शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: नाशिक, दिंडोरीत ९ वाजेपर्यंत ६ टक्के मतदान
2
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live ठाण्यात बोगस मतदानासाठी दीड हजार लोक आणून ठेवलेत; राजन विचारेंचा गंभीर आरोप
3
गुजरातच्या GST अधिकाऱ्याने साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; एकाही अधिकाऱ्याने केला नाही तपास
4
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
5
मेले ते गेले... तुमचे नातेवाईक नव्हतेच ते!
6
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
7
Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
8
सहा ठिकाणी शिंदेसेना VS उद्धवसेना; लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील १३ मतदारसंघांमध्ये आज मतदान
9
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
10
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
11
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
12
राहुल, अखिलेश यांच्या प्रचारसभेत गोंधळ; नेत्यांना भेटण्यासाठी उत्साहाच्या भरात लोक बॅरिकेड्स तोडून मंचावर  
13
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
14
सेक्स स्कॅण्डल : प्रज्वलविरोधात अटक वॉरंट
15
चॉकलेटच्या वडीचा आकार आता लहान होणार, कारण...
16
‘MPSC’ची ढकलगाडी; ...तर एमपीएससीच्या सक्षमीकरणाशिवाय पर्याय नाही
17
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
18
जलदगतीने वजन कमी करणे आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक, औषधांचा वापर टाळण्याचे आयसीएमआरचे आवाहन
19
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
20
बिल्डरच्या १७ वर्षीय मुलाने घेतला दाेघांचा बळी

कोपरगावात पालिका कर्मचा-यांना रजेचा संसर्ग: प्रशासकीय कामाचा बट्ट्याबोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 7:30 PM

नगरपालिकेतील अधिकारी व कर्मचारी सतत आजारपणाच्या रजेवर जात असल्याने प्रशासकीय कामाचा बट्ट्याबोळ झाला आहे. त्यामुळे विकास कामे ठप्प होऊन नागरिकांच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत.

रियाज सय्यदकोपरगाव : नगरपालिकेतील अधिकारी व कर्मचारी सतत आजारपणाच्या रजेवर जात असल्याने प्रशासकीय कामाचा बट्ट्याबोळ झाला आहे. त्यामुळे विकास कामे ठप्प होऊन नागरिकांच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. रजेवर जाणा-या अधिकारी व कर्मचा-यांना असा कोणता आजार जडला? हा मात्र संशोधनाचा विषय आहे.पालिकेत आधीच मनुष्यबळाची वाणवा आहे. शहराचा विस्तार बघता पालिकेला आणखी सक्षम अधिकारी व कर्मचा-यांची आवश्यकता आहे. पाणी पुरवठा विभागाचे सहायक अभियंता प्रवीण लोखंडे हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकल्याने ३ महिन्यांपासून हे पद रिक्त आहे. पाणी पुरवठ्याचे पर्यवेक्षक विश्वास धुमाळ दीड-दोन महिन्यांपासून आजारपणाच्या रजेवर आहेत. कनिष्ठ अभियंता श्रीकांत बगाड देखील महिनाभरापासून रजेवर गेल्याने रामभरोसे कारभार सुरू आहे. बांधकाम अभियंता विजय पाटील यांच्याकडे पाणी पुरवठ्याचा तात्पुरता पदभार सोपविण्यात आला आहे. आधीच त्यांच्यावर बांधकामसह अतिक्रमण विरोधी पथक प्रमुखाची जबाबदारी आहे. सरकारी कामानिमित्त पाटील यांना बाहेरगावी जावे लागते. बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता एस.एम.ताजवे दीड महिन्यींपासून रजा टाकून गेले आहेत. त्यांच्या पाठोपाठ कनिष्ठ अभियंता श्रीकांत साठे हे देखील महिन्यापासून रजेवर आहेत. आरोग्य निरीक्षक पी.एम. चव्हाण यांची अचानक टपाल विभागात बदली केल्याने कोपरगावकरांचे आरोग्य वा-यावर आहे.

तोकडा कर्मचारी वर्ग

नगरपालिकेत मुख्याधिकारी, सहायक कार्यालयीन पर्यवेक्षक, सहायक लेखापाल, बांधकाम नगर अभियंता, पाणी पुरवठा उपअभियंता, सहायक कर निरीक्षक, कनिष्ठ पर्यवेक्षक, ग्रंथपाल, कनिष्ठ विद्युत पर्यवेक्षक, सहायक खरेदी पर्यवेक्षक, आरोग्य निरीक्षक, मार्केट लिपिक, आस्थापना लिपिक, सभा लिपिक, दप्तर लिपिक, आवक-जावक लिपिक, ग्रंथालय लिपिक, कनिष्ठ प्रोग्रामर, संगणक चालक, न्यायालय लिपिक, २ वैद्यकीय अधिकारी, राज्य उपजिवीका अभियान लिपिक असा तोकडा स्टाफ आहे.

प्रशासन चालविण्याची जबाबदारी मुख्याधिका-यांवर आहे. नवीन अभियंत्यांना तात्पुरत्या नियुत्या देण्याचा अधिकार त्यांना आहे. पण, कुठलीही गोष्ट गांभीर्याने घेतली जात नाही. ही त्यांची बेफिकिरी आहे. प्रशासनाच्या गलथानपणामुळे नागरिकांना हेलपाटे मारावे लागतात. पालिकेविषयी तक्रारी वाढून लोकप्रतिनिधी बदनाम होत आहेत. ठेकेदाराची बिले अदा न केल्याने पाणी पुरवठा जलवाहिनीचे ‘लिकेज’ निघत नाहीत. आरोग्य निरीक्षक पी.एम.चव्हाण यांची बदली केल्याचे मला माहीत सुध्दा केले नाही. मुख्याधिका-यांच्या मनमानीला अधिकारी व कर्मचारी कंटाळले आहेत.-विजय वहाडणे, नगराध्यक्ष

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKopargaonकोपरगाव