शहरं
Join us  
Trending Stories
1
'देश वाचवण्यासाठी मी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
2
सिक्कीमध्ये सत्ताधारी SKM चा दणदणीत विजय; भाजपचे सर्व उमेदवार पराभूत
3
एनडीए ३९७ पार! एक्झिट पोलनंतर लगेचच e-मतदानाचा निकाल आला; पहा महाराष्ट्रात काय परिस्थिती?
4
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
5
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
6
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
7
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
8
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
9
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांचा खोचक टोला
10
४ जूनपूर्वीच भाजपाला खूशखबर, अरुणाचल प्रदेशमध्ये मिळवला दणदणीत विजय
11
NDA आणि INDIAच्या लढतीत ही पाच राज्यं ठरली निर्णायक, बिघडवला ‘इंडिया’चा खेळ
12
रवीना टंडनची काहीही चूक नाही? ती नशेत नव्हती? CCTV फूटेजमुळे समोर आली वेगळीच कहाणी
13
"अमित शाह जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत"; काँग्रेसच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल
14
पॅरिसवरुन मुंबईला येणाऱ्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 306 प्रवाशांचा जीव टांगणीला
15
"निवडणुकीसाठी मी तयार नव्हतो पण..."; चंद्रपूरच्या एक्झिट पोलनंतर मुनगंटीवारांचे सूचक विधान
16
अमेरिका पुन्हा हादरली! बर्थडे पार्टीत अंदाधुंद गोळीबार; २७ जणांना लागल्या गोळ्या, एकाचा मृत्यू
17
इंडिया आघाडी किती जागा जिंकणार? राहुल गांधी म्हणाले, "सिद्धू मुसेवालाचे गाणे ऐका, कळेल.."
18
मनोज तिवारी आणि कन्हैया कुमार यांच्यात कोण जिंकणार?; एक्झिट पोलने सांगितला आकडा
19
दिग्गज फुटबॉलपटू बायचुंग भुतिय यांना 'रेड कार्ड', राजकीय मैदानात मतदारांनी पुन्हा नाकारले...
20
'माझे एज आहे 17, रस्त्यावर लोकांना खतरा' पोर्शे कार अपघातावर आरजे मलिष्काचं नवं रॅप साँग ऐकलंत का?

...तर इतर पक्षांचा सुपडा साफ होईल, राजेंद्र नागवडे यांचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2021 4:18 AM

श्रीगोंदा : काँग्रेस पक्षाला त्याग आणि देशसेवेची परंपरा आहे. काँग्रेस पक्षाने देश आणि आपल्या राज्याला वैभवशाली बनवले आहे. ...

श्रीगोंदा : काँग्रेस पक्षाला त्याग आणि देशसेवेची परंपरा आहे. काँग्रेस पक्षाने देश आणि आपल्या राज्याला वैभवशाली बनवले आहे. या वैभवशाली राज्याची धुरा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या खांद्यावर दिली तर इतर पक्षांचा सुपडा साफ होईल, असे मत नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी व्यक्त केले.

श्रीगोंदा येथे शुक्रवारी आयोजित केलेल्या काँग्रेस बळकटीकरण कार्यक्रमात नागवडे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. यावेळी आमदार लहू कानडे म्हणाले, जाती-धर्माच्या नावाखाली लोकांच्या भावना फडकवून भाजपने सत्ता काबीज केली. मोदी सरकारने एलएआयसी, रेल्वे, विमानतळ विकायला काढली आहेत. त्यामुळे देशाच्या विकासाचा दर ढासळला आहे.

आमदार सुधीर तांबे म्हणाले, मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या रुपाने निष्ठा, तत्व असलेले नेतृत्व मिळाले आहे. कार्यकर्त्यांनी पक्षाशी आणि पक्षावर प्रेम करणाऱ्या जनतेशी बांधिलकी व संवाद ठेवला तर देशात सत्तांतर होऊ शकते. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दीपक भोसले, बाबासाहेब भोस, आदेश शेंडगे यांनीही मनोगत व्यक्त केलेे.

कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्या अनुराधा नागवडे, नगराध्यक्षा शुभांगी पोटे, अरुण पाचपुते, समीर बोरा, बाबासाहेब इथापे, धनसिंग भोयटे, सुरेश लोखंडे, सतीश मखरे, हेमंत नलगे, राजेश लोखंडे, सीमा गोरे, निसार बेपारी, संतोष कोथिंबिरे, सुरेखा लकडे, गयाबाई सुपेकर उपस्थित होते. सूत्रसंचालन ॲड. अशोक रोडे यांनी केले तर युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे यांनी आभार मानले.