शहरं
Join us  
Trending Stories
1
'देश वाचवण्यासाठी मी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
2
सिक्कीमध्ये सत्ताधारी SKM चा दणदणीत विजय; भाजपचे सर्व उमेदवार पराभूत
3
एनडीए ३९७ पार! एक्झिट पोलनंतर लगेचच e-मतदानाचा निकाल आला; पहा महाराष्ट्रात काय परिस्थिती?
4
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
5
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
6
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
7
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
8
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
9
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांचा खोचक टोला
10
४ जूनपूर्वीच भाजपाला खूशखबर, अरुणाचल प्रदेशमध्ये मिळवला दणदणीत विजय
11
NDA आणि INDIAच्या लढतीत ही पाच राज्यं ठरली निर्णायक, बिघडवला ‘इंडिया’चा खेळ
12
रवीना टंडनची काहीही चूक नाही? ती नशेत नव्हती? CCTV फूटेजमुळे समोर आली वेगळीच कहाणी
13
"अमित शाह जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत"; काँग्रेसच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल
14
पॅरिसवरुन मुंबईला येणाऱ्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 306 प्रवाशांचा जीव टांगणीला
15
"निवडणुकीसाठी मी तयार नव्हतो पण..."; चंद्रपूरच्या एक्झिट पोलनंतर मुनगंटीवारांचे सूचक विधान
16
अमेरिका पुन्हा हादरली! बर्थडे पार्टीत अंदाधुंद गोळीबार; २७ जणांना लागल्या गोळ्या, एकाचा मृत्यू
17
इंडिया आघाडी किती जागा जिंकणार? राहुल गांधी म्हणाले, "सिद्धू मुसेवालाचे गाणे ऐका, कळेल.."
18
मनोज तिवारी आणि कन्हैया कुमार यांच्यात कोण जिंकणार?; एक्झिट पोलने सांगितला आकडा
19
दिग्गज फुटबॉलपटू बायचुंग भुतिय यांना 'रेड कार्ड', राजकीय मैदानात मतदारांनी पुन्हा नाकारले...
20
'माझे एज आहे 17, रस्त्यावर लोकांना खतरा' पोर्शे कार अपघातावर आरजे मलिष्काचं नवं रॅप साँग ऐकलंत का?

आंदोलनाचा इशारा देताच महावितरणला जाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 4:15 AM

कर्जत : तालुक्यातील माळवाडी, रेहकुरी, बिटकेवाडी या भागातील शेतकऱ्यांनी गेल्या दोन वर्षांपासून वीज वाहिनी व रोहित्र दुरुस्तीसाठी प्रतीक्षा करावी ...

कर्जत : तालुक्यातील माळवाडी, रेहकुरी, बिटकेवाडी या भागातील शेतकऱ्यांनी गेल्या दोन वर्षांपासून वीज वाहिनी व रोहित्र दुरुस्तीसाठी प्रतीक्षा करावी लागली. या संदर्भात भाजप किसान मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस सुनील यादव यांनी आंदोलन करण्याचा इशारा देताच महावितरणने संबंधित कामे पूर्ण केली.

माळेवाडी, रेहकुरी, बिटकेवाडी या भागातील शेतकऱ्यांना वीज पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी नवीन वीज वाहिनी टाकून त्यावर रोहित्र बसविणे ही कामे करण्यासाठी एजन्सी नेमल्या होत्या. त्यांनी कामे पूर्ण केली होती. मात्र कामे झाल्यावर वर्षभरात तारा तुटणे, खांब पडणे, वाकणे असे प्रकार झाले होते. यामुळे या भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता. ही कामे पूर्ण करण्यात यावीत यासाठी या भागातील शेतकरी महावितरण कंपनीच्या कार्यालयात हेलपाटे मारत होते. मात्र केवळ होकाराशिवाय शेतकऱ्यांना काहीच मिळाले नाही. अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी भाजप किसान मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस सुनील यादव यांच्याकडे हा प्रश्न मांडला.

सुनील यादव यांनी महावितरणचे अधिकारी यांची भेट घेऊन या प्रलंबित कामात लक्ष घालण्याची विनंती केली. अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. यावर महावितरणचे अधिकाऱ्यांनीही ही कामे करण्यासाठी नियुक्त केलेल्या कंपनीच्या ठेकेदारांना या कामात दिरंगाई व हलगर्जीपणा केल्याबद्दल नोटिसा बजावल्या आहेत.

---

महावितरण कंपनीने या भागातील कामे पूर्ण करण्यासाठी ऑफशर व वेवलाईन या कंपनीला काम दिले होते. ती त्यांनी वेळेत पूर्ण केली नाहीत. तसेच मुदतीत देखभाल केली नाही. यामुळे संबंधित ठेकेदार कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आल्या आहेत. या कंपनीवर कारवाई करण्यात येईल.

-अशोक घुले,

उप कार्यकारी अभियंता, महावितरण, कर्जत