शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
2
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
3
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
4
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
5
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
6
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
7
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
8
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
9
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
10
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
11
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
12
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
13
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
14
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
15
Video: कुटुंबासह अयोध्येत पोहोचला प्रसाद ओक; रामलला चरणी झाला नतमस्तक
16
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
17
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
18
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
19
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
20
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा

पडझडीच्या काळात साहित्यच सावरण्याचे काम करेल : अरूणा ढेरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2019 6:23 PM

इतिहास कधी बदलत नाही हे जरी खरे असले तरी वर्तमानाचा वेध घेत इतिहासाकडे बघण्याची दृष्टी तयार केली पाहिजे,

लोणी : इतिहास कधी बदलत नाही हे जरी खरे असले तरी वर्तमानाचा वेध घेत इतिहासाकडे बघण्याची दृष्टी तयार केली पाहिजे, असे सांगतानाच नवलेखक, साहित्यिक जीवनाचे आकलन करीत वर्तमानात जगण्यासाठी जे गरजेचे आहे ते आपल्या लेखनातून पुढे घेऊन जात आहेत. समाजात जेव्हा सगळीकडून पडझड होईल तेव्हा या नवलेखकांच्या साहित्याकडे समाज एक आश्वासक साहित्य म्हणून बघेल, असे स्पष्ट मत ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ.अरुणा ढेरे यांनी व्यक्त केले.प्रवरानगर येथे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या ११९ व्या जयंती निमित्ताने बुधवारी आयोजित साहित्य पुरस्कार वितरण सोहळ्यात डॉ. ढेरे बोलत होत्या. केंद्रीय ग्राहक व्यवहार तसेच अन्न व सार्वजनिक वितरण राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तर गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे, खासदार डॉ. सुजय विखे, माजीमंत्री अण्णासाहेब म्हस्के, चंद्रशेखर कदम, विजय वहाडणे, अनुराधा आदिक, प्रवरा मेडिकल ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र विखे पाटील आदी यावेळी उपस्थित होते.यावर्षीचा पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील साहित्यसेवा जीवनगौरव पुरस्कार माजी कुलगुरू डॉ.नागनाथ कोत्तापल्ले (पुणे) यांना तर राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्कार किरण गुरव (कोल्हापूर) यांच्या‘जुगाड’ कादंबरीस प्रदान करण्यात आला. पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील विशेष साहित्य गौरव पुरस्कार प्रा.गो.तु.पाटील (येवला) यांच्या ‘ओल अंतरीची’या आत्मचरित्रास तर जिल्हास्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्कार नीलिमा क्षत्रिय (संगमनेर) यांच्या ‘दिवस आलापल्लीचे’ या ललित लेखनास देण्यात आला. जिल्हा विशेष साहित्य पुरस्कार डॉ.शैलेश त्रिभुवन (कोपरगाव) यांच्या ‘अस्वस्थ मनातील शब्द’ या कवितासंग्रहास यावेळी देण्यात आला.कलेच्या सेवेसाठी असलेल्या पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील कलागौरव पुरस्कार धनंजय गोवर्धने (नाशिक) यांना तर समाज प्रबोधन पुरस्कार शमशुद्दीन तांबोळी (पुणे) यांना प्रदान करण्यात आला. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील नाट्यसेवा पुरस्कार राजकुमार तांगडे (जालना) यांना प्रदान करण्यात आला.ग्रामीण भागातील आणि सहकारातील आदर्श नेतृत्वाच्या व्याख्या या पद्मश्री विठ्ठलराव विखे आणि पद्मभूषण बाळासाहेब विखे यांनी आपल्या सामर्थ्याने उभ्या केल्या आहेत. वेगळी विचारधारा असलेल्या या वाड्.मयामध्ये आता डावा आणि उजवेपणा राहिला नाही. कित्येक जण मराठी वाड्.मयात आपल्या साहित्याच्या लेखनामागे किंवा त्याच्या प्रसिद्धी मागे आपला छुपा उद्देश वा व्यवहार ठेवत आहे. पण आता मात्र नव साहित्यिक आपल्या लेखनातून स्वत:ची वाट शोधत आहेत. जगणे काय आहे ते आपल्या साहित्यातून ते सिध्द करीत आहे. हे सिध्द करताना ते स्वत:च्या जगण्यात घुसत आहे आणि स्वत:चे जगणे प्रामाणिकपणे लिहित आहे, असेही डॉ. ढेरे म्हणाल्या.ग्रामीण भागातील आणि सहकारातील आदर्श नेतृत्वाच्या व्याख्या या पद्मश्री विठ्ठलराव विखे आणि पद्मभूषण बाळासाहेब विखे यांनी आपल्या सामर्थ्याने उभ्या केल्या आहेत. वेगळी विचारधारा असलेल्या या वाड्.मयामध्ये आता डावा आणि उजवेपणा राहिला नाही. कित्येक जण मराठी वाड्.मयात आपल्या साहित्याच्या लेखनामागे किंवा त्याच्या प्रसिद्धी मागे आपला छुपा उद्देश वा व्यवहार ठेवत आहे. पण आता मात्र नव साहित्यिक आपल्या लेखनातून स्वत:ची वाट शोधत आहेत. जगणे काय आहे ते आपल्या साहित्यातून ते सिध्द करीत आहे. हे सिध्द करताना ते स्वत:च्या जगण्यात घुसत आहे आणि स्वत:चे जगणे प्रामाणिकपणे लिहित आहे, असेही डॉ. ढेरे म्हणाल्या.खासदार डॉ. सुजय विखे यांनी प्रास्ताविक केले. पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष डॉ.रावसाहेब कसबे यांनी पुरस्काराची घोषणा केली. आभार विखे कारखान्याचे उपाध्यक्ष कैलास तांबे यांनी मानले. सूत्रसंचालन दिनेश भाने व गायत्री म्हस्के यांनी केले.पद्मश्री विठ्ठलराव विखे यांनी एक प्रकारे क्रांती निर्माण केली. डॉ.बाळासाहेब विखे यांनी सुरु केलेली पुरस्काराची ही परंपरा द्रष्टेपणाची आहे. या पुरस्कारामुळे लेखनाचा उत्साह अधिक वाढला आहे. -डॉ.नागनाथ कोत्तापल्ले, पुरस्कार विजेते, ज्येष्ठ साहित्यिक.प्रवरा परिवाराकडून पूरग्रस्तांना एक कोटीप्रवरा परिसराने सदैव सामाजिक प्रश्नांना आपले माणून मार्गक्रमण केले. समाजाची दु:ख आपली मानली. म्हणूनच कोल्हापूर, सांगली, सातारा या भागात नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या लोकांना प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था, विखे पाटील फाउंडेशन आणि प्रवरा मेडिकल ट्रस्ट यांच्या वतीने १ कोटी रुपयांची वस्तुरुपी मदत करणार असल्याचे मंत्री राधाकृष्ण विखे यांनी यावेळी जाहीर केले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरrahaataराहाता