शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

संगमनेरचा पठारभाग सौम्य भूकंपप्रवण रेषेवर : ‘मेरी’चा दावा

By सुधीर लंके | Published: August 26, 2018 12:52 PM

संगमनेर तालुक्यातील घारगाव परिसरात जाणवत असलेले धक्के हे भूकंपाचेच आहेत. मात्र हे धक्के सौम्य आहेत. भूकंपप्रवण प्रदेशाची डहाणू ते गुजरात ही जी भूपृष्ठ भ्रंश रेषा (फॉल्ट लाईन) आहे त्या रेषेवर हा परिसर येत असल्याने हे धक्के जाणवत असल्याचे नाशिक येथील ‘मेरी’ या संस्थेच्या शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

सुधीर लंकेअहमदनगर : संगमनेर तालुक्यातील घारगाव परिसरात जाणवत असलेले धक्के हे भूकंपाचेच आहेत. मात्र हे धक्के सौम्य आहेत. भूकंपप्रवण प्रदेशाची डहाणू ते गुजरात ही जी भूपृष्ठ भ्रंश रेषा (फॉल्ट लाईन) आहे त्या रेषेवर हा परिसर येत असल्याने हे धक्के जाणवत असल्याचे नाशिक येथील ‘मेरी’ या संस्थेच्या शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. हे धक्के हानीकारक नसल्याने नागरिकांनी घाबरु नये, असेही आवाहन या संस्थेने केले आहे.संगमनेर तालुक्यात पुण्याकडे जाताना नाशिक-पुणे महामार्गालगत डोंगराळ परिसर आहे. त्याला पठार भाग म्हणून ओळखले जाते. या भागात गत दहा दिवसात घारगाव, बोरबन, कोठे, माळेगाव पठार, आंबीखालसा, नांदूर खंदरमाळ या परिसरात जमिनीतून तीनदा मोठा आवाज होऊन नागरिकांना कंप जाणवला. शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता नांदूर येथे एका घराला तडे गेले आहेत. ‘लोकमत’ टीमने आज या परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली.गत दोन-तीन वर्षांपासून या परिसरात असे धक्के जाणवत आहेत, असे नागरिकांचे म्हणणे आहे. गत आठवड्यातील दोन धक्के रात्री तर एक सकाळी जाणवला. यातील दोन धक्क्यांची ‘मेरी’या संस्थेच्या भूकंपमापक यंत्रावर २.८ व २.५ रिश्टर स्केल इतकी नोंद झाली आहे. हे भूकंपाचे धक्के असल्याचे ‘मेरी’च्या शास्त्रज्ञ चारुलता चौधरी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.भूकंपाचे धक्के जाणवल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. अनेक नागरिकांनी तशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या. रात्री धक्का बसल्यानंतर अनेक नागरिक घराबाहेर पळत सुटले, अशी माहिती घारगावचे माजी उपसरपंच संदीप आहेर यांनी ‘लोकमत’ला दिली. नागरिक भयभीत असल्याने नागरिकांनी काय काळजी घ्यावी याबाबत प्रशासनाने उपाययोजना करायला हव्यात. मात्र, प्रशासनाकडून प्रभावी दखल घेण्यात आलेली नाही. नागरिकांनी जुन्या व मोडकळीस आलेल्या घरात राहू नये, अशा केवळ नोटिसा प्रशासनाने पाठविल्या असल्याचे खंदरमाळवाडीचे उपसरपंच प्रमोद लेंडे यांनी सांगितले. हा भूकंपच आहे की आणखी काही याबाबतही नागरिक संभ्रमात दिसले.प्रशासनाचे दुर्लक्षशुक्रवारी रात्री नांदूर येथील सुभाष सुपेकर यांच्या घराला तडा गेला आहे. प्रशासनाला कळविल्यानंतरही शनिवारी दिवसभर कुणीही याबाबत पंचनामा करण्यासाठी आलेले नव्हते. साधे तलाठीही फिरकले नाहीत, अशी खंत या कुटुंबातील महिला अर्चना सुपेकर यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना व्यक्त केली. या घरात वीट बांधकाम असलेल्या सिमेंटच्या भिंतीला आरपार तडा गेला आहे. इतरही काही छोट्या भेगा पडल्या आहेत.डहाणू ते गुजरात अशी भूकंपाची भूपृष्ठ भ्रंश रेषाडहाणू ते गुजरात अशी भूकंपाची भूपृष्ठ भ्रंश रेषा (फॉल्ट लाईन) आहे. या रेषेवर येणारी गावे ही सौम्य भूकंपप्रवण प्रदेशात मोडतात. संगमनेर तालुक्यातील घारगाव परिसर या रेषेवर येत असल्याने हे धक्के जाणवत आहेत. हे भूकंपाचे धक्के आहेत. मात्र, हा अत्यंत सौम्य भूकंप आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याची आवश्यकता नाही. असे धक्के काही दिवस जाणवतात व नंतर बंदही होतात. बऱ्याचदा जमिनीतील ऊर्जा बाहेर पडण्यासाठी असे धक्के मदतही करतात. त्यामुळे एकदम मोठा भूकंप होण्याची शक्यता टळते. या परिसरात १९९५, १९९८, २०११, २०१७ मध्येही असे धक्के जाणवलेले आहेत. - चारुलता चौधरी, वैज्ञानिक अधिकारी, मेरी, नाशिक.‘मेरी’ची टीम आज घारगावमध्ये‘मेरी’ (महाराष्टÑ इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक) ही संस्था भूकंपाबाबत अभ्यास करणारी नोडल एजन्सी आहे. या संस्थेचे पथक शनिवारी घारगाव परिसराची पाहणी करणार असल्याचे चौधरी यांनी ‘लोकमत’ला सांगितले. अहमदनगरचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनीही ‘लोकमत’ला ही माहिती दिली. आपत्कालीन परिस्थितीत काय काळजी घ्यायची, याबाबत प्रशासनाकडून नागरिकांना प्रात्यक्षिक दिले जाणार असल्याचेही द्विवेदी म्हणाले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSangamnerसंगमनेर