शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
2
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
3
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार
4
Video - मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महुआ मोइत्रांसोबत निवडणूक रॅलीत केला डान्स
5
'...तर आफ्रिकेत जाऊन मतं मागा, कोकणातील शेतकरी लोकप्रतिनिधींवर संतप्त', त्या बॅनरची चर्चा
6
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
7
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
8
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
9
'नाच गं घुमा'मध्ये नम्रताचं काम पाहून प्राजक्ता माळी भारावली, म्हणाली -"हास्यजत्रेत ती गेली साडेपाच वर्ष..."
10
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
11
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
12
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
13
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
14
राणीमुळे झाला होता करण-काजोलमध्ये टोकाचा वाद; 'कुछ कुछ होता हैं' च्या सेटवर झालेलं भांडण
15
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
16
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
17
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
18
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
19
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
20
९ मे रोजी सुरू होत आहे वैशाख मास; रखरखीत उन्हाळ्यातही तो का ठरतो खास? वाचा!

पाणी फाऊंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेसाठी नगर जिल्ह्यातील पाच तालुक्यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 5:08 PM

पाणी फाऊंडेशनच्या वतीने घेण्यात येणा-या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत यंदा प्रथमच नगर जिल्ह्याला संधी मिळाली असून, नगर जिल्ह्यातील पाच तालुक्यांची या स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. 

ठळक मुद्देपाणी फाऊंडेशनच्या वतीने घेण्यात येणा-या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत यंदा प्रथमच नगर जिल्ह्याला संधी मिळालीनगर जिल्ह्यातील पाच तालुक्यांची या स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.पाणी फाऊंडेशनचे संस्थापक अभिनेता अमीर खान व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संयुक्त व्हिडीओ कॉन्फरन्स घेऊन जिल्हाधिका-यांना याबाबत सुचना दिल्या.

अहमदनगर : पाणी फाऊंडेशनच्या वतीने घेण्यात येणा-या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत यंदा प्रथमच नगर जिल्ह्याला संधी मिळाली असून, नगर जिल्ह्यातील पाच तालुक्यांची या स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. बुधवारी पाणी फाऊंडेशनचे संस्थापक अभिनेता अमीर खान व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संयुक्त व्हिडीओ कॉन्फरन्स घेऊन जिल्हाधिका-यांना याबाबत सुचना दिल्या.नगर जिल्ह्यातील दुष्काळी पाथर्डी, जामखेड, कर्जत, नगर आणि पारनेर तालुक्यांची ‘सत्यमेव जयते वाटर कप - २०१८’ स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. या तालुक्यातील ग्रामपंचायतींनी पाणी फाऊंडेशनच्या वाटर कप स्पर्धेत सहभागी होण्यासाठीचा ठराव डिसेंबर अखेरीस पाठविण्याचे आवाहन केले आहे. या स्पर्धेत जलसंधारण आणि पाणीलोट व्यवस्थापन यामध्ये सर्वोत्तम कामगिरी करणा-या गावाला दहा लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. या योजनेत शेततळे, नदीजोड प्रकल्प, यंत्राद्वारे पाणी अडवा, पाणी जिरवा अभियान, बंधारे, शौचालये, स्वच्छता आदी कामे तपासण्यात येणार आहेत. त्यासाठी पाणी फाऊंडेशनने या पाचही तालुक्यात समन्वयकांची नेमणूक केली आहे.

स्पर्धेतील सहभागाच्या अटी

ग्रामपंचायतीने ग्रामसभा बोलावून वॉटर कप स्पर्धेत सहभागी होण्याचा ठराव करणे आवश्यक आहे़ पाणलोट व्यवस्थापनाविषयी ग्रामस्थांना प्रशिक्षण देण्यासाठी पाणी फाऊंडेशन चार दिवसीय शिबिर घेणार आहे. त्यात ग्रामपंचायतीने ५ जबाबदार ग्रामस्थांना पाठविणे आवश्यक आहे. या पाच जणांमध्ये दोन महिला व दोन तरुण आवश्यक आहेत. यातील किमान एकाला स्मार्ट फोन चांगल्या पद्धतीने आॅपरेट करता येणे आवश्यक आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAamir Khanआमिर खानDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस