शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ११ वाजेपर्यंत कुठे किती झाले मतदान?
2
...म्हणून शरद पवारांनी अचानक यू टर्न घेतला; मुख्यमंत्रिपदाची डील? आणखी एक नवा दावा
3
महाराष्ट्राच्या संघर्षाच्या इतिहासात राज ठाकरेंचं नाव राहणार नाही; संजय राऊतांची जळजळीत टीका
4
हेलिकॉप्टर अपघातात इराणचे राष्ट्रपती रईसी यांचा मृत्यू; परराष्ट्र मंत्र्यांसह राज्यपालांनीही गमावला जीव
5
PM Modi Share Market : ४ जूननंतर शेअर बाजार नव्या शिखरावर असेल, PM मोदींनी गुंतवणूकदारांना दिला अनोखा सल्ला
6
उद्धव ठाकरेंचा निर्णय चुकीचा, मतदानातून जनता दाखवणार; राहुल शेवाळेंचा निशाणा
7
"त्यांना पराभवाची चाहूल लागलीय"; बोगस मतदानाचा आरोप करणाऱ्या विचारेंवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार
8
'ही मॅन'नेही बजावला मतदानाचा हक्क, ८८ वर्षीय धर्मेंद्र पोहोचले मतदान केंद्रावर; Video व्हायरल
9
नंदुरबारचा रहिवासी.. गुजरातमध्ये GST अधिकारी, साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; कुणीच केला नाही तपास
10
Som Pradosh 2024: नशिबाची साथ मिळत नसेल तर आज सोम प्रदोष व्रत करा,भाग्य बदलेल; वाचा व्रतविधी!
11
Nrusinha Jayanti 2024: २१ मे नृसिंह जयंती: भगवान विष्णुंच्या नृसिंह अवतारामागे दडलेले रहस्य जाणून घ्या!
12
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live ठाण्यात बोगस मतदानासाठी दीड हजार लोक आणून ठेवलेत; राजन विचारेंचा गंभीर आरोप
13
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
14
Credit Cardच्या १६ अंकांमध्ये लपलीयेत 'ही' ४ रहस्यं; काहीच लोकांना माहितीये याचा अर्थ, पाहा
15
ऐश्वर्याच्या हाताची होणार सर्जरी? फ्रॅक्चर असूनही Cannes फिल्म फेस्टिव्हलमध्ये झालेली सहभागी 
16
Maharashtra Lok Sabha Election 2024 राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
17
Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
18
सहा ठिकाणी शिंदेसेना VS उद्धवसेना; लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील १३ मतदारसंघांमध्ये आज मतदान
19
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
20
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात

मनसे सोबत आल्यास स्वागतच, पण एकच अट; प्रवीण दरेकरांची खुली ऑफर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2020 7:55 PM

हिंदुत्वाच्या मुद्यावर भाजपसोबत कुणीही आले तरी त्यांना सोबत घेऊ. मनसे सोबत आल्यास त्यांचेही स्वागतच आहे, अशी एकप्रकारे खुली आॅफरच भाजपचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना नगर येथे पत्रकारांशी बोलताना दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर : हिंदुत्वाच्या मुद्यावर भाजपसोबत कुणीही आले तरी त्यांना सोबत घेऊ. मनसे सोबत आल्यास त्यांचेही स्वागतच आहे, अशी एकप्रकारे खुली आॅफरच भाजपचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना नगर येथे पत्रकारांशी बोलताना दिली.विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते दरेकर रविवारी नगर दौºयावर आले होते. त्यांनी पाथर्डी तालुक्यातील भारजवाडी येथील आत्महत्याग्रस्त शेतकºयाच्या कुटुंबीयांची भेट घेऊन एक लाख रुपयांची मदत दिली. ही भेट घेतल्यानंतर शासकीय विश्रामगृहात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आमदार मोनिका राजळे, जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, शाम पिंपळे आदी उपस्थित होते. मुंबई महापालिकेतील निवडणुकीबाबत पत्रकारांनी छेडले असता दरेकर म्हणाले, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप सरकारच्या एनआरसी आणि सीएए कायद्याचे समर्थनच केलेले आहे. त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा प्रखरपणे मांडला असून, हिंदुत्वाच्या मुद्यावर जे कोणी भाजपसोबत येतील त्यांचे स्वागतच आहे. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र आलेले मुंबईतील सुशिक्षित मतदारांना आवडलेले नाही. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीत सुशिक्षित मतदार भाजपाच्या बाजूने राहिल, असे सूतोवाचही दरेकर यांनी केले. शिवसेनेच्या सहयोगी अल्पसंख्याक मंत्रीनवाब मलिक यांनी मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी मान डोलावून मुस्लिम आरक्षणाचे समर्थन केले. महाविकास आघाडीतील आबू आझमी यांनीही मुख्यमंत्र्यांसोबत राम मंदिराबरोबरच मशिदीतही जाणार असल्याचे सांगितले. याशिवाय राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मशिदीसाठीचे ट्रस्ट स्थापन करण्याचे सूतोवाच केले आहे. महाविकास आघाडीत राम मंदिराबाबत मोठा विसंवाद निर्माण झाला असून, सेनेचा गोंधळ उडालेला दिसतो, अशी टीका दरेकर यांनी केली......तर बळीराजाचे प्राण वाचले असतेकर्जाला कंटाळून मल्हारी बटुळे या शेतकºयाने आत्महत्या केली. बटुळे यांच्याकडे अल्प, मध्यम आणि दीर्घ मुदतीचे ११ लाखांचे कर्ज होते. परंतु,सरकारने केवळ दोन लाखांपर्यंतचेच कर्ज माफ केले. सरसकट कर्जमाफीचा निर्णय सरकारने घेतला असता तर बटुळे यांनी आत्महत्या केली नसती. बटुळे यांची आत्महत्या हे महाविकास आघाडी सरकारचेच पाप आहे, अशी टीका दरेकर यांनी यावेळी केली.