शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Kanchenjunga Express Train Accident: बंगालमध्ये ट्रेनचा मोठा अपघात! कंचनजंगा एक्स्प्रेसला भरधाव मालगाडीची धडक, ५ जणांचा मृत्यू
2
बापरे! महागाईचा सर्जिकल स्ट्राइक; पाकिस्तानात टोमॅटो २०० रुपये किलो
3
अनंत अंबानी-राधिका मर्चंटचे प्री-वेडिंग शूट करणाऱ्या फोटोग्राफरचे मानधन किती? जाणून घ्या
4
सावधान! पावसाळ्यात समोसा, वडापाव खाणं पडू शकतं महागात; 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
5
Market Cap: मुकेश अंबानींच्या रिलायन्सची हवा, LICची ही झाली मोठी कमाई; TCS सह 'या' कंपन्यांना नुकसान
6
'फादर्स डे' निमित्त जिनिलीयाने लिहिलेली पोस्ट वाचून रितेश देशमुख म्हणाला - 'बायको तुझ्याशिवाय...'
7
बॉक्स ऑफिसवर 'मुंज्या'चं राज्य; १० दिवसात मोडला 'मैदान'चा लाइफटाइम कलेक्शनचा रेकॉर्ड
8
नागपुरात परत हिट ॲंड रन, फुटपाथवर झोपलेल्या आठ जणांना मद्यधुंद कारचालकाने चिरडले, दोघांचा मृत्यू
9
Sanjay Raut : "रवींद्र वायकर यांचा विजय खरा नाही, विजयी करणारा फोन पोलीस स्टेशनमधून बदलण्याचा प्रयत्न"
10
ईदनिमित्त दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी बंदी; शिवसेना शिंदे गट - ठाकरे गटाचे घंटानाद आंदोलन
11
"मी स्वत:च नकार दिला..."; मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळताच भाजपा नेत्याचा मोठा खुलासा
12
Modi 3.0 Budget : पहिल्या अर्थसंकल्पात नोकऱ्यांवर भर देण्याची शक्यता; PLI स्कीम, लघु उद्योगांना मिळणार प्रोत्साहन
13
सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू
14
गुरपतवंत सिंग पन्नूनच्या हत्येचा कट रचणाऱ्या आरोपीचे प्रत्यार्पण, चेक रिपब्लिकमधून निखिल गुप्ता अमेरिकेत
15
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
16
Success Story : एकेकाळी ₹२५० साठी करायचे काम, १२वी मध्ये दोनदा अपयश; आता उभी केली ₹१ लाख कोटींची कंपनी
17
'अभिनेत्री' आलिया भट झाली 'लेखिका', स्वतःच्या पहिल्या पुस्तकाचं केलं प्रकाशन! काय आहे विषय?
18
Upcoming IPOs: पैसे तयार ठेवा! या आठवड्यात उघडणार ३ नवे आयपीओ, पाहा संपूर्ण डिटेल्स
19
नवीन मालिका सुरु होत असताना शिवानी सुर्वेने चाहत्यांना केलं आवाहन, म्हणाली - "१२ वर्षांपुर्वी..."
20
वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण

Lok Sabha Election 2019 : दहशतीमुळे औद्योगिक विकास खुंटला : सुजय विखे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 11:46 AM

दहशतीमुळे अहमदनगरच्या औद्योगिक वसाहतीतील कारखाने दुसऱ्या जिल्ह्यात निघून गेले़ त्यामुळे अनेक कामगार देशोधडीला लागले.

अहमदनगर : दहशतीमुळे अहमदनगरच्या औद्योगिक वसाहतीतील कारखाने दुसऱ्या जिल्ह्यात निघून गेले़ त्यामुळे अनेक कामगार देशोधडीला लागले. औद्योगिक वसाहतीचा उपयोग राजकारणासाठी केला गेल्याची टीका महायुतीचे उमेदवार डॉ़ सुजय विखे यांनी नगर तालुक्यातील दौऱ्यात केली़ तसेच या औद्योगिक वसाहतीला गतवैभव प्राप्त करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले़लोकसभा निवडणूक प्रचारार्थ नगर तालुक्यातील जखणगाव येथे आयोजित सभेत ते बोलत होते़ यावेळी विधानसभेचे उपाध्यक्ष विजय औटी, जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, पंचायत समिती सदस्य रामदास भोर, बाळासाहेब हराळ, अरूण होळकर आदी उपस्थित होते. विरोधकांवर तोफ डागताना विखे म्हणाले, अहमदनगर औद्योगिक वसाहतीला उच्च दर्जा प्राप्त झाला होता. नगरच्या औद्योगिक वसाहतीत मोठे कारखाने सुरू होते़ मात्र स्थानिक नेत्यांनी युनियनच्या नावाखाली दहशत निर्माण केली़ त्यामुळे त्रस्त उद्योजक कारखाने बंद करून निघून गेले़ पुरेशा पायाभूत सुविधा असताना येथील वसाहत ओस पडली़ परिणामी तरुणांच्या हाताला काम राहिले नाही़ विरोधकांनी यासंदर्भात शासन दरबारी आवाज उठविला नाही़ त्यामुळेच नगरचा औद्योगिक विकास खुंटल्याचे विखे म्हणाले़जिल्ह्यातील विविध शिक्षण संस्थांमध्ये युवक उच्च शिक्षण घेत आहेत़ परंतु, त्यांना जिल्ह्यात रोजगार मिळत नाही़ त्यामुळे त्यांना नोकरीसाठी शेजारच्या जिल्ह्यात जावे लागते़ शिक्षण पूर्ण केलेले हजारो विद्यार्थी दरवर्षी नोकरीसाठी पुणे, मुंबईत दाखल होत आहेत़ पण, यापुढे तरुणांना नोकरीसाठी परजिल्ह्यात जाण्याची आवश्यकता पडणार नाही़ या जिल्ह्याच्या औद्योगिक वसाहतीचा आराखडा तयार करून औद्योगिक वसाहतीचा दर्जा उंचावणार असल्याचे विखे यांनी यावेळी सांगितले़ नगर तालुक्यातील निमगाव वाघा, नेप्ती, हमीदपूर, जखणगाव, हिंगणगाव, पिंपळगाव वाघा आदी भागातील मतदारांशी विखे यांनी संवाद साधला़ यावेळी विजय औटी यांच्यासह कार्यकर्त्यांची भाषणे झाली़

टॅग्स :AhmednagarअहमदनगरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकahmednagar-pcअहमदनगर