शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

समाजकार्याची सुरूवात स्वत:पासून करावी - डॉ. संजय भट्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 8:30 PM

समाजकार्यात पारंपरिक ज्ञानाला अधिक महत्व देणे गरजेचे आहे. प्रत्येकाने स्वत:पासून समाजकार्याची सुरूवात करावी. समाजाच्या तळाशी जावून सद्यस्थिती समजावून घेत, व्यावसायिक नितीमूल्ये अंगिकारत नावीन्यपूर्ण उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ. संजय भट्ट यांनी केले.

ठळक मुद्देसीएसआरडीमधील राष्ट्रीय परिषदेचा समारोप

लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर : समाजकार्यात पारंपरिक ज्ञानाला अधिक महत्व देणे गरजेचे आहे. प्रत्येकाने स्वत:पासून समाजकार्याची सुरूवात करावी. समाजाच्या तळाशी जावून सद्यस्थिती समजावून घेत, व्यावसायिक नितीमूल्ये अंगिकारत नावीन्यपूर्ण उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ. संजय भट्ट यांनी केले.येथील बी.पी.एच.ई. सोसायटीचे सी.एस.आर.डी. व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने ‘भारतातील समाजकार्य पद्धती : आव्हाने व नावीन्यता’ या विषयावर राष्ट्रीय परिषदेचा समारोप रविवारी झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सीएसआरडीचे संचालक डॉ. सुरेश पठारे, कार्यक्रम समन्वयक डॉ. जेमोन वर्गीस, प्रा. सुरेश मुगुटमल आदी उपस्थित होते. प्रारंभी वर्गीस यांनी राष्ट्रीय परिषदेचा अहवाल मांडला. सामाजिक न्याय, कंपन्यांची सामाजिक बांधिलकी, आदर्श गाव, वंचितांचे प्रश्न, सामाजिक अस्थिरता, महिलांवरील अन्याय, अत्याचार, मानवाधिकार, आधुनिक शिक्षण पद्धती,आदिवासी समुदायाच्या समस्या, सांस्कृतिक विविधता, समाजकार्य शिक्षणातील क्षेत्रकार्याची भूमिका, ग्रामीण विकासात लोकांचा सक्रिय सहभाग, शाश्वत विकास, पर्यावरणाचे प्रश्न, सामाजिक एकात्मता व सामुहिक जबाबदारी अशा अनेक विषयांवर परिषदेत विचारमंथन झाले.सुरेश पठारे यांनी परिषदेत सहभागी झालेल्या विद्यार्थी, प्राध्यापक व सामाजिक कार्यकर्त्यांचे आभार मानले. विद्यार्थ्यांनी अनेक विषयांवर विचारमंथन करून पुढील काळात अधिक प्रभावीपणे कार्य करण्याचे ठरले. परिषदेत अनेक विचारवंताशी संवाद साधण्याची संधी मिळाली. यातून समर्पित समाजकार्य करण्याची प्रेरणा मिळाली, असा अभिप्राय विद्यार्थी राहुल सरवदे, दिल्ली येथील डॉ. अतुल प्रताप यांनी दिला.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरuniversityविद्यापीठ