शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
5
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
6
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
7
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
8
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
9
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
10
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
11
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
12
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
13
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
14
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
15
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
16
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
17
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
18
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
19
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
20
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?

सरकारने दिलेल्या जमिनीसाठी वीरपत्नीचा ४६ वर्षांपासून लढा!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2018 5:17 AM

भारत-पाकिस्तान युद्धात पती शहीद झालेल्या वीरपत्नीला सरकारने दिलेल्या जमिनीचा ४६ वर्षांनंतरही ताबा मिळालेला नसल्याचा संतापदायक प्रकार उघड झाला आहे.

- हेमंत आवारीअकोले (जि. अहमदनगर) - भारत-पाकिस्तान युद्धात पती शहीद झालेल्या वीरपत्नीला सरकारने दिलेल्या जमिनीचा ४६ वर्षांनंतरही ताबा मिळालेला नसल्याचा संतापदायक प्रकार उघड झाला आहे. दिल्लीपर्यंत खेटा मारल्या. पण, त्याचा फायदा झाला नाही, अशी खंत मालुंजकर कुटुंबीयांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.कोंडाजी लक्ष्मण मालुंजकर २ आॅक्टोबर १९६५ला शहीद झाले. त्यानंतर १९७२ला औरंगपूर गावात ग्रामपंचायत कार्यालयासमोर वीरचक्र देऊन लष्कराच्या वतीने कुटुंबीयांचा सुवर्णपदक देऊन सन्मान करण्यात आला. औरंगपूर शिवारातीलसर्व्हेनंबर ३६/१मधील दहा एकर म्हणजे ४ हेक्टर जमीन लहानबाई यांना सरकारने दिली. जमिनीचा सात बारा/आठ ‘अ’ उतारा लहानबाई कोंडाजी मालुंजकर यांच्या नावे आहे. पण ४६ वर्षांत शेत जमिनीचा ताबा त्यांना मिळालेला नाही. वनविभागाची ही जमीन सरकारने शहीद मालुंजकर कुटुंबाला दिली आहे. मात्र ही जमीन देण्यास गावकऱ्यांचा विरोध आहे, तसा ठराव ग्रामसभेने केल्याचे गावकरी सांगतात.कागदपत्रांची पूर्ण तपासणी करून हा प्रलंबित प्रश्न मार्गी लावू. सजगतेने हा प्रश्न हाताळून वेळ पडल्यास या कुटुंबास सरकारकडून संरक्षण देऊन जमिनीची मोजणी करून ताबा देऊ.- मुकेश कांबळे, तहसीलदार, अकोले.शहीद कोंडाजी मालुंजकर यांचा प्रश्न मला समजला असून याबाबत पूर्ण माहिती घेऊन तहसील प्रशासनाशी बोलून व गावकºयांशी संवाद साधून प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करू. कोंडाजी मालुंजकर यांच्याविषयी माझ्यासह सर्व तालुक्याला अभिमान असून शहीद जवानाच्या कुटुंबास न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू.- वैभव पिचड, आमदार, अकोले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर