शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
2
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
3
कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...'
4
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
5
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
6
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
7
Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल
8
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
9
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
10
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
11
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
12
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
13
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
14
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
१२ अफेयर, २ वर्षात झाला घटस्फोट, आता या अभिनेत्रीला थाटायचाय दुसरा संसार
16
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
17
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
18
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
19
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
20
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक

नगर जिल्ह्यात आता २० जूननंतर पाऊस - डॉ. रवींद्र आंधळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 1:50 PM

भाऊसाहेब येवले राहुरी : शहरासह जिल्ह्यात दोन ते तीन वेळा अवकाळी पाऊस झाला. मान्सूनचे अद्याप राज्यातच आगमन झालेले नाही. ...

भाऊसाहेब येवलेराहुरी : शहरासह जिल्ह्यात दोन ते तीन वेळा अवकाळी पाऊस झाला. मान्सूनचे अद्याप राज्यातच आगमन झालेले नाही. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. या पार्श्वभूमीवर राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील हवामान विभागातील तज्ज्ञ डॉ. रवींद्र आंधळे यांच्याशी ‘लोकमत’ने साधलेला हा संवाद!प्रश्न : मान्सूनचा सध्याचा प्रवास?डॉ. आंधळे : यंदा अहमदनगर जिल्ह्यात पावसाने बे्रक दिल्याचे चित्र समोर आले आहे़ येत्या चार दिवसात तुरळक स्वरूपाचा काही ठिकाणी पाऊस पडणार आहे़ वायू वादळाने मान्सूनची प्रगती थांबली आहे. कर्नाटकापर्यंत पाऊस आला आहे.प्रश्न : कधी येईल पाऊस?डॉ. आंधळे : येत्या चार दिवसात नगर जिल्ह्यात समाधानकारक पावसाची शक्यता नाही़ दोन मिलीमीटर पावसाची काही ठिकाणी शक्यता आहे़ ढगाळ वातावरणामुळे भाजीपाल्यावर रोग व किडींचा प्रादुर्भाव वाढला आहे़ पावसाने दडी मारल्याने खरिपाच्या पेरण्या ठप्प झाल्या आहेत़ येत्या आठ दिवसात तरी समाधानकारक पावसाची शक्यता नाही़ त्यामुळे शेतकऱ्यांचे लक्ष आभाळाकडे वेधले आहे़प्रश्न : शेतीत सध्याचे काय चित्र आहे.डॉ. आंधळे : शेतकऱ्यांनी जमिनीच्या मशागती केल्या आहेत़ बियाणेही खरेदी केले आहे़ मात्र पाऊस नसल्याने पेरणी करायची कशी? असा प्रश्न शेतकºयांपुढे आहे़ काही शेतकºयांनी हलक्या पावसावर कपाशीची लागवड केली़ मात्र विजेचा लपंडाव व पाण्याची टंचाई यामुळे कपाशीची लागवड वाया गेली आहे़ कृषी सेवा केंद्र चालकांनी पुरेशा प्रमाणावर बियाणे खरेदी केले आहे़ मात्र बियाणाला उठाव नसल्याचे कृषी सेवा केंद्र चालकांकडून सांगण्यात आले़प्रश्न : शेतकरी राजाची अवस्था काय आहे?डॉ. आंधळे : अहमदनगर जिल्ह्यात गेल्यावर्षी २९४ मिली पावसाची नोंद झाली होती़ जिल्ह्यात गेल्यावर्षी केवळ ४४ टक्के पाऊस पडल्याने शेतीचे डोलारा कोसळला़ शेतकºयांवर कर्जाचा भार वाढला. तर दुसºया बाजूला सहकारी सोसायट्या व बँका धोक्यात आल्या आहेत़ गेल्या वर्षी जूनच्या सुरूवातीला पाऊस पडला़ त्यानंतर पावसानेदडी मारली होती़ त्यामुळेगेल्यावर्षी खरीप हंगाम वाया गेला होता़ यंदा शेतकºयांना समाधानकारक पावसाची प्रतीक्षा आहे़ त्यामुळे शेतकºयांचे लक्ष आभाळाकडे वेधले आहे़प्रश्न : पेरण्या कधी कराव्यात.डॉ. आंधळे : समाधानकारक पावसासाठी आठ दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे़ येत्या चार दिवसात समाधानकारक पावसाची शक्यता नाही़ दोन-चार मिलीमीटर पाऊस काही ठिकाणी होऊ शकतो़ जून अखेरपर्यंत पेरण्या करणे शक्य आहे़ उशिरा पेरण्या करण्याचे ठरले तर उशिरा येणाºया वाणाची पेरणी करावी लागेल़

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर