शहरं
Join us  
Trending Stories
1
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
2
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
3
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
5
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
6
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
7
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
8
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

दहा दिवस उलटूनही शेतातील पिके पाण्यातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2019 1:00 PM

मिरी, आडगाव परिसरातील पिकांचे आतोनात नुकसान झाले आहे. गेल्या दहा दिवसांपासून पाण्याखाली असलेले कापसू, कांदा पिके सडले आहे, तर बाजरी, मक्याला कोंब फुटले आहेत.

सचिन नन्नवरे ।  मिरी : गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीने मिरी, आडगाव परिसरातील पिकांचे आतोनात नुकसान झाले आहे. गेल्या दहा दिवसांपासून पाण्याखाली असलेले कापसू, कांदा पिके सडले आहे, तर बाजरी, मक्याला कोंब फुटले आहेत.मागील वर्षी या भागात पावसाने दडी मारली. यंदाही पावसाळ्याच्या सुरुवातीला पाऊस नव्हता. त्यामुळे पुन्हा एकदा तीव्र दुष्काळाला सामोरे जावे लागेल अशी भीती होती. त्यातच अधूनमधून पडलेल्या पावसावर शेतकºयांनी बाजरी, कापूस व कांद्यासारखी पिके घेतली होती. ही सर्व पिके काढणीला आली होती. त्यातच या भागात अतिवृष्टीने धुमाकूळ घातला. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. शेतात तळे साचून शेतात उभे असलेले पीक पूर्णपणे चिखलमय होऊन सडून गेले आहे. त्यामुळे शेतात पाउलही ठेवता येत नसल्याने मोठ्या कष्टाने पिकवलेले पीक आपल्या डोळ्यादेखत सडताना पाहून शेतकºयांच्या डोळ्यात अश्रू येत आहेत. शेतकºयांनी मळणीसाठी जमा करून ठेवलेल्या बाजरीच्या कणसाला तर अक्षरश: कोंब फुटले. उभे असलेले बाजरीचे पीक सडले आहे. त्याचप्रमाणे काढणीसाठी तयार असलेला चांगल्या दर्जाचा कांदाही शेतातच राहून सडल्याने भाव असूनही शेतकºयांच्या पदरात मात्र निराशाच पडली आहे. कापूसही ऐन वेचणीच्या काळात असतानाच अतिवृष्टी झाल्याने सर्व कापूस काळवंडला आहे. या सर्व पिकांसह जनावरांसाठी उत्तर चारा म्हणून उपयोगात येणारे मका, ज्वारीचे पीकही पूर्णपणे वाया गेले आहे.या पिकांसह काही फळबागांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे एक तर पिकेही गेली व आर्थिक नुकसानही झाल्याने आता निदान शासनाने नुकसान भरपाई देऊन आर्थिक मदत करावी, विमा कंपनीनेही शंभर टक्के सरसकट पीकविमा मंजूर करावा, अशी मागणी लक्ष्मण लोंढे, संजय भानगुडे, दिलीप मुनोत, ललित मुनोत, भाऊसाहेब पाचरणे, जनार्दन वाघमोडे, भाऊसाहेब कांबळे, विक्रम वाघ आदींसह आडगाव, मिरी, रेणुकाईवाडी, शिराळ, शिंगवे केशव आदी शेतकºयांनी केली आहे.अवेळी व अतिवृष्टीच्या पावसामुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकºयांच्या बांधावर जाऊन पिकांचे पंचनामे केले. शेतकºयांना नुकसान भरपाई मिळावी व विमा कंपनीकडूनही पीक विमा मंजूर व्हावा यासाठी शासनस्तरावर सकारात्मक पावले उचलून पाठपुरावा केला जात आहे, असे पाथर्डीचे तालुका कृषी अधिकारी प्रवीण भोर यांनी सांगितले.     सावकारी कर्ज काढून पिकांची लागवड केली. सर्व कुटुंबाने मेहनत करून पिके जगवली होती. परंतु, दुर्दैवाने अतिवृष्टीमुळे पिकांची नासाडी झाली. त्यामुळे शासनाने आम्हाला आर्थिक मदत करून विमाही मंजूर करावा, अशी मागणी शेतकरी लक्ष्मण लोंढे यांनी केली आहे.     कांद्याला चांगला भाव मिळत असल्याचे कळाल्याने शेतात असलेला कांदा काढणीची तयारी केली होती. परंतु, काढणीच्या आधीच अतिवृष्टी झाल्याने शेतातील कांदा शेतातच सडल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे, असे शेतकरी विक्रम वाघ यांनी सांगितले.     

टॅग्स :Pathardiपाथर्डीCrop Insuranceपीक विमा