शहरं
Join us  
Trending Stories
1
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
2
"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर
3
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
4
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
5
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
6
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
7
मोठी बातमी! मोदी-राज यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे मुंबईत एकाच दिवशी घेणार ४ सभा
8
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
9
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
10
Rakhi Sawant Health Update: राखी सावंतने स्वतःच दिली प्रकृतीबद्दल मोठी माहिती, म्हणाली- "माझ्या गर्भाशयात..."
11
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
12
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा
13
IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 
14
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
15
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
16
" त्याला कोरोना झाला आणि तोपण गेला...", जिवंतपणीच भूषण कडूला लोकांनी घोषित केलं होतं मृत
17
कॅफे म्हैसूरच्या मालकावर फिल्मी स्टाईल दरोडा; पोलिसांची व्हॅन वापरुन पळवले २५ लाख
18
Investment Tips : निवृत्तीनंतर हात पसरायचे नसतील तर काय कराल? 'या' योजनांमध्ये गुंतवणुकीचा करू शकता विचार
19
धक्कादायक! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत कार्तिक आर्यनच्या मामा-मामीचा मृत्यू, ३ दिवसांनी सापडले मृतदेह
20
Priyanka Gandhi : "राहुल गांधींनी लग्न करावं, त्यांना मुलं व्हावीत"; भावासाठी प्रियंका गांधींनी जाहीर केली इच्छा

जिल्ह्यात दुचाकीवरून ‘डबलसीट’ला मनाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2021 4:15 AM

अहमदनगर : जिल्ह्यातील जनता कर्फ्यूला १५ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. गत महिन्यात दोन वेगवेगळ्या आदेशान्वये लागू केलेले कडक ...

अहमदनगर : जिल्ह्यातील जनता कर्फ्यूला १५ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. गत महिन्यात दोन वेगवेगळ्या आदेशान्वये लागू केलेले कडक निर्बंध १५ मेपर्यंत कायम राहणार आहेत. तसा आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी जारी केला आहे. दरम्यान जिल्ह्यात दुचाकीवरून एकाच व्यक्तीला प्रवास करता येणार आहे. डबलसीट किंवा त्याहून अधिक व्यक्ती प्रवास करताना आढळल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

जिल्ह्यात १४ एप्रिलपासून कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. तर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे १४ दिवसांचा कडक लॉकाडाऊन करण्यात आला होता. त्याअनुषंगाने २१ एप्रिल रोजी जारी करण्यात आलेल्या आदेशालाच मुदतवाढ देण्यात आली आहे. त्याप्रमाणे दिवसभर आणि रात्रभर संचारबंदी कायम राहणार आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले आहे. सकाळी ९ ते ११ या वेळेत दूध, भाजीपाला आणि किराणा विक्री करता येणार आहे. मात्र, महापालिका हद्दीत १० मेपर्यंत वेगळे नियम असल्याने नगर शहरात दूध विक्री वगळता सर्वच बंद राहणार आहे.

दरम्यान जिल्ह्यात दुचाकीवरून दोन किंवा त्यापेक्षा जास्त लोक फिरत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दुचाकीवरून एकापेक्षा अधिक व्यक्तींना फिरण्यास मनाई करण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी स्वतंत्र आदेश जारी केला आहे. २ मेपासून ते १५ मेपर्यंत हे निर्बंध लागू राहणार आहेत. कोणत्याही संस्था, संघटना, व्यक्ती यांनी या आदेशाचे उल्लंघन करू नये. पोलीस विभाग, परिवहन विभाग आणि स्थानिक प्रशासन यांनी ही अंमलबजावणी करण्याचा आदेश दिला आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. ज्या सेवांना कडक निर्बंधातून सूट देण्यात आली होती, अशाच सेवांसाठी दुचाकीवरून एकापेक्षा जास्त जण प्रवास करीत असल्याचे दिसत होते. त्यामुळेच जिल्हा प्रशासनाने हा नियम केला असल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

-------

मार्केटयार्डमध्ये भाजीपाला, फळे विक्रीस मनाई

कोरोनाला रोखण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत नगरचे उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी मार्केट कमिटीच्या आवारात भाजीपाला, फळे विक्रीची सर्व दुकाने, तसेच इतर सर्व व्यावसायिकांची दुकाने बंद राहणार आहेत. हे निर्बंध १५ मेपर्यंत लागू राहणार आहेत. सदरची ही सर्व दुकाने नेप्ती उपबाजार समितीच्या आवारात सुरू करण्यास परवानगी करण्यात आली आहे. याबाबतच्या आदेशाचे उल्लंघन करण्यास फौजदारी कारवाईचा इशारा प्रांताधिकाऱ्यांनी दिला आहे.