शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
3
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
4
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
5
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
6
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
7
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
8
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
9
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
10
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
11
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
12
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
13
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
14
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
15
Akshaya Tritiya 2024: चैत्रगौरीला निरोप देताना कुंकवाची पावलं काढा आणि 'पुनरागमनायच' म्हणा; कारण...
16
खासदारांना डावलून आमदार रिंगणात, नव्या चेहऱ्यांमुळे चुरस; रणनीती ठरणार का यशस्वी?
17
'ही' साऊथ अभिनेत्री, जी प्रेमासाठी बनली वयानं २७ वर्ष मोठ्या असलेल्या माजी CM ची दुसरी पत्नी
18
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
19
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
20
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी

राहुरी तालुक्यामधील ब्राम्हणी गावातील शेतक-यांचा महावितरणवर हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 5:29 PM

अचानक दहा रोहित्र बंद केल्याच्या निषेधार्थ ब्राम्हणीतील शेतक-यांनी महावितरण कार्यालयासमोर हल्लाबोल करत ठिय्या आंदोलन केले. तात्काळ वीज पुरवठा सुरू न केल्यास रास्ता रोकोचो इशारा संतप्त शेतक-यांनी दिला आहे.

ठळक मुद्देदहा रोहित्र बंदवीज सुरू न केल्यास रास्ता रोकोचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कराहुरी : अचानक दहा रोहित्र बंद केल्याच्या निषेधार्थ ब्राम्हणीतील शेतक-यांनी महावितरण कार्यालयासमोर हल्लाबोल करत ठिय्या आंदोलन केले. तात्काळ वीज पुरवठा सुरू न केल्यास रास्ता रोकोचो इशारा संतप्त शेतक-यांनी दिला आहे.सध्या ऊस, कांदा लागवड सुरू आहे. अशा परिस्थिती परीसरातील पुर्व सुचना न देता गावातील दहा वीज रोहित्र बंद करण्यात आले. त्यामुळे शेतातील उभ्या पिकांसह जनावरे तसेच माणसांची पाण्याची अडचण निर्माण झाली आहे. थकीत वीज बील भरण्यास मुदत देण्यात यावी, तो पर्यत रोहित्र बंद करू नये. अशी मागणी शेतक-यांनी केली आहे. महावितरणने वीज रोहित्र बंद करून शेतक-यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरु केल्याचा आरोपही संतप्त शेतक-यांनी केला आहे.ठिय्या आंदोलनादरम्यान पंचायत समिती सदस्य सुरेश बानकर, उपसरपंच डॉ. बानकर, मोकाटे गुरुजी, रंगनाथ मोकाटे, महेंद्र तांबे, माणिक तारडे, ज्ञानदेव मोकाटे, तोलाजी नवाळे, जालू बानकर, केशव हापसे, शिवाजी राजदेव, चंद्रभान राजदेव, गोरक्ष शिंदे, उमाकांत हापसे, डॉ. काका राज देव, दादा ठुबे, अनिल ठुबे, जगन्नाथ वने, माणिक देशमुख, राम राजदेव, अजीत तारडे, संभाजी हापसे, एकनाथ वने, चंद्रभान राजदेव आदिंसह मोठ्या संख्येने ठिय्या आंदोलनात सहभागी होते.शेतक-यांना अपमानास्पद वागणूकआज मंगळवारी सकाळी एकत्रितपणे महावितरण कार्यालयाकडे जाण्यापुर्वी गावातील पदाधिका-यांसह काही शेतक-यांनी संबधित अधिका-यांना संपर्क केला. मात्र, जबाबदार अधिका-यांनी कार्यालयाकडे फिरकणे पसंत न करता शेतक-यांनाच भ्रमणध्वनीवरून उलटे बोलत अपमानास्पद वागणूक दिली. त्यामुळे संतप्त शेतक-यांनी रास्ता रोकोचा इशारा दिला आहे.बील भरून गुन्हा केला का ? - संतप्त शेतक-यांचा सवालदहा वीज रोहित्रावरील बहुतेक वीज ग्राहकांनी विहीत मुदतीत वीज बील भरले आहे. वास्तविक महावितरणे संपुर्ण वीज रोहित्र बंद न करताना प्रामाणिकपणे वीज बील भरणा-यांचा कनेक्शन कट करण्यापुर्वी विचार करणे गरजेचे होते. त्यामुळे वीज बील भरून आम्ही गुन्हा केला का, असा सवाल शेतक-यांमधून उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरीmahavitaranमहावितरण