शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
4
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
5
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
6
सुशांत सिंह राजपूतच्या जीवाला होता धोका? बहिणीने केला मोठा खुलासा
7
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
8
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
9
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
10
"शिंदे सरकारच त्यांचा माज उतरवेल", मराठी सिनेमांना प्राइम शो न देणाऱ्या मल्टिप्लेक्सबाबत प्रसाद ओकचं मोठं वक्तव्य
11
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
12
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
13
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
14
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
15
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
16
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
17
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
18
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
19
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
20
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं

२६ कोटींच्या संपदा पतसंस्थेच्या घोटाळ्यात राज्यमंत्र्यांचा हस्तक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 2:37 PM

संपदा नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाविरूद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल असताना सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील संचालक मंडळाच्या मदतीला धाऊन आले आहेत. राज्यमंत्र्यांनी ठेवीदारांचे पैसे परत देण्यासाठी मार्ग काढण्याऐवजी थेट हस्तक्षेप करीत फेरलेखापरीक्षण करण्याचा आदेश दिला आहे.

ठळक मुद्दे२६ कोटी रूपयांच्या अफरातफरीमुळे अवसायानात निघालेल्या संपदा नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाविरूद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल असताना सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील संचालक मंडळाच्या मदतीला धाऊन आले आहेत.वैधानिक लेखापरीक्षणानंतर पतसंस्थेचे संचालक व कर्मचा-यांवर अहमदनगर व पारनेर पोलीस ठाण्यात तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले.या गुन्ह्यांचा तपास पूर्ण होऊन न्यायालयात दोषारोपपत्रही दाखल झालेले आहे. ६ सप्टेंबर २०११ रोजी जिल्हा उपनिबंधकांनी पतसंस्थेवर प्रशासकाची नियुक्ती केली. २९ जुलै २०१६ ला संस्था अवसायानात काढण्यात आली.

मिलिंदकुमार साळवेअहमदनगर : सुमारे २६ कोटी रूपयांच्या अफरातफरीमुळे अवसायानात निघालेल्या संपदा नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाविरूद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल असताना सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील संचालक मंडळाच्या मदतीला धाऊन आले आहेत. कोट्यवधी रुपयांच्या ठेवी या पतसंस्थेत अडकल्या असताना राज्यमंत्र्यांनी ठेवीदारांचे पैसे परत देण्यासाठी मार्ग काढण्याऐवजी थेट हस्तक्षेप करीत फेरलेखापरीक्षण करण्याचा आदेश दिला आहे.पतसंस्थेचे सन २००९-१०, २०१०-११ व २०११-१२ या आर्थिक वर्षाचे वैधानिक लेखापरीक्षण सनदी लेखापाल डी. एम. बारसकर यांनी केले. त्यातून संस्थेत मोठ्या प्रमाणात आर्थिक घोटाळे झाल्याचे निदर्शनास आले. वैधानिक लेखापरीक्षणानंतर पतसंस्थेचे संचालक व कर्मचा-यांवर अहमदनगर व पारनेर पोलीस ठाण्यात तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले.या गुन्ह्यांचा तपास पूर्ण होऊन न्यायालयात दोषारोपपत्रही दाखल झालेले आहे. ६ सप्टेंबर २०११ रोजी जिल्हा उपनिबंधकांनी पतसंस्थेवर प्रशासकाची नियुक्ती केली. २९ जुलै २०१६ ला संस्था अवसायानात काढण्यात आली. तसेच कलम ८८ नुसार चौकशी पूर्ण होऊन २६ कोटी ६१ लाख ६५ हजार ९७१ रूपयांची वसुली करण्यासाठी कलम ९८ नुसार वसुली प्रमाणपत्र देण्यात आले. त्यानुसार पतसंस्थेच्या कर्जदारांकडील कर्जाची रक्कम वसूल करुन ठेवीदारांच्या अडकलेल्या कोट्यवधींच्या ठेवींच्या रकमा परत करण्यासाठी प्रक्रिया प्रशासकीय मंडळाने सुरू केली आहे. त्यानुसार काही प्रमाणात वसुली होऊन ठेवीदारांना त्यांच्या घामाचे दाम परत देण्याचा प्रयत्न सुरू असतानाच पतसंस्थेचे तत्कालीन सूत्रधार ज्ञानदेव वाफारे यांनी बारसकर यांनी केलेल्या लेखापरीक्षणाला आक्षेप घेत सहकार विभाग व पोलिसांनी केलेली कारवाई चुकीची असल्याचा दावा केला आहे. तसेच लेखापरीक्षण अहवाल रद्द करण्याची मागणी केली आहे.२००९ ते २०१२ दरम्यानचे लेखापरीक्षण चुकीचे मोघम असून ते रद्द करुन फेरलेखापरीक्षण करण्याची मागणी वाफारे यांनी १८ आॅगस्ट २०१४ ला केली. त्यावर उच्च न्यायालयात दाखल याचिकेच्या सुनावणीदरम्यान १७ डिसेंबर २०१४ ला वाफारेंचा फेरलेखापरीक्षणाबाबतचा अर्ज नामंजूर केल्याचे पत्र तत्कालीन जिल्हा उपनिबंधकांनी सादर केले आहे. ठेवी मिळण्यात अडसर जिल्हा उपनिबंधकांच्या आदेशाविरूद्ध दाद मागितल्यानंतर सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी अलीकडेच तत्कालीन जिल्हा उपनिबंधकांचा फेरलेखापरीक्षण अर्ज नामंजुरीचा आदेश रद्द ठरविला. तसेच २००९ ते १२ चे फेरलेखापरीक्षण करण्याचा आदेश दिला. या आदेशामुळे ठेवीदारांच्या ठेवी मिळण्यात अडसर निर्माण झाला आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर