शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथं मोदी जातील तिथं मविआ जिंकेल, संजय राऊतांचा दावा; भाजपावरही साधला निशाणा
2
कोस्टल रोड आणि सी-लिंकला जोडणारा दुसरा महाकाय गर्डर यशस्वीरित्या बसवला! 
3
Giriraj Singh : "काँग्रेसला देशात इस्लामिक स्टेट बनवायचाय; राहुल-सोनिया गांधी देश सोडून पळून जाणार"
4
सचिन तेंडुलकर यांच्याकडे अंगरक्षक असलेल्या सीआरपीएफ जवानाची गोळी झाडून आत्महत्या
5
उद्धव ठाकरेंनी दोनदा फसवण्याचा प्रयत्न केला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा
6
मोदींच्या सभेपूर्वी ठाकरे गटाचे पाच कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; अज्ञात स्थळी नजरकैदेत
7
Gautam Adani साठी 'अच्छे दिन', शेअर्सवर गुतवणूकदार तुटून पडले; बनला कमाईचा विक्रम
8
Sita Navami 2024: सीता माई जनकाला मिळाली तो दिवस सीता नवमी; या दिवशी उपास का करावा? वाचा!
9
धक्कादायक! आंध्र प्रदेशात भीषण अपघात, महामार्गावर बस-ट्रकची धडक, सहा जणांचा होरपळून मृत्यू
10
उमेदवार भाजपचा! सभेनंतर शिंदे गट- ठाकरे गट भिडले; वाकोल्यात 'गद्दार'वरून तणाव
11
Mobile Tariff Hike : निवडणुकांनंतर वाढणार Mobile चं बिल, पाहा किती होईल Jio, Airtel आणि Vi रिचार्ज? 
12
इन्स्टाग्राम रील्सच्या मदतीने ५५ लाखांची चोरी; मुंबई पोलिसांनी रायगडमधून दोन तरुणींना अटक
13
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; सिप्लाच्या शेअरमध्ये बंपर तेजी, HDFC आपटला
14
"त्या पेट्रोल पंपावर शाळेच्या मुलांनी भरलेली व्हॅन असती तर?", घाटकोपर दुर्घटनेवरून शशांक संतापला
15
"घे बोकांडी, कर दहिहंडी म्हणणाऱ्या याच..."; मनसे नेते प्रकाश महाजनांचा सुषमा अंधारेंवर पलटवार
16
'बजरंगी भाईजान'ची मुन्नी झाली १०वी पास! टक्के किती मिळाले माहित्येय?
17
Post Office मध्ये ₹२०००, ₹३००० आणि ₹५००० ची RD करायची आहे? पाहा मॅच्युरिटीवर किती पैसे मिळतील?
18
अरविंद केजरीवाल पहिल्यांदाच करणार काँग्रेसचा प्रचार; आज दिल्लीत घेणार जाहीर सभा
19
Baba Ramdev Patanjali Foods : बाबा रामदेव यांच्या कंपनीला मोठा झटका, मार्च तिमाहीत २२ टक्क्यांनी घसरला नफा 
20
बीसीसीआय सेहवाग, गंभीरला डावलणार? मुख्य प्रशिक्षक पदासाठी व्हीव्हीएस लक्ष्मण देखील इच्छुक

Ramdas Athawale: रामदास आठवले लोकसभा निवडणुक लढवणार? म्हणाले, शिर्डीतून लढायचंय, पण पडायचं नाही

By साहेबराव नरसाळे | Published: August 18, 2022 6:08 PM

Ramdas Athawale: " २००९ साली शिर्डीत विखेंचा पाठिंबा मिळाला असता तर तेव्हा आपण पडलोच नसतो. आता शिर्डीतून पुन्हा लढायचं आहे, पण पडायचं नाही, असे सांगत केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी शिर्डीच्या जागेवर आपला हक्क सांगितला.

अहमदनगर - २००९ साली शिर्डीत विखेंचा पाठिंबा मिळाला असता तर तेव्हा आपण पडलोच नसतो. आता शिर्डीतून पुन्हा लढायचं आहे, पण पडायचं नाही, असे सांगत केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी शिर्डीच्या जागेवर आपला हक्क सांगितला.

आठवले हे गुरुवारी (दि. १८) अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर आले होते. त्यावेळी येथील शासकीय विश्रामगृहावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, शिर्डीतून पुन्हा लढण्याची आपली इच्छा आहे. पण आता पडायचं नाही. २००९ साली बाळासाहेब विखे यांना दक्षिणेतून लढायचं होतं. पण राष्ट्रवादीने त्यांना जागा सोडली नाही. त्यामुळे विखे यांनी शिर्डीत आपल्याला पाठिंबा दिला नाही. त्यांनी पाठिंबा दिला असता तर त्याचवेळी आपण पडलो नसतो. पण आता चित्र वेगळं आहे, असे ते म्हणाले.

राज्यातील शिवसेनेतील वादावर बोलताना आठवले म्हणाले, एकनाथ शिंदे यांचीच खरी शिवसेना आहे. त्यांना ४० आमदार, १२ खासदारांचा पाठिंबा आहे. त्यामुळे धनुष्यबाणाचे चिन्हही त्यांनाच मिळायला हवे. सर्वोच्च न्यायालयातून त्यांना न्याय मिळेल, असा आशावाद आठवले यांनी व्यक्त केला.

मेटे यांच्या अपघाताबाबत संशयशिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांनी मराठा समाजाचा आवाज बुलंद केला. मराठा आरक्षणासाठी त्यांनी संघर्ष केला. मराठा आरक्षणाच्या बैठकीसाठी जात असताना त्यांच्या गाडीला अपघात होऊन त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू संशयास्पद आहे. या अपघाताची सीआयडी चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे केली आहे, असे आठवडले म्हणाले.राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांनी माफी मागावीराजस्थानात एका शाळकरी मुलाला पाणी पिण्याच्या कारणावरुन शिक्षकाने बेदम मारहाण केली. यात त्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. ही बाब अत्यंत गंभीर आहे. त्या शिक्षकाला फाशीची शिक्षा व्हावी. राजस्थानात दलितांवर अत्याचार वाढत असूनही मुख्यमंत्री राजस्थानात इतर राज्यांच्या तुलनेत दलितांवर अत्याचार होत नाहीत, असे सांगतात. त्यांचे विधान अत्यंत खेदजनक आहे. त्यांनी दलित समाजाची माफी मागावी, असे आठवले म्हणाले.नितीशकुमार पुन्हा भाजपसोबत येतीलबिहारमध्ये झालेल्या सत्तांतराबाबत आठवले म्हणाले, नितीशकुमार यांनी यापूर्वी लालूप्रसाद यांना धोका दिलेला आहे. नितीशकुमार यांच्या पक्षाने कमी जागा जिंकूनही भाजपने त्यांना मुख्यमंत्रीपद दिले. मात्र, त्यांनी भाजपला धोका देऊन पुन्हा लालूप्रसाद यांच्या आरजेडीसोबत युती केली आहे. दोन वर्षात ते आरडीजेडीला धोका देतील व भाजपसोबत येतील. नितीशकुमार यांना धोका देण्याची जुनीच सवय आहे.लोकशाही नव्हे, घोटाळेबाज धोक्यातईडीकडून होत असलेल्या कारवायांबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आठवले म्हणाले, ईडी ज्यांच्याविरोधात पुरावे सापडत आहेत, त्यांच्याविरोधात कारवाई होत आहे. यात भाजपचा काडीचाही संबंध नाही. इथे लोकशाही धोक्यात असल्याची आवई उठवली जात आहे. पण लोकशाही धोक्यात नाही तर घोटाळेबाज धोक्यात आहेत

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेshirdi-pcशिर्डीPoliticsराजकारण