शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
3
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
6
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
7
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
8
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
9
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
10
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
11
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
12
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
13
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
14
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
15
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
16
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
17
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
18
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
19
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
20
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं

नगरच्या उपकेंद्राबाबत पुणे विद्यापीठ उदासीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 3:25 PM

तब्बल अकरा वर्षांपूर्वी अहमदनगरला पुणे विद्यापीठाचे उपकेंद्र मंजूर झाले. परंतु अद्याप त्याचा एका विद्यार्थ्यालाही लाभ झालेला नाही.

अहमदनगर : तब्बल अकरा वर्षांपूर्वी अहमदनगरलापुणे विद्यापीठाचे उपकेंद्र मंजूर झाले. परंतु अद्याप त्याचा एका विद्यार्थ्यालाही लाभ झालेला नाही. केवळ विद्यापीठाची इच्छाशक्ती नसल्याने हे काम वर्षानुवर्षे रेंगाळले आहे. त्यामुळे अहमदनगर उपकेंद्र कृती समितीच पुढाकार घेऊन पुणे विद्यापीठाला ठोस कार्यक्रम देणार असून, त्याची अंमलबजावणी केल्यास उपकेंद्र कसे जोर धरते, हे पटवून देणार आहे. प्राथमिक स्तरावर दोन-तीन अभ्यासक्रम सुरू केले तरी उपकेंद्राचे कामकाज सुरू होईल, असा सूर तज्ज्ञांकडून व्यक्त झाला.गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या नगरच्या विद्यापीठ उपकेंद्र प्रश्नाला वाचा फोडावी, या हेतूने ‘लोकमत’ने नगर जिल्ह्यातीत शिक्षण तज्ज्ञांना पाचारण करून चर्चासत्र घेतले. त्यात सर्वच तज्ज्ञांनी उपकेंद्र सुरू होण्याबाबत सकारात्मक पैलूंवर चर्चा केली. निवृत्त कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे, नगर उपकेंद्राचे संचालक डॉ. एन. आर. सोमवंशी, न्यू आर्टस कॉलेजचे प्राचार्य डॉ. भास्करराव झावरे, लॉ कॉलेजचे प्राचार्य डॉ. एम. एम. तांबे, सीएसआरडीचे संचालक सुरेश पठारे, नेप्ती येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज अभियांत्रिकी कॉलेजचे प्राचार्य डॉ. राजकुमार देशपांडे, सिनेट सदस्य बाळासाहेब सागडे यांनी चर्चेत भाग घेतला. विद्यापीठ प्रशासनाकडे इच्छाशक्तीचा अभाव असल्याने उपकेंद्राचे भिजत घोंगडे वर्षानुवर्षांपासून पडले आहे. लगेच कोट्यवधी रूपयांच्या भल्यामोठ्या इमारती उभारल्या तरच उपकेंद्र होईल, हा गैरसमज आहे. प्राथमिक स्तरावर दोन-तीन अभ्यासक्रम सुरू केले तरी उपकेंद्राचे कामकाज सुरू होईल. असा सूर या चर्चेतून निघाला. जिल्ह्यातील शिक्षण तज्ज्ञांची कृती समिती तयार करून पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंची भेट घेण्यात येईल व त्यांना कृती कार्यक्रम पटवून देण्याचा निर्णय या चर्चासत्रात झाला.उपकेंद्र कार्यान्वित करण्यासाठी लगेचच मोठ्या रकमेची गरज नाही. सुरूवातीला विद्यापीठाने ५ कोटी रूपयांची तरतूद केली तरी प्रशासकीय इमारत होऊन कामकाज सुरू होऊ शकते. नवीन शैक्षणिक धोरणानुसार भविष्यात मोठ्या महाविद्यालयांचे विद्यापीठांत रूपांतर होणार आहे. त्यामुळे नगर जिल्ह्यात जी लहान महाविद्यालये राहतील त्यांना दिशादर्शन करण्यासाठी नगरचे उपकेंद्र सक्षम होणे काळाची गरज आहे . यात जर विलंब झाला तर भविष्यात मोठे शैक्षणिक नुकसान होऊ शकते. - डॉ. सर्जेराव निमसे, शिक्षणतज्ज्ञ२०१४ मध्ये आघाडी सरकार असताना नगरच्या उपकेंद्राला मान्यता मिळाली. परंतु पुढे विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने प्रशासकीय मान्यता रखडली. नंतर भाजप सरकारने उपकेंद्रांचे धोरण ठरविण्यासाठी एक समिती स्थापन केली. त्यानंतर सिनेट सदस्य, राजकीय व्यक्तींनी मुख्यमंत्री, शिक्षणमंत्र्यांपर्यंत पाठपुरावा केलेला आहे. विद्यापीठाकडे निधी नसल्याने उपकेंद्राच्या कामांना मर्यादा येत आहेत. सध्या उपकेंद्रात काही अभ्यासक्रम सुरू आहेत. - डॉ. एन. आर. सोमवंशी, संचालक, विद्यापीठ उपकेंद्रनगर जिल्ह्यातील विद्यार्थी, पालकांना प्रत्येक शैक्षणिक गोष्टीसाठी पुण्याला जावे लागते. यात वेळ व पैसा वाया जातो. नगरचे उपकेंद्र झाल्यास येथेच संशोधन किंवा विशेष अभ्यासक्रम सुरू करणे शक्य होईल. त्यामुळे आता सामाजिक रेटा लावल्याशिवाय ही यंत्रणा हलणार नाही. सर्व नगरकरांनी मनावर घेतले आणि रेटा लावला तर उपकेंद्र साकारेल. - सुरेश पठारे, संचालक, सीएसआरडीतीन सिनेट बैठकीत नगरच्या उपकेंद्राचा मुद्दा मांडला, परंतु विद्यापीठ व्यवस्थापन कोणतीच ठोस भूमिका घ्यायला तयार नाही. त्यांना उपकेंद्राचे गांभीर्य नसल्याचे यावरून दिसते. सामाजिक, राजकीय दबाव निर्माण केला तर हा प्रश्न सुटू शकतो. - बाळासाहेब सागडे, सिनेट सदस्यपुणे विद्यापीठाकडे करोडो रूपयांचा निधी पडून आहे. मुळात तो खर्च करण्याची विद्यापीठाच्या व्यवस्थापन समितीची मानसिकता नाही. पुण्याला जाणे आता सोपे राहिलेले नाही. मोठ्या रहदारीमुळे पाच- पाच तास जाण्यासाठी लागतात. त्यामुळे नगरला उपकेंद्राची मोठी गरज आहे. सर्वच गोष्टी एकाच वेळी होणार नाहीत. टप्प्याटप्प्याने अभ्यासक्रम सुरू करून तसा स्टाफ मंजूर केला तरी उपकेंद्र गती घेईल. - एम.एम.तांबे, प्राचार्य, लॉ कॉलेजराज्यातील इतर विद्यापीठांनी आपापली उपकेंद्रे सक्षम केली. उदा. नांदेड विद्यापीठाने लातूरचे उपकेंद्र सक्षम केले. परंतु एकमेव पुणे विद्यापीठ असे आहे जे आपले उपकेंद्र सक्षम करायला तयार नाही. विद्यापीठाची इच्छा असेल तर नगरमधील मोठी कॉलेजही पुढाकार घेऊन उपकेंद्राला मदत करतील. परंतु सुरूवात होणे गरजेचे आहे. - डॉ. भास्करराव झावरे, प्राचार्य, न्यू आर्टस कॉलेजअभियांत्रिकीचे संलग्नीकरण नाशिक विभागीय कार्यालयाशी आहे. त्यामुळे परीक्षांपासून पेपर तपासणी किंवा इतर सर्वच कामासाठी नाशिकला जावे लागते. अभियांत्रिकीच्या प्रवेशावेळीचे कॅप येथेच सुरू केले तर सर्वांचीच सोय होईल. नगरचे उपकेंद्र होणे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने खूप गरजेचे आहे. - डॉ. राजकुमार देशपांडे, प्राचार्य, छत्रपती शिवाजी महाराज अभियांत्रिकी कॉलेज

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPune universityपुणे विद्यापीठ