोबदला घेऊन त्यांना संरक्षण दिले जात असल्याचाही संशय आहे.पाणीचोरांवर गुन्हे दाखल करा, अशी मागणी या गावांनी केली आहे. बाळासाहेब अकोलकर, मच्छिंद्र सावंत, बंडू पाठक, राहुल गवळी, अभिजीत शिंदे, संतोष आठरे, राजेंद्र अकोलकर, सागर पाठक, भुजंग शिंदे, संदीप अकोलकर, संभाजीराव वाघ, भगवान मरकड, विष्णू मरकड, संभाजी सरोदे, भाऊसाहेब पाठक, बंडू अकोलकर, विष्णू मरकड, भगवान मरकड, सचिन मरकड या शेतकºयांनी सोमवारी मोरे यांची भेट घेऊन पाणी पोहोचविण्याची मागणी केली आहे.पाणी न पोहोचल्यास शेतकरी कोणत्याही क्षणी आंदोलन पुकारतील, असे शेतकºयांनी सांगितले. शासनाने फसवणूक केल्याने कुणी शेतकºयाने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्यास त्यास शासन जबाबदार राहील, असा इशाराही शेतकºयांच्या शिष्टमंडळाने दिला आहे. पाणी चोरांवर गुन्हे का दाखल होत नाहीत? असा प्रश्न या गावांनी केला आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर