शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
2
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
3
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
4
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
5
अशी महिला, जिनं उभं केलं ₹७००० कोटींचं साम्राज्य; नंतर त्याच कंपनीतून काढून टाकलं, वाचा कोण आहेत त्या?
6
'मुंबई पुणे मुंबई 4' कधी येणार? मुक्ता बर्वे म्हणाली, "मी, स्वप्नील आणि सतीश...'
7
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
8
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'
9
"आजवर तुम्ही चुकीचं नाव घेताय..", अखेर ईशा देओलने सांगितला तिच्या नावाचा खरा उच्चार
10
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
11
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
12
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
13
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
14
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
15
'हीरामंडी'च्या रोमँटिक गाण्यावर गौतमी पाटीलहीनेही दाखवली अदा, एका नजरेतच चाहते घायाळ
16
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं
17
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
18
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
19
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
20
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले

गीता आणि कुराण संवादाचे प्रभावी माध्यम : हनिफ खान शास्त्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 7:44 PM

पाच हजार १५८ वर्षांपूर्वी भगवान श्रीकृष्णांच्या मुखातून गीता प्रकटली. त्यानंतर सुमारे साडेतीन हजार वर्षांनी कुराण जन्माला आले. आश्चर्याची बाब म्हणजे गीतेत सांगितले.

ठळक मुद्देसंगमनेरात सर्वधर्मीयांच्या उपस्थितीत गीतेवर व्याख्यान

संगमनेर : पाच हजार १५८ वर्षांपूर्वी भगवान श्रीकृष्णांच्या मुखातून गीता प्रकटली. त्यानंतर सुमारे साडेतीन हजार वर्षांनी कुराण जन्माला आले. आश्चर्याची बाब म्हणजे गीतेत सांगितलेले तत्वज्ञान फक्त वेगळ्या लिपीत आणि भाषेत कुराणात सांगितले आहे. हे दोन्ही महान धार्मिक ग्रंथ म्हणजे वादाचे नव्हे तर संवादाचे प्रभावी माध्यम आहेत, असे प्रतिपादन संस्कृत भाषेचे गाढे अभ्यासक डॉ. मोहम्मद हनीफ खान शास्त्री यांनी केले.गीता परिवाराच्या वतीने भंडारी मंगल कार्यालयात गीतेतील वैश्विक विचार या विषयावर बुधवारी डॉ. खान यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी हे विचार सप्रमाण मांडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. भगवान जोशी तर व्यासपीठावर गीता परिवाराचे कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी, संगमनेर शाखाप्रमुख सतीश इटप उपस्थित होते.डॉ. खान म्हणाले, गीता आणि कुराण यांची केवळ लिपी भिन्न आहे. बारकाईने अभ्यास केला तर दोन्हींचा गाभा एकच आहे. दोन्ही ग्रंथ सद्भावना, बंधुत्व आणि मानवतेचा पुरस्कार करणारे आहेत. द्वेषभावनेचा जराही लवलेश या महान ग्रंथांमध्ये नाही. डॉ. खान यांनी वेद, गीता, कुराण, अरण्यके, उपनिषदे यातील दाखले देत या सर्वांची शिकवण मानवतेच्या मुल्यांचा पुरस्कार करणारी असून त्यात तिरस्काराला तसूभरही वाव नाही असे सांगीतले. राजकीय लाभासाठी आणि दोन समुदाय परस्परांशी झुंजविण्यासाठी आजवर त्यांचा दुरुपयोग होत आला. ही दुदैर्वाची गोष्ट असुन गीता ही अखिल विश्वातील मानवजातीला भारताने दिलेली सर्वोत्तम भेट आहे असल्याचे डॉ. खान म्हणाले.मुस्लीम समाजाच्या वतीने जुबेर इनामदार, डॉ. जी. पी. शेख, साजिद पठाण यांनी डॉ. खान यांचा सत्कार केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गिरीश डागा व अभिजित गाडेकर यांनी केले. सतीश इटप यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दत्ता भांदुर्गे यांनी विशेष परिश्रम घेतले. संगमनेरातील सर्वधर्मीय नागरिकांनी हे व्याखान ऐकण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

 

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSangamnerसंगमनेर