शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

Lok Sabha Election 2019: सोशल मीडियावर जाहिरात करताय ? सायबर सेलची नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 10:51 AM

सोशल मीडियाला कोणतेही बंधन नसल्याने विविध माध्यमातून दररोज लाखो पोस्ट व्हायरल होतात.

अहमदनगर : सोशल मीडियाला कोणतेही बंधन नसल्याने विविध माध्यमातून दररोज लाखो पोस्ट व्हायरल होतात. परंतु लोकसभा निवडणूक काळात यावर ब्रेक लागणार आहे. एखाद्या उमेदवाराच्या जाहिरातीची पोस्ट टाकण्याआधी त्याची पूर्वपरवानगी घ्यावी लागणार आहे.जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन माध्यम प्रमाणन आणि संनियंत्रणाबाबत माहिती दिली. उमेदवार अथवा त्यांच्याकडून केल्या जाणाऱ्या राजकीय पक्षांच्या जाहिरातींना प्रसारणपूर्व परवानगी आवश्यक राहणार आहे. उमेदवारांनी ते करणार असलेल्या जाहिरातीचा मजकूर आणि आॅडिओ/व्हिडीओ यांची सीडी माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समितीकडून प्रसारणासाठी योग्य असल्याचे प्रमाणपत्र घेऊनच प्रसारित करावी लागणार आहे. यासाठीचा खर्च संबंधित उमेदवारांच्या खात्यात नोंदविणे आवश्यक आहे. विनापरवानगी कोणताही जाहिरात मजकूर इलेक्ट्रॉनिक माध्यम, सोशल मीडियातून प्रसारित करण्यास प्रतिबंध असल्याचे त्यांनी नमूद केले. यावर्षी भारत निवडणूक आयोगाने माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समितीमध्ये सोशल मीडियातील मजकूरावर देखरेखीसाठी या क्षेत्रातील माहितगारास समितीत घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार सायबर सेलचे पोलीस निरीक्षक निवडणूक काळात सोशल मीडियावर लक्ष ठेवून असणार आहेत. यावेळी सदस्य सचिव तथा प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी दीपक चव्हाण यांनी माध्यम प्रमाणिकरण व माध्यम सनियंत्रण समितीचे कार्य, प्रमाणन अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे आदी माहिती दिली.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर