शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांची भेट घेतली; 'तुतारी' सोडून भाजपला पाठिंबा देताच अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
2
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
3
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
4
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
5
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
6
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
7
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
8
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
9
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
10
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
11
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
12
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
13
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल
14
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
15
अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?
16
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
17
MRF Share Price: एमआरएफ देणार आतापर्यंतचा सर्वाधिक डिविडंड, मोठ्या विक्रीमुळे शेअर्स ४ टक्क्यांपर्यंत घसरले
18
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
19
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
20
Apple नं केला कमाईचा रकॉर्ड; एका दिवसात Mukesh Ambani यांच्या नेटवर्थपेक्षा अधिक वाढलं मार्केट कॅप

साठ हजार जनावरांचा पोळा यंदा छावणीतच : चार तालुक्यात ९४ छावण्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 4:46 PM

जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने तीव्र पाणी व चाराटंचाई निर्माण झाली असून ऐन पावसाळ्याच्या दिवसांत जिल्ह्यात ९४ छावण्या सुरू आहेत.

अहमदनगर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने तीव्र पाणी व चाराटंचाई निर्माण झाली असून ऐन पावसाळ्याच्या दिवसांत जिल्ह्यात ९४ छावण्या सुरू आहेत. या छावण्यांत एकूण ६० हजार जनावरे आहेत. कर्जत, पाथर्डी तालुक्यात सर्वाधिक छावण्या व जनावरे आहेत. चारा आणि पाण्याअभावी यंदा साठ हजार जनावरांचा पोळा छावणीतच साजरा होणार आहे.बैलपोळा या सणाला शेतकऱ्यांच्यादृष्टीने महत्त्व आहे. यंदा या सणावर कमी पावसाचे सावट आहे. शुक्रवारी (दि.३०) पोळा असल्याने छावणीतील जनावरे घरी येतील की नाही, याची शेतकऱ्यांनाच खात्री नसल्याची स्थिती आहे. मागील वर्षी जिल्ह्यात पाऊस न झाल्याने यंदा तीव्र चाराटंचाई जाणवली. त्यामुळे शासनाने फेब्रुवारीमध्ये जनावरांच्या छावण्या सुरू केल्या. उन्हाळ्यात गावोगावी छावण्या पहायला मिळाल्या. हा आकडा साडेपाचशेपर्यंत गेला होता. त्यात सुमारे सव्वा तीन लाख जनावरे होती. परंतु जून-जुलैमध्ये काही भागात झालेल्या पावसाने बºयाच छावण्या बंद झाल्या. काही ठिकाणी शेतकºयांनी मशागतीसाठी जनावरे घरी नेल्याने छावणीचालकांना छावण्या बंद कराव्या लागल्या. तर काही ठिकाणी प्रशासनानेच छावण्या बंद करण्यासाठी दबाव आणला, असा आरोप शेतकरी संघटनांनी केला. नवीन चारा निर्माण झालेला नसतानाही जुलै-आॅगस्ट महिन्यात झपाट्याने छावण्या बंद होऊ लागल्या. सद्यस्थितीत त्या ९४ आहेत. यामध्ये ६ हजार ४९ लहान, तर ५१ हजार ८१२ मोठी अशी एकूण ५७ हजार ८६१ जनावरे दाखल आहेत. जिल्ह्यातील जामखेड, कर्जत, पाथर्डी, शेवगाव या तालुक्यांत छावण्या सुरू आहेत. त्यातही कर्जतमध्ये सर्वाधिक ३६ छावण्या आहेत. नगर, शेवगाव, श्रीगोंदा, पारनेर या तालुक्यांतील छावण्या शासनाने बंद केल्या आहेत. शासनाने ३१ आॅगस्टपर्यंत छावण्यांची मुदत ठेवलेली आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय