शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींनी वाराणसीतून तिसऱ्यांदा दाखल केला उमेदारी अर्ज, शाह-राजनाथ यांच्यासह ये दिग्गज होते उपस्थित
2
"लोक मदतीसाठी ओरडत होते पण आम्ही काहीच करु शकलो नाही"; होर्डिंग कोसळलं, 14 जणांचा मृत्यू
3
यशवंत जाधव, रवींद्र वायकर हे महापालिकेचे लाभार्थी, ज्यांनी मुंबई लुटली - संजय राऊत
4
बळीराजासाठी आनंदाची बातमी! येत्या ८ दिवसांत मान्सून अंदमानात दाखल होणार
5
इस्रायलला गाझावर अणुबॉम्ब टाकण्याची परवानगी मिळायला हवी; अमेरिकी खासदाराचे खळबळजनक वक्तव्य
6
आईच्या निधनानंतर आता...; वाराणसीमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी भावुक झाले पंतप्रधान मोदी
7
DC vs LSG : 'करा किंवा मरा'! पंतची एन्ट्री; राहुलसोबतच्या नाट्यमय घडामोडींनंतर पहिलाच सामना
8
Fact Check : हैदराबादमध्ये मोदींनी AIMIM ला पाठिंबा दिल्याच्या Video दिशाभूल करणारा; जाणून घ्या 'सत्य'
9
भाजपासोबत जाण्याचा घटनाक्रम नेमका कसा होता?; सुनील तटकरेंनी २०१४ पासूनचं सगळं सांगितलं
10
घाटकोपरच्या 'त्या' होर्डिंगवरून BMC आणि रेल्वे प्रशासनात टोलवाटोलवी, परवानगी कुणी दिली?
11
Sangli Lok Sabha Election 2024 : 'साहेबा'साठी कायपण! सांगलीत निवडणूक निकालासाठी बुलेट अन् युनिकॉर्नची पैज
12
बीडमध्ये बोगस मतदान, काही ठिकाणी फेरमतदान घ्या, बजरंग सोनावणे यांनी केली मागणी   
13
RRR, 'आदिपुरुष'पेक्षा महागडा आहे नितेश तिवारीचा 'रामायण', बजेटचा आकडा पाहून व्हाल हैराण
14
Video - "सुशील कुमार मोदी रागवायचे तेव्हा..."; अश्विनी कुमार चौबे यांना अश्रू अनावर
15
राहुचे नक्षत्र गोचर: ६ राशींना संधींचा काळ, लाभाचे शुभ योग; सुख-समृद्धीत वाढ, भाग्याची साथ!
16
मी कुठलंही वचन दिलं नव्हतं, उद्धव ठाकरे खोटं बोलतायेत; अमित शाहांनी पुन्हा फटकारलं
17
IPO असावा तर असा! ३८६% प्रीमिअमवर झाला लिस्ट, पहिल्याच दिवशी ₹७५ वरुन पोहोचला ₹३६५वर
18
Ganga Saptami 2024: गंगेत स्नान केल्याने खरोखरंच पाप धुतले जाते का? गंगासप्तमिनीत्त वाचा गंगा स्नानाचे महत्त्व!
19
Ganga Saptami 2024: गंगा सप्तमीला का केले जाते पितृतर्पण? ते कसे करायचे व त्यामुळे काय फळ मिळते? वाचा!
20
1 जुलैपासून नवा कोच राहुल द्रविडची जागा घेणार; बीसीसीआयने अर्ज मागविले, या अटी ठेवल्या....

गोरगरिबांना अन्नधान्यापासून वंचित ठेवण्याचा डाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 4:13 AM

श्रीरामपूर : केंद्र सरकारच्या निर्देशानुसार अन्न, नागरी, पुरवठा विभागाने अपात्र शिधापत्रिका शोधण्याची मोहीम हाती घेतली आहे. शिधापत्रिकेतील कोणत्याही व्यक्तीच्या ...

श्रीरामपूर : केंद्र सरकारच्या निर्देशानुसार अन्न, नागरी, पुरवठा विभागाने अपात्र शिधापत्रिका शोधण्याची मोहीम हाती घेतली आहे. शिधापत्रिकेतील कोणत्याही व्यक्तीच्या नावावर गॅस जोडणी नाही असे हमीपत्र त्यात लिहून घेतले जात आहे. गोरगरिबांना अन्नधान्यापासून वंचित ठेवण्याचा हा केंद्राचा डाव असल्याचा आरोप आमदार लहू कानडे यांनी केला आहे.

शिधापत्रिकाधारकांकडून निवासाच्या मालकीचा पुरावा, एलपीजी जोडणी क्रमांक, बँक पासबुक, वाहन परवाना, आधार कार्ड यापैकी एक वर्षाच्या आतील पुरावे देणे बंधनकारक करण्यात आले आहे. याशिवाय शिधापत्रिका तपासणी नमुना म्हणून एक अजब हमीपत्र भरून घेतले जात आहे. त्यात शिधापत्रिकेतील कोणत्याही व्यक्तीच्या नावावर गॅस जोडणी नाही. भविष्यात गॅस जोडणी घेतल्यास त्याची माहिती तत्काळ शिधावाटप कार्यालयास देण्यास बंधनकारक राहील. तसे न झाल्यास शिधापत्रिका रद्द करण्यात येईल याची जाणीव आहे, असा मथळा लिहून घेतला जात आहे. या हमीपत्रावर कुटुंबप्रमुखाची सही असते, अशी माहिती आमदार कानडे यांनी दिली.

आतापर्यंत राज्यातील कार्यरत बीपीएल, अंत्योदय, अन्नपूर्णा, केसरी, शुभ्र व आस्थापना कार्ड अशा सर्व प्रकारच्या देण्यात येत आहेत. यामध्ये मुख्यतः दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांसाठी पिवळी शिधापत्रिका, रुपये एक लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्यांसाठी केशरी शिधापत्रिका आणि इतर सर्वांसाठी शुभ्र शिधापत्रिका देण्यात येते. शिधापत्रिका तपासणी मोहीम ही सार्वजनिक वितरण व्यवस्था ( नियंत्रण आदेश) २०१५ नुसार निरंतर प्रक्रिया आहे. मात्र केंद्र सरकारच्या निर्देशानुसार यावेळेस गॅस जोडणी बाबतचे लेखी हमीपत्र घेऊन गोरगरीब माणसांच्या शिधापत्रिका कोणत्याही क्षणी रद्द करून त्याला कायमचे अन्नधान्यापासून वंचित करण्याचा डाव आहे, अशी टीका कानडे यांनी केली आहे.

...

ठाकरे, भुजबळ यांना पत्र

केंद्राने २८ जानेवारी २०२१ रोजी जारी केलेले परिपत्रक तत्काळ मागे घ्यावे यासाठी आमदार लहू कानडे यांनी अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लेखी पत्र पाठविले आहे.

..

गरिबांच्या तोंडचा घास हिरावणार?

पंतप्रधान मोदी सरकारने गोरगरीब महिलांना उज्ज्वला गॅस दिल्याची व त्या अंतर्गत आठ कोटी कुटुंब लाभान्वित केल्याची मोठी जाहिरात केली आहे. आता मात्र एक सिलिंडर देऊन कायमस्वरूपी गरिबांच्या तोंडचा घास हिरावून घेण्याचा त्यामागे कुटील हेतू तर नाही ना? अशी शंका कानडे यांनी उपस्थित केली आहे.